शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर माणकोली उड्डाणपूलाची मार्गिका वाहनांसाठी खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 00:09 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर एमएमआरडीएने या मार्गावरील वाहतूक सोमवारपासून सुरु केली आहे. भिवंडीतील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाची औपचारिकता टाळल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मुंबई नाशिक मार्गावरील वाहनधारकांची दोन्ही बाजूंनी २० ते २५ मिनिटांची बचत होणार आहे. शिवाय, वाहतूक कोंडीही आता फुटणार आहे.

ठळक मुद्दे उद्घाटननाची औपचारिकता टाळल्याने वाहनधारकांमध्ये समाधान मुंबई नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडी झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करून वाहनधारकांची गैरसोय टाळावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर एमएमआरडीएने या मार्गावरील वाहतूक सोमवारपासून सुरु केली आहे. भिवंडीतील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाची औपचारिकता टाळल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.नाशिक महामार्गावर माणकोली येथील उड्डाणपुलाच्या ठाणे दिशेने डाव्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच हस्ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच इतर लोकप्रतिनिधी यांच्या आॅनलाईन उपस्थितीत सोमवारी दुपारी १.३० वाजता हे लोकार्पण ठरले होते. त्याप्रमाणे एमएमआरडीएने आवश्यक ती तयारीही केली होती. मात्र पहाटे भिवंडी येथे इमारत दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी भिवंडी येथे धाव घेतली. मदतकार्य वेगाने सुरू झाले. त्यानंतर हा लोकार्पण कार्यक्र म रद्द करण्यात आला.परंतू केवळ अधिकृत उदघाटन झाले नाही म्हणून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवणे आणि वाहनधारकांची गैरसोय करणे बरोबर नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला उद्घाटननाची वाट न पाहता पुलाची मार्गिका खुली करून वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमएमआरडीएचे सह आयुक्त बी. जी. पवार यांनी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेला तसे आदेश दिल्यानंतर ही मार्गिका वाहतूक शाखेने सोमवारपासून अधिकृतरित्या सुरु केली.*२०१९ मध्ये या आठ पदरी उड्डाणपूलाच्या विरुद्ध बाजूच्या चार पदरी मार्गिकेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले होते. आता दुसऱ्या बाजूचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, उद्घाटनाऐवजी ही मार्गिका थेट सुरु करण्यात आली आहे.

‘‘ २०१३ मध्ये या आठ पदरी उड्डाणपूलाचे बांधकाम सुरु झाले. त्यापैकी एक बाजू २०१९ मध्ये सुरु झाली. तर दुसरी बाजू आता सुरु करण्यात आली. मुंबई नाशिक मार्गावरील वाहनधारकांची दोन्ही बाजूंनी २० ते २५ मिनिटांची बचत होणार आहे. शिवाय, वाहतूक कोंडीही आता फुटणार आहे.’’बी. जी. पवार, सह आयुक्त, एमएमआरडीए, मुंबई

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूकMaharashtraमहाराष्ट्र