शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रिक्षांचे २२ हजार परवाने बाद

By admin | Updated: December 4, 2015 00:49 IST

मुदतबाह्य झालेल्या रिक्षा परवान्यांची संख्या वाढल्याने विविध शुल्क भरून ते परवाने नूतनीकरण करण्याची अभय योजना शासनाने हाती घेतली. या मोहिमेला ठाणे आणि पालघर

- पंकज रोडेकर,  ठाणेमुदतबाह्य झालेल्या रिक्षा परवान्यांची संख्या वाढल्याने विविध शुल्क भरून ते परवाने नूतनीकरण करण्याची अभय योजना शासनाने हाती घेतली. या मोहिमेला ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून अल्प प्रतिसाद लाभल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे २६ हजारांपैकी ४ हजार २८९ रिक्षा परवानाधारकांनी मोहिमेचा लाभ घेतला. त्यामुळे उर्वरित जवळपास २२ हजार १३२ रिक्षा परवाने कायमस्वरूपी बाद ठरले आहेत. त्यांना आता नव्या लॉटरी पद्धतीतही भाग घेता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मोहिमेत १२ कोटी ६४ लाखांहून अधिक रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. सर्वाधिक जास्त दंडवसुली कल्याण विभागातून तर सर्वात कमी वसई विभागातून झाली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) १९९७ पासून आतापर्यंत जवळपास २६ हजार १३२ हजार रिक्षांचेपरवाने मुदतबाह्य झाले होते. ते परवाने नियमानुसार मुदत संपल्यावर सहा महिन्यांत नूतनीकरण न के ल्यास ते रद्द होतात. अशा प्रकारे रद्द झालेल्या परवानाधारकांचे परवाने नूतनीकरणासाठी शासनाने १आॅक्टोबर ते ३१ नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम राबवली होती. याचदरम्यान, दोन वेळेला वाढीव मुदत दिली होती. तरीसुद्धा, त्याला अल्प प्रतिसाद लाभल्याचे दिसते. या मोहिमेंतर्गत ४ हजार २८९ जणांनी महाराष्ट्र मोटार वाहन नियमातील तरतुदीनुसार दरमहा १०० रुपये भरून परवाने नूतनीकरण केले आहेत. ही मोहीम गरजू परवानाधारक तसेच वृद्ध व निराधार महिलांच्या सोयीसाठी राबवण्यात आली होती.शेवटच्या दिवशी दोन कोटींहून अधिक वसुलीशेवटच्या दिवशी ८१५ परवानाधारकांनी परवाने नूतनीकरण केले आहेत. यामध्ये ठाण्यात ३१९, कल्याण- २१६, नवी मुंबई २३२ आणि वसईत ४८ नूतनीकरणाची संख्या आहे. ८१५ परवानाधारकांक डून दोन कोटी ३३ लाख १७ हजार ३३६ रुपये दंड वसूल केला. नूतनीकरण न करण्यामागची कारणेपरवानाधारकाचा मृत्यू झाला असावा, तसेच त्याची नूतनीकरणाची इच्छा नसावी, आर्थिक अडचणी आदी बाबींची शक्यता नाकारता येत नाही. आरटीओ कारवाईचा तक्ताविभागमुदतबाह्य आॅटो रिक्षाकायमस्वरूपीदंड परवाने नूतनीकरण संख्याबाद परवानेवसुलीठाणे७४९३१४८६६००७३,७१,५४,३९९कल्याण१००५११७७२८२७९६,४२,११,९०८नवी मुंबई५३७३८९०४४८३२,१६,१०,५००वसई३५०४१४१३३६३३४,९६,९०६एकूण२६१३२४२८९२२,१३२१२,६४,७३,७१३युनियनच्या सहमतीने शुल्क निश्चित केले होते. त्यानुसार, शुल्क आकारून नूतनीकरण मोहीम शासनाने राबवली. ज्यांनी याचा लाभ घेतला नाही, त्या उर्वरितांचे परवाने आता कायमस्वरूपी बाद झाले आहेत. तसेच त्यांना नव्या कोणत्याच लॉटरी पद्धतीत सहभागी होता येणार नाही. - विकास पांडकर, आरटीओ अधिकारी, ठाणे