शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

जमत नसेल तर बदली करून घेण्याचा सल्ला; महापालिका आयुक्तांना राज्यमंत्र्यांचे खरमरीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:21 IST

डोंबिवलीतील स्कायवॉक व अत्यंत वर्दळीच्या रेल्वेस्थानक परिसरात बेकायदा फेरीवाल्यांचा उपद्रव सहनशक्तीच्या पलिकडे गेला आहे.

डोंबिवली : फेरीवाल्यावर झालेला प्राणघातक हल्ला, तसेच सोमवारी दोन गटांतील हाणामारीनंतर आता राजकीय पक्षांना जाग आली आहे. राज्यमंत्री व भाजपचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण यांनी फेरीवाल्यांचे समूळ उच्चाटन करण्याकडे लक्ष वेधताना जर हे प्रशासनाला जमत नसेल तर अशा कुचकामी प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण बदली करून घ्यावी, असे खरमरीत पत्र आयुक्त गोविंद बोडके यांना पाठविले आहे. दुसरीकडे फेरीवाला अतिक्रमणावर अवमान याचिका दाखल करण्याच्या बाता करणाऱ्या मनसेनेही पदपथावरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

१४ आॅक्टोबरला व्यवसायासाठी रस्त्यावर बसण्याच्या जागेवरून सलाउद्दीन शेख याने जाफर इंद्रिसी याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. यानंतर सोमवारी पुन्हा फेरीवाल्यांच्या दोन गटांत राडेबाजी झाली. महत्त्वाचे म्हणजे उच्च न्यायालयाने मनाई केलेल्या हद्दीत हा प्रकार घडला. या मारहाणीप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असताना राजकीय पक्षांनी या संदर्भात केडीएमसी प्रशासनावर झोड उठविली आहे. चव्हाण यांनी बोडके यांना खरमरीत पत्र पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डोंबिवलीतील स्कायवॉक व अत्यंत वर्दळीच्या रेल्वेस्थानक परिसरात बेकायदा फेरीवाल्यांचा उपद्रव सहनशक्तीच्या पलिकडे गेला आहे. पूर्वेतील भागात फेरीवाल्यांच्या आपापसातील हाणामारीच्या घटनेने तर महापालिका प्रशासनाची पोलखोल झाली असल्याचे चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे. चव्हाण यांनी बोडके यांच्यावरही तोफ डागली आहे. महापालिका प्रशासनाचे प्रमुख या नात्याने फेरीवाल्यांविरोधात कठोर भूमिका आपण घेतच नसल्याचे या घटनेच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. आपल्या बोटचेप्या व कृतीशून्य प्रशासनाचा त्रास कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना वारंवार सोसावा लागत आहे. बेकायदा फेरीवाल्यांचे समूळ उच्चाटन आपल्या प्रशासनाला जमत नसेल तर अशा कुचकामी प्रशासनाचे प्रमुख या नात्याने आपण बदली करून घ्यावी हे उत्तम, अशा शब्दांत चव्हाण यांनी बोडके यांना पत्रातून खडेबोल सुनावले आहेत. महापालिका प्रशासन, कर्मचारी, अधिकारी यांच्या फेरीवाल्यांशी असलेल्या असलेल्या घनिष्ट अर्थपूर्ण संबंधामुळे राडेबाजीसारखी प्रकरणे घडतात, असाही आरोप त्यांनी केला आहे....तर हाताने ‘बोलू’: उच्च न्यायालयाने मनाई केलेल्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या फेरीवाला अतिक्रमणावर केडीएमसीविरोधात अवमान याचिका दाखल करू, असा इशारा मनसेने दिला होता. परंतु, कृतीअभावी त्या केवळ बाता ठरल्या असताना आता सोमवारच्या फेरीवाला हाणामारीप्रकरणी मनसेला पुन्हा जाग आली आहे. रस्ते साधन सुविधा व अस्थापना मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष ओम लोके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पदपथावर अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांसह व्यापाऱ्यांना मनसे स्टाइल इशारा दिला आहे. पदपथ रिकामी करा, असे आज तोंडाने सांगतोय पण पुढे हाताने ‘बोलू,’ अशा शब्दांत सुनावले आहे.आमची कारवाई सुरूच असते : दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलिसांचे असते आमचे नाही. आमची अतिक्रमणाविरोधातील कारवाई नेहमीच सुरू असते. फेरीवाला धोरणाला फेरीवाला संघटनांचा विरोध आहे, त्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि दिवाळीमुळे धोरणाची अंमलबजावणी करता आलेली नाही. परंतु, येत्या आठ ते दहा दिवसांत धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ठोस कृती होईल, असा दावा करताना आयुक्त गोविंद बोडके यांनी राज्यमंत्र्यांच्या पत्राबाबत मात्र भाष्य करणे टाळले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका