शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

अंतिम नोटिशीनंतरही कारवाई थंडच!

By admin | Updated: January 29, 2017 02:58 IST

पश्चिमेतील शिवाजी चौक ते महमदअली चौक मार्गावरील बहुचर्चित वाढीव बांधकामांचा मुद्दा वारंवार स्थायी समिती आणि महासभेत गाजला आहे. असे असतानाही त्या

कल्याण : पश्चिमेतील शिवाजी चौक ते महमदअली चौक मार्गावरील बहुचर्चित वाढीव बांधकामांचा मुद्दा वारंवार स्थायी समिती आणि महासभेत गाजला आहे. असे असतानाही त्या बांधकामांवर आजवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या वाढीव बांधकामांना अंतिम नोटीस बजावूनही या कारवाईकडे आयुक्त ई. रवींद्रन यांचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्यांची ही भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.जानेवारी २०१६ मध्ये रेल्वेस्थानक परिसराकडे जाणाऱ्या शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. या कारवाईत रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील दुकानांच्या वाढीव बांधकामांवर हातोडा घालण्यात आला. यात काही इमारतीही होत्या. या रस्ता रुंदीकरणात बांधकामे बाधित झालेल्या काही व्यापाऱ्यांनी सर्रासपणे पुनर्वसन आणि दुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बांधकामे केली आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षतेमुळे रस्तारुंदीकरणात बाधित झालेल्या व्यापाऱ्यांचे चांगभले झाल्याचे वास्तव पाहावयास मिळत आहे. याप्रकरणी वारंवार स्थायी समितीच्या सभेत मोहन उगले यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा मुद्दा उपस्थित केला. यात प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांना निलंबित करा, असे ठरावही करण्यात आले. परंतु, याला अनेक महिने उलटूनही वानखेडे हे त्यांच्या जागी जैसे थे आहेत. नोव्हेंबरमध्ये झालेल्या महासभेत हा वाढीव बांधकामांचा मुद्दा स्थानिक नगरसेवक श्रेयस समेळ यांनी सभा तहकुबीद्वारे मांडला होता. जूनपासून या बेकायदा बांधकामांबाबत तक्रारी करीत आहे. परंतु, आजवर कारवाई झालेली नाही. वाढीव बांधकाम केलेल्या दुकानदारांची नावांसह तक्रार केली तसेच परवानगी दिल्याबाबत नगररचना विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु, त्यांच्याकडूनही ठोस असे उत्तर देण्यात आले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. अशा बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी उपायुक्त सुरेश पवार आणि वानखेडे यांनी आपल्या नावाने ८ लाख रुपये मागितल्याचा गौप्यस्फोट करीत समेळ यांनी सभागृहात एकच खळबळ उडवून दिली होती. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध म्हणून ती महासभा पूर्णपणे तहकूब करण्यात आली होती. दरम्यान, दोन महिने उलटूनही वाढीव बांधकामांची एक वीटही हललेली नाही. डिसेंबरमध्ये प्रशासनाने बांधकामधारकांना अंतिम नोटीस बजावून १५ दिवसांत स्वत: वाढीव बांधकामे तोडून घेण्यास सांगितले होते. परंतु, याला देखिल महिना उलटून ठोस कृती झालेली नाही. (प्रतिनिधी)