शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर भाजपाचे गिरे तो भी टांग उपर

By admin | Updated: September 11, 2015 00:49 IST

त्या २७ गावांना घेऊनच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका घ्याव्यात, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे केडीएमसी परिसरात भाजपाला चपराक, अशा आशयाचे मेसेज

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीत्या २७ गावांना घेऊनच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका घ्याव्यात, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे केडीएमसी परिसरात भाजपाला चपराक, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावरून पसरविले जात आहेत. मात्र, हा निर्णय आयोगाने दिला असून मुख्यमंत्र्यांनी केवळ लोकभावना ओळखून जीआर काढला होता, असा पवित्रा भाजपाने घेतला आहे. तसेच आता आयोगाने त्याबाबतचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री काय करणार, अशी गिरे तो भी टांग उपर, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.भाजपाच्या या खेळीमुळेही तीन दिवसांपासून मौनं सर्वार्थ साधनम् ही भूमिका घेतलेल्या शिवसेनेला या निर्णयामुळेही संजीवनी मिळाली नाही. मंगळवारच्या रात्रीपासून बुधवारच्या संध्याकाळपर्यंत पक्षाने कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात होते. राज्य शासनाच्या निर्णयामुळे अनेक इच्छुकांनी तातडीने दुकाने (आॅफिस) बंद करून बघ्याची भूमिका घेतली होती. अशांनी आयोगाचा निर्णय येताच गुरुवारी सकाळपासून पुन्हा कार्यालये थाटून त्यात ठाण मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांमध्ये नवख्यांविषयी चर्चा होती.मनसेच्या नेत्यांसह नगरसेवक, शहर कार्यकारिणीला गुरुवारी संध्याकाळी पक्षाध्यक्षांनी मुंबईत बोलावले होते. त्यामुळे त्यांना काय सूचना मिळतात, याकडे येथील तळागाळातला कार्यकर्ता नजर ठेवून आहे. गेल्या दोन दिवसांत त्या पक्षानेही भूमिका स्पष्ट न केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचीही कोंडी झाली होती.गुरुवारी तर्कांना उधाणआयोगाच्या या निर्णयामुळे काहींनी हे असेच होणार होते. संघर्ष समितीच्या राजकारणात भाजपा उजवी ठरली. त्यामुळे त्याचा फटका साहजिकच शिवसेनेला बसेल. मुख्यमंत्र्यांनी चांगुलपणाचा आव आणून चांगली खेळी केली. संघर्ष समितीचे जे उमेदवार असतील, ते भाजपप्रणीत असतील, अशा नानाविध तर्कवितर्कांना गुरुवारी दिवसभर उधाण आले होते.आयोगाच्या या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेणारजे नेते २० वर्षे संघर्ष करीत आहेत, ते स्थानिकांच्या न्यायहक्कासाठी धडपडत आहेत. त्यांना न्याय मिळायलाच हवा. आयोगाच्या निकषांवर आक्षेप असून त्याविरोधात दाद मागणारच. - नरेंद्र पवार, आमदार