शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाच वर्षांनंतर परभणीच्या मुलाला मिळाले आईवडिलांचे छत्र

By जितेंद्र कालेकर | Updated: December 18, 2017 23:30 IST

परभणीतून ठाण्यात चार वर्षांपूर्वी आलेल्या १४ वर्षीय मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात ठाण्याच्या नौपाडा पोलिसांना यश आले आहे. एका मोबाईल चोरीच्या चौकशीतून पोलिसांनी हा उलगडा केला.

ठळक मुद्देएका चोरीच्या चौकशीतून उलगडले सत्यचोर भलताच असल्यामुळे महिलेने तक्रार घेतली मागेव्हॉटसअ‍ॅपच्या सहाय्याने पोलिसांना लावला पालकांचा शोध

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका मोबाईल चोरीच्या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेल्या मुलाची कसून चौकशी केल्यानंतर तो परभणीचा असून तो घरातून पळून आल्याची माहिती उघड झाली. खरा चोर दुसराच असल्याचे माहिती झाल्यानंतर व्हॉटसअ‍ॅपच्या आधारे नौपाडा पोलिसांनी या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. पाच वर्षांनी आपला मुलगा पुन्हा मिळाल्याने या पालकांचा आनंद गगनात मावत नव्हता.ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटीस परिसरात असलम सलीम शेख (१४) हा मुलगा गेल्या काही दिवसांपासून महिलांची सौंदर्य प्रसाधने फेरीने विक्रीचा व्यवसाय करीत होता. नामदेववाडीत राहणा-या ठाणे महापालिकेच्या सफाई कामगार शुभांगी देवधर यांनी त्याला चार महिन्यांपूर्वी मोबाईल दिला हाता. या मोबाईलवर तो ‘गेम’ खेळत असे. पण या मोबाईलसह तो अचानक बेपत्ता झाला. नंतर त्याची आणि देवधर यांची भेटच झाली नाही. १५ डिसेंबर रोजी तो पुन्हा ठाणे रेल्वे स्थानक परिसरात विक्री करतांना आढळला. तेंव्हा त्याला घेऊन त्या नौपाडा पोलीस ठाण्यात आल्या. सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर यांनी त्याची विचारपूस केली तेव्हा तो वेगवेगळी उत्तरे देत होता. अखेर विश्वासात घेतल्यानंतर त्याने परभणीतून पळून आल्याचे सांगितले. पळून येण्याचे नेमके कारण सांगितले नाही. पण, गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वीच एका रेल्वेने ठाण्यात आल्याचे तो म्हणाला. ज्या मोबाईल चोरीबाबत त्याच्यावर संशय होता. तो मोबाईल मात्र त्याच्याकडून एका गर्र्दुल्याने हिसकावून पळ काढला होता. त्यामुळे आता मोबाईल त्या महिलेला द्यायचा कसा? या भीतीने त्याने तिला तोंड दाखविले नव्हते. या सर्वच बाबींचा उलगडा झाल्यामुळे देवधर यांनीही मोबाईल जुना होता. त्यामुळे आपली या मुलाविरुद्ध काहीच तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले.मुलाने दिलेला परभणीतील पाथरी, गुलशननगर येथील पत्ता तसेच शाळा आणि शिक्षकांच्या माहितीच्या आधारे तसेच आई नजमा, मामा फारुख अशा खाणाखुणा त्याने सांगितल्यानतर हा मुलगा खरोखर चार वर्षांपूर्वीच परभणीतून बेपत्ता झाल्याची बाब चौकशीत उघड झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निरीक्षक प्रकाश पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक ओउळकर यांनी व्हॉटसअ‍ॅपवरुन त्याचा फोटो परभणीच्या पाथरी पोलिसांना पाठविला. तेथील एका लोकप्रतिनिधीकडूनही याबाबतची खात्री झाली. असलम सुखरुप असल्याची माहिती मिळाल्यानंतर परभणीतील त्याचा चुलत भाऊ अमिर शेख रशीद आणि आत्ये भाऊ शफी शेख हे ठाण्यात आले. नौपाडा पोलिसांनी शनिवारी रात्री असलमला अखेर त्याच्या नातेवाईकांच्या सुपूर्द केले. पाच वर्षांनंतर आपला मुलगा सुखरुप मिळाल्यानंतर शेख कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.‘माणूसकीच्या भावनेतून घेतला शोध’असलमची सुरुवातीलाच विचारपूस करणा-या सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर यांनी आपण माणूसकीच्या भावनेतून या मुलाच्या पालकांचा शोध घेतल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. तो आता वाम मार्गाला नसला तरी अगदी लहान वयात आई वडीलांपासून दुरावला. शिवाय, ठाण्यासारख्या अनोख्या शहरात त्याचे कोणीही नातेवाईक नाही. तो आणखी कोठेही भरकटू नये किंवा भविष्यात कोणत्याही वाम मार्गाला लागू नये म्हणून त्याच्या नातेवाईकांची भेट होईपर्यंत पोलीस ठाण्यातच दोन दिवस आस्थेने त्याचा सांभाळही केला. त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द केल्यानंतर आम्हालाही समाधान लाभल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेPolice Stationपोलीस ठाणे