शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

भिवंडीतील निकृष्ट बांधकामाच्या आरोपानंतर एका वर्षाने चौकशीसाठी अधिकारी दाखल

By नितीन पंडित | Updated: November 17, 2022 18:02 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागाने ४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश काढून भिवंडी चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळरोपवाटीका बळकटीकरण योजने अंतर्गत पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यास मंजुरी दिली.

भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या आवारात फलोत्पादन विभागाच्या रोपवाटिकेस पाणी सिंचनासाठी पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या २५ हजार लिटर साठवणूक क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकी चे काम निकृष्ट व तकलादू केले असून योजना पूर्ण होण्या आधीच ठेकेदारास काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देत सर्व रक्कम अदा केल्याचा धक्कादायक प्रकार एक वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी उघडकीस आणून चौकशीची मागणी केली असता तब्बल एक वर्ष नंतर चौकशी अधिकारी सदर कामात झालेल्या भ्रष्टाचारी चौकशी करण्यासाठी बुधवारी भिवंडीत दाखल होत या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

राज्य शासनाच्या कृषी विभागाने ४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश काढून भिवंडी चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळरोपवाटीका बळकटीकरण योजने अंतर्गत पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यास मंजुरी दिली. ठाणे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत फळ रोपवाटिका असलेल्या ठिकाणी असलेल्या विहिरीतील पाणी २५ हजार लिटर साठवणूक क्षमता असलेली पाण्याची काँक्रीट टाकी उभारणीसाठी ३२ लाख ६४ हजार २१ रुपये व बोअर वेळ बांधण्यासाठी ८ लाख ६३ हजार ४२ रुपये अशा ४१ लाख २७ हजार ६३ रुपये एकत्रित खर्चास मंजुरी देण्यात आली परंतु उभारण्यात आलेली टाकी ही जुन्या काँक्रीट पिलर्स वरच उभारली असून त्यासाठी तकलादू साहित्य वापरात निकृष्ट काम केले असल्याची तक्रार परेश चौधरी यांनी केली होती. टाकीस ठेकेदाराने प्लास्टर न करताच रंगरंगोटी केली असून बोअरवेल लावली नसतानाच कृषी विभागाने ठेकेदारास सर्व रक्कम अदा केल्याचे पुरावे परेश चौधरी यांनी उघडकीस आणले होते.

या बाबत तक्रार केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होत त्यांनी या कामाची चौकशी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागातील जलसंधारण अधिकारी डी एम जोकार हे बुधवारी जलसंधारण अधिकारी आर पी पिलवानी, पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाच्या विजया पांढरे व तक्रारदार परेश चौधरी यांच्यासोबत घटनास्थळी चौकशी करण्यसाठी दाखल झाले. तक्रारीच्या अनुषंगाने पाण्याची टाकी, विहिरीची दुरुस्ती,बोअरवेल या सर्वांची पाहणी केली असता ही कामे पूर्ण झाली असून असल्याचे निदर्शनास येत आहे. या कामातील भ्रष्टाचार व निकृष्ट असल्याबाबत जे चौकशीत आढळून येईल ते चौकशी अहवालाच्या माध्यमातून वरिष्ठांकडे सादर करणार असल्याची माहिती चौकशी अधिकारी डीएम जोकार यांनी दिली आहे. तक्रार केल्यानंतर तब्बल एक वर्षाने चौकशी साठी अधिकारी येतात या वरून प्रशासन या तक्रारी बाबत किती गांभीर्य बाळगते हे स्पष्ट होत असल्याचे सांगत रोपवाटीकेत विहीर असून तेथील पाणी थेट रोपवाटीकेत देणे शक्य असताना त्यासाठी लाखो रुपयांची उधळण करीत साठवणूक टाकी फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी उभारण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी शेवटी केला आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी