शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊननंतर उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:44 IST

उल्हासनगर : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शहरात लॉकडाऊन काळात गुन्हेगारीची संख्या कमी झाली होती. मात्र, काही महिन्यांत हत्या, बलात्कार, चोऱ्या, ...

उल्हासनगर : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शहरात लॉकडाऊन काळात गुन्हेगारीची संख्या कमी झाली होती. मात्र, काही महिन्यांत हत्या, बलात्कार, चोऱ्या, हाणामारी, घरफोडी, फसवणूक आदींच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. पोलीस या प्रकाराने हैराण झाले असून, नागरिकांच्या मनातही भीतीने घर केले आहे.

उल्हासनगर गुन्हेगारीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे शहर आहे. दर मंगळवारी येथे हत्या झाल्याची चर्चा आजही होते. लाॅकडाऊनच्या काळात शहरातील गुन्हेगारी एखादाअपवाद वगळता पूर्णपणे थांबली हाेती. मात्र, लाॅकडाऊन उठताच त्यात माेठी वाढ झाली असून, पोलीस हैराण झाले आहेत. गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापे मारून कारवाई केली. जुगार व अंमली पदार्थांच्या नशेतून गुन्हेगारी वाढल्याचे बोलले जात असून, गुन्हेगारांचे वय १५ वर्षांपासून २५ वयोगटामधील असल्याने चिंता व्यक्त होत आहे. नंग्या तलवारीने भररस्त्यात केक कापून हाणामारी करणे, दुकान व घरफोडी, हत्या, बलात्कार, फसवणूक, वाहनचोरी आदींच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने नागरिकांना शहरात भरदिवसा फिरतानाही भीती वाटत आहे.

उल्हासनगर रेल्वेस्टेशनच्या स्कायवॉकवर रात्री ९ वाजता अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन शेजारच्या बंद रेल्वे क्वाटर्समध्ये बलात्कार करणे, सख्ख्या मामाने आठ वर्षांच्या मुलीवर केलेला बलात्कार, गायकवाडपाड्यात पत्नीची हत्या, क्षुल्लक व वर्चस्वाच्या वादातून मित्राचा भरदिवसा साथीदारांच्या मदतीने खून करणे, मोबाईल व इयर फोन घेतल्याच्या वादातून मित्राची हत्या आदी घटना गेल्या आठवड्यात घडल्याने शहर हादरले. दाेन महिन्यांत हाणामारी, चोऱ्या, फसवणूक, वाहन चोरी आदी गुन्ह्यांतही वाढ झाली आहे. पोलिसांनी खून व बलात्कार आदी गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद केले आहे. एकूण गुन्ह्यांच्या संख्येबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता ताे हाेऊ शकला नाही. पोलीस उपायुक्त कार्यालयाने गुन्ह्यांच्या संख्येत झालेल्या वाढीबाबत माहिती देण्याचे टाळले.

चौकट

उपमहापाैरांनाही वाटते असुरक्षित

शहरात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे रिपब्लिकन पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि उल्हासनगरचे उपमहापाैर भगवान भालेराव यांनी शनिवारपासून स्वसंरक्षणासाठी दाेन बंदूकधारी खासगी जवान ठेवले असल्याची माहिती दिली. त्यामुळे शहराचा उपमहापाैरही सुरक्षित नसल्याची चर्चा सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांनी गुन्हेगारांना आश्रय दिला असल्याने तेही गुन्हेगारीबाबत आवाज उठवताना दिसत नाहीत.