शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

रिक्षांचे २२ हजार परवाने बाद

By admin | Updated: December 4, 2015 00:49 IST

मुदतबाह्य झालेल्या रिक्षा परवान्यांची संख्या वाढल्याने विविध शुल्क भरून ते परवाने नूतनीकरण करण्याची अभय योजना शासनाने हाती घेतली. या मोहिमेला ठाणे आणि पालघर

- पंकज रोडेकर,  ठाणेमुदतबाह्य झालेल्या रिक्षा परवान्यांची संख्या वाढल्याने विविध शुल्क भरून ते परवाने नूतनीकरण करण्याची अभय योजना शासनाने हाती घेतली. या मोहिमेला ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून अल्प प्रतिसाद लाभल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे २६ हजारांपैकी ४ हजार २८९ रिक्षा परवानाधारकांनी मोहिमेचा लाभ घेतला. त्यामुळे उर्वरित जवळपास २२ हजार १३२ रिक्षा परवाने कायमस्वरूपी बाद ठरले आहेत. त्यांना आता नव्या लॉटरी पद्धतीतही भाग घेता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मोहिमेत १२ कोटी ६४ लाखांहून अधिक रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. सर्वाधिक जास्त दंडवसुली कल्याण विभागातून तर सर्वात कमी वसई विभागातून झाली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) १९९७ पासून आतापर्यंत जवळपास २६ हजार १३२ हजार रिक्षांचेपरवाने मुदतबाह्य झाले होते. ते परवाने नियमानुसार मुदत संपल्यावर सहा महिन्यांत नूतनीकरण न के ल्यास ते रद्द होतात. अशा प्रकारे रद्द झालेल्या परवानाधारकांचे परवाने नूतनीकरणासाठी शासनाने १आॅक्टोबर ते ३१ नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम राबवली होती. याचदरम्यान, दोन वेळेला वाढीव मुदत दिली होती. तरीसुद्धा, त्याला अल्प प्रतिसाद लाभल्याचे दिसते. या मोहिमेंतर्गत ४ हजार २८९ जणांनी महाराष्ट्र मोटार वाहन नियमातील तरतुदीनुसार दरमहा १०० रुपये भरून परवाने नूतनीकरण केले आहेत. ही मोहीम गरजू परवानाधारक तसेच वृद्ध व निराधार महिलांच्या सोयीसाठी राबवण्यात आली होती.शेवटच्या दिवशी दोन कोटींहून अधिक वसुलीशेवटच्या दिवशी ८१५ परवानाधारकांनी परवाने नूतनीकरण केले आहेत. यामध्ये ठाण्यात ३१९, कल्याण- २१६, नवी मुंबई २३२ आणि वसईत ४८ नूतनीकरणाची संख्या आहे. ८१५ परवानाधारकांक डून दोन कोटी ३३ लाख १७ हजार ३३६ रुपये दंड वसूल केला. नूतनीकरण न करण्यामागची कारणेपरवानाधारकाचा मृत्यू झाला असावा, तसेच त्याची नूतनीकरणाची इच्छा नसावी, आर्थिक अडचणी आदी बाबींची शक्यता नाकारता येत नाही. आरटीओ कारवाईचा तक्ताविभागमुदतबाह्य आॅटो रिक्षाकायमस्वरूपीदंड परवाने नूतनीकरण संख्याबाद परवानेवसुलीठाणे७४९३१४८६६००७३,७१,५४,३९९कल्याण१००५११७७२८२७९६,४२,११,९०८नवी मुंबई५३७३८९०४४८३२,१६,१०,५००वसई३५०४१४१३३६३३४,९६,९०६एकूण२६१३२४२८९२२,१३२१२,६४,७३,७१३युनियनच्या सहमतीने शुल्क निश्चित केले होते. त्यानुसार, शुल्क आकारून नूतनीकरण मोहीम शासनाने राबवली. ज्यांनी याचा लाभ घेतला नाही, त्या उर्वरितांचे परवाने आता कायमस्वरूपी बाद झाले आहेत. तसेच त्यांना नव्या कोणत्याच लॉटरी पद्धतीत सहभागी होता येणार नाही. - विकास पांडकर, आरटीओ अधिकारी, ठाणे