शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल एका तपानंतर ठाण्यातील स्मार्ट मीटरचा मार्ग होणार मोकळा, स्मार्टसिटीतून ७० टक्के खर्च केला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:29 IST

अखेर एका तपानंतर ठाण्यातील स्मार्ट मीटरचा मार्ग मोकळा होत आहे. ठाणे महापालिका आता स्मार्ट सिटीतून ७० टक्के आणि ३० टक्के खर्च पालिका उचलणार आहे. यासाठी एकूण १०४.५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्मार्टसिटीतून भांडवली खर्च केला जाणार२४.७० कोटींचा निगा, देखभालीचा खर्च पालिका उचलणार

ठाणे - आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमी आॅटोमेटीक मीटर अशा पध्दतीने मागील ११ वर्षे पालिका नळ संयोजनांवर मीटर बसविण्यासाठी विविध पध्दतीन निविदा काढत आहे. स्मार्ट मीटरची योजना फसल्याने पालिकेने सेमी आॅटोमेटीक मीटरची योजना पुढे आणली होती. सुरुवातीला पीपीपी तत्वावर पालिका ही योजना राबविणार होती. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने या योजनेचा तब्बल ७० टक्के खर्च पालिकेने उचलण्याची तयारी केली होती. परंतु तरीदेखील पालिकेला यामध्ये यश आले नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीमधून भांडवली खर्च आणि उर्वरीत निगा, देखभालीचा पाच वर्षांसाठीचा खर्चाचा भार पालिका स्वत: उचलणार आहे. विशेष म्हणजे मीटरच्या खर्चाचा बोजा देखील पालिका स्वत: उचलणार असल्याने ठाणेकरांवरील हा बोजा आता हटणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.                    पाणी गळती आणि पाणी चोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी या उद्देशाने ठाणे महापालिकेने मीटर बसविण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपूर्वी पुढे आणला होता. त्यानुसार प्रथम हायटेक स्वरुपाचे परदेशी तंत्रज्ञानाचे मीटर बसविण्याचे पालिकेने निश्चित केले होते. यासाठी ३५ कोटींचा निधी खर्च केला जाणार होता. परंतु तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव या योजनेविषयी साशंक होते. दरम्यान, राजीव यांची बदली होऊन त्यांच्या जागी आलेले आयुक्त असीम गुप्ता यांनी या योजनेचा गाशा गुंडाळला. मुंबईत एमआरए पध्दतीची मीटर बसविण्यासाठी अधिक पैसे खर्च लागले होते. परंतु बसविण्यात आलेले मीटर फारसे यशस्वी ठरले नव्हते. त्यामुळे मुंबई महापालिकेचा हा अनुभव गाठीशी बांधत आयुक्तांनी ही योजनाच बंद केली.                 दरम्यान, पुन्हा ए.आर.एमचे सेमी आॅटोमेटीक मीटर बसविण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार आता या कामाच्या निविदा मागील वर्षी मागविण्यात आल्या होत्या. हे रोड मॉडेल पीपीपी तत्वावर राबविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्यानुसार या निविदा अंतिम झाल्यानंतर साधारणपणे मार्च पर्यंत म्हणजेच नव्या वर्षात तब्बल १५ हजार ५०० नळसंयोजनावर हे मीटर बसविले जाणार होते. यासाठी १२.५० कोटींची तरतुद करण्यात आली आहे. या योजनेच्या निविदेला वारंवार मुदतवाढ देऊनही, प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे यासाठीचा निधी स्मार्टसिटीतून मिळविण्यासाठी पालिकेने हालाचाली सुरु केल्या होत्या. त्यानुसार आता खºया अर्थाने स्मार्ट मीटरचा मार्ग मोकळा होणार असल्याचे दिसत आहे. स्मार्ट सिटीतून या कामाचा भांडवळी म्हणजेच ७९.८० कोटींचा खर्च केला जाणार आहे. तर २४.७० कोटींचा पाच वर्षांसाठीचा निगा, देखभाली, दुरुस्ती आणि परिचलनाचा खर्च पालिका स्वत:च्या तिजोरीतून करणार आहे. दुसरीकडे स्मार्टसिटीच्या बैठकीत या मीटरचा बोजा ठाणेकरांवर पडू नये असा निर्णय घेण्यात आला आहे. सुरवातीला, ठाणेकरांच्या खिशातून मीटरचे पैसे घेण्याचा विचार पालिकेने केला होता. परंतु आता त्याला मुठ माती देत पालिकेने आता ठाणेकरांवरील हा बोजा हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी