शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रेल्वेच्या एकाच पादचारी पुलाचा दोनदा शुभारंभ, शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीनेही फोडला नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 16:34 IST

कळव्यातील रेल्वे पादचारी पुलाच्या मुद्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. शुक्रवारी या पुलाचा शुभारंभ शिवसनेने केला असतांना शनिवारी राष्ट्रवादीने सुध्दा या पुलाचा पुन्हा शुभारंभ केला आहे. या दोघांनी ही आपल्यामुळेच हा पुल झाल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देमोठ्या संघर्षानंतर पुल झाला तयार - राष्ट्रवादीचा दावाश्रेयाची लढाई सुरु

ठाणे - काही दिवसांपूर्वी मंजुर नसलेल्या रेल्वे पादपाची भुमीपुजनाच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी  आणि शिवसेनेचा वाद विकोपाला गेला होता. त्यानंतर आता कळवा - खारेगावला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या शुभारंभाच्या मुद्यावरुन सुध्दा शिवसेना, राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळीच या पुलाचा शुभारंभ शिवसेनेने उरकून घेतला होता. परंतु शनिवारी पुन्हा त्याच रेल्वे पादचारी पुलाचा शुभारंभ राष्ट्रवादीने केला. त्यामुळे येत्या काळात शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी  असा सामना कळव्यात चांगलाच रंगणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे.कळवा-खारीगाव पूर्व -पश्चिमेला जोडणारा पादचारी पुलाचा शुभारंभ शुक्रवारी सांयकाळी शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाला होता. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे येथे पादचारी उभारण्यासाठी खासदार श्रीकांते शिंदे यांनी या पुलाची मागणी केल्याचा दावा शिवसेनेने केला. परंतु आता त्याच पुलाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत या पुलाच्या अपघातात दगावलेल्या मुलींच्या आईनेच आव्हाड यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले.                     ईश्वर नगर - इंदिरा नगर, सर्वेश्वर सोसायटीजवळ रेल्वे रु ळांवर पादचारी पुल नसल्यामुळे नागरिकांना रु ळ ओलांडावे लागत होते. या ठिकाणी रेल्वे रु ळ ओलांडताना श्वेता आणि कांचन आनंद दाखणिकर या दोन मुलींचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर आ. जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी पूल उभारावा, या मागणीसाठी प्रचंड मोठा रेल रोको केला होता. त्यावेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी आ. आव्हाड यांची भेट घेऊन या ठिकाणी पूल उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. हा पुल पूर्ण झाला असून शनिवारी सकाळी ११ वाजता आव्हाड, श्वेता आणि कांचन यांची मातोश्री पुष्पा आनंद दाखणिकर यांनी या पुलाचे उद्घाटन केले. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांपजे, विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, नगरसेवक प्रकाश बर्डे, महेश साळवी, नगरसेविका वर्षा मोरे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. आव्हाड यांनीसुध्दा अशा प्रकारे दावा केल्याने नेमका पुल कोणाच्या पाठपुराव्यामुळे झाला, याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वेtmcठाणे महापालिका