शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जमत नसेल तर बदली करून घेण्याचा सल्ला; महापालिका आयुक्तांना राज्यमंत्र्यांचे खरमरीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:21 IST

डोंबिवलीतील स्कायवॉक व अत्यंत वर्दळीच्या रेल्वेस्थानक परिसरात बेकायदा फेरीवाल्यांचा उपद्रव सहनशक्तीच्या पलिकडे गेला आहे.

डोंबिवली : फेरीवाल्यावर झालेला प्राणघातक हल्ला, तसेच सोमवारी दोन गटांतील हाणामारीनंतर आता राजकीय पक्षांना जाग आली आहे. राज्यमंत्री व भाजपचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण यांनी फेरीवाल्यांचे समूळ उच्चाटन करण्याकडे लक्ष वेधताना जर हे प्रशासनाला जमत नसेल तर अशा कुचकामी प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण बदली करून घ्यावी, असे खरमरीत पत्र आयुक्त गोविंद बोडके यांना पाठविले आहे. दुसरीकडे फेरीवाला अतिक्रमणावर अवमान याचिका दाखल करण्याच्या बाता करणाऱ्या मनसेनेही पदपथावरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

१४ आॅक्टोबरला व्यवसायासाठी रस्त्यावर बसण्याच्या जागेवरून सलाउद्दीन शेख याने जाफर इंद्रिसी याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. यानंतर सोमवारी पुन्हा फेरीवाल्यांच्या दोन गटांत राडेबाजी झाली. महत्त्वाचे म्हणजे उच्च न्यायालयाने मनाई केलेल्या हद्दीत हा प्रकार घडला. या मारहाणीप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असताना राजकीय पक्षांनी या संदर्भात केडीएमसी प्रशासनावर झोड उठविली आहे. चव्हाण यांनी बोडके यांना खरमरीत पत्र पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डोंबिवलीतील स्कायवॉक व अत्यंत वर्दळीच्या रेल्वेस्थानक परिसरात बेकायदा फेरीवाल्यांचा उपद्रव सहनशक्तीच्या पलिकडे गेला आहे. पूर्वेतील भागात फेरीवाल्यांच्या आपापसातील हाणामारीच्या घटनेने तर महापालिका प्रशासनाची पोलखोल झाली असल्याचे चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे. चव्हाण यांनी बोडके यांच्यावरही तोफ डागली आहे. महापालिका प्रशासनाचे प्रमुख या नात्याने फेरीवाल्यांविरोधात कठोर भूमिका आपण घेतच नसल्याचे या घटनेच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. आपल्या बोटचेप्या व कृतीशून्य प्रशासनाचा त्रास कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना वारंवार सोसावा लागत आहे. बेकायदा फेरीवाल्यांचे समूळ उच्चाटन आपल्या प्रशासनाला जमत नसेल तर अशा कुचकामी प्रशासनाचे प्रमुख या नात्याने आपण बदली करून घ्यावी हे उत्तम, अशा शब्दांत चव्हाण यांनी बोडके यांना पत्रातून खडेबोल सुनावले आहेत. महापालिका प्रशासन, कर्मचारी, अधिकारी यांच्या फेरीवाल्यांशी असलेल्या असलेल्या घनिष्ट अर्थपूर्ण संबंधामुळे राडेबाजीसारखी प्रकरणे घडतात, असाही आरोप त्यांनी केला आहे....तर हाताने ‘बोलू’: उच्च न्यायालयाने मनाई केलेल्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या फेरीवाला अतिक्रमणावर केडीएमसीविरोधात अवमान याचिका दाखल करू, असा इशारा मनसेने दिला होता. परंतु, कृतीअभावी त्या केवळ बाता ठरल्या असताना आता सोमवारच्या फेरीवाला हाणामारीप्रकरणी मनसेला पुन्हा जाग आली आहे. रस्ते साधन सुविधा व अस्थापना मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष ओम लोके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पदपथावर अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांसह व्यापाऱ्यांना मनसे स्टाइल इशारा दिला आहे. पदपथ रिकामी करा, असे आज तोंडाने सांगतोय पण पुढे हाताने ‘बोलू,’ अशा शब्दांत सुनावले आहे.आमची कारवाई सुरूच असते : दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलिसांचे असते आमचे नाही. आमची अतिक्रमणाविरोधातील कारवाई नेहमीच सुरू असते. फेरीवाला धोरणाला फेरीवाला संघटनांचा विरोध आहे, त्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि दिवाळीमुळे धोरणाची अंमलबजावणी करता आलेली नाही. परंतु, येत्या आठ ते दहा दिवसांत धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ठोस कृती होईल, असा दावा करताना आयुक्त गोविंद बोडके यांनी राज्यमंत्र्यांच्या पत्राबाबत मात्र भाष्य करणे टाळले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका