शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील निकृष्ट बांधकामाच्या आरोपानंतर एका वर्षाने चौकशीसाठी अधिकारी दाखल

By नितीन पंडित | Updated: November 17, 2022 18:02 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागाने ४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश काढून भिवंडी चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळरोपवाटीका बळकटीकरण योजने अंतर्गत पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यास मंजुरी दिली.

भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या आवारात फलोत्पादन विभागाच्या रोपवाटिकेस पाणी सिंचनासाठी पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या २५ हजार लिटर साठवणूक क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकी चे काम निकृष्ट व तकलादू केले असून योजना पूर्ण होण्या आधीच ठेकेदारास काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देत सर्व रक्कम अदा केल्याचा धक्कादायक प्रकार एक वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी उघडकीस आणून चौकशीची मागणी केली असता तब्बल एक वर्ष नंतर चौकशी अधिकारी सदर कामात झालेल्या भ्रष्टाचारी चौकशी करण्यासाठी बुधवारी भिवंडीत दाखल होत या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

राज्य शासनाच्या कृषी विभागाने ४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश काढून भिवंडी चाविंद्रा येथील कृषी विभागाच्या फळरोपवाटीका बळकटीकरण योजने अंतर्गत पाण्याची टाकी व बोअरवेल उभारण्यास मंजुरी दिली. ठाणे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत फळ रोपवाटिका असलेल्या ठिकाणी असलेल्या विहिरीतील पाणी २५ हजार लिटर साठवणूक क्षमता असलेली पाण्याची काँक्रीट टाकी उभारणीसाठी ३२ लाख ६४ हजार २१ रुपये व बोअर वेळ बांधण्यासाठी ८ लाख ६३ हजार ४२ रुपये अशा ४१ लाख २७ हजार ६३ रुपये एकत्रित खर्चास मंजुरी देण्यात आली परंतु उभारण्यात आलेली टाकी ही जुन्या काँक्रीट पिलर्स वरच उभारली असून त्यासाठी तकलादू साहित्य वापरात निकृष्ट काम केले असल्याची तक्रार परेश चौधरी यांनी केली होती. टाकीस ठेकेदाराने प्लास्टर न करताच रंगरंगोटी केली असून बोअरवेल लावली नसतानाच कृषी विभागाने ठेकेदारास सर्व रक्कम अदा केल्याचे पुरावे परेश चौधरी यांनी उघडकीस आणले होते.

या बाबत तक्रार केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होत त्यांनी या कामाची चौकशी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागातील जलसंधारण अधिकारी डी एम जोकार हे बुधवारी जलसंधारण अधिकारी आर पी पिलवानी, पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाच्या विजया पांढरे व तक्रारदार परेश चौधरी यांच्यासोबत घटनास्थळी चौकशी करण्यसाठी दाखल झाले. तक्रारीच्या अनुषंगाने पाण्याची टाकी, विहिरीची दुरुस्ती,बोअरवेल या सर्वांची पाहणी केली असता ही कामे पूर्ण झाली असून असल्याचे निदर्शनास येत आहे. या कामातील भ्रष्टाचार व निकृष्ट असल्याबाबत जे चौकशीत आढळून येईल ते चौकशी अहवालाच्या माध्यमातून वरिष्ठांकडे सादर करणार असल्याची माहिती चौकशी अधिकारी डीएम जोकार यांनी दिली आहे. तक्रार केल्यानंतर तब्बल एक वर्षाने चौकशी साठी अधिकारी येतात या वरून प्रशासन या तक्रारी बाबत किती गांभीर्य बाळगते हे स्पष्ट होत असल्याचे सांगत रोपवाटीकेत विहीर असून तेथील पाणी थेट रोपवाटीकेत देणे शक्य असताना त्यासाठी लाखो रुपयांची उधळण करीत साठवणूक टाकी फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी उभारण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी शेवटी केला आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी