शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

अ‍ॅडमिशनचे टेन्शन!

By admin | Updated: June 14, 2017 02:58 IST

यंदाचा दहावीचा निकाल चांगला लागल्याने आणि ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्याची संख्याही घसघशीत वाढल्याने अकरावीच्या अ‍ॅडमिशनसाठी प्रचंड चुरस वाढण्याची

- स्रेहा पावसकर/सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : यंदाचा दहावीचा निकाल चांगला लागल्याने आणि ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्याची संख्याही घसघशीत वाढल्याने अकरावीच्या अ‍ॅडमिशनसाठी प्रचंड चुरस वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वच फॅकल्टींची (शाखांची) कट आॅफ लिस्ट तीन ते चार टक्क्यांनी वाढण्याची चिन्हे आहेत. अकरावीची अ‍ॅडमिशन जरी आॅनलाइन असली, तरी मेरीटमधील विद्यार्थ्यांनाही आपल्या पसंतीचे कॉलेज पहिल्याच फेरीत मिळण्याची शक्यता नसल्याचे प्रमुख कॉलेजमधील प्राचार्यांचे म्हणणे आहे. यंदाचा सीबीएसईचा निकाल चांगला लागला. त्या पाठोपाठ एसएशसी बोर्डाचा निकालही घसघशीत लागला. त्यामुळे प्रवेशासाठीची चुरस प्रचंड वाढली आहे. ठाणे, डोंबिवलीतील अनेक विद्यार्थी मुंबईच्या कॉलेजला पसंती देतात. पण तेथील कट आॅफ लिस्टही साधारण चार टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज सीबीएसईच्या निकालापासून वर्तवला जात आहे. त्यात आता दहावीचा निकाल चांगला लागल्याने ठाणे जिल्ह्यातील कॉलेजमधील चुरसही कमालीची वाढली आहे. आपल्या पसंतीचे कॉलेज मिळवण्यासाठीचे टेन्शन शेवटपर्यंत कायम राहणार आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांनी निकालापूर्वीच आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरु वात केली असली, तरी मंगळवारी निकाल लागल्यावर अनेकांनी प्रमुख महाविद्यालयांच्या गेल्यावर्षीच्या कट आॅफ लिस्टची शोधाशोध सुरु केली आहे. पसंतीनुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे क्र मांक द्यावे लागतात. मात्र आपल्या मार्कानुसार पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही? अशी धाकधुक त्यांच्या मनात आहे. पहिल्या नाही, दुसऱ्या नाही तर तिसऱ्या लिस्टमध्ये तरी आपल्याला संधी मिळेल का हे पडताळण्यासाठी अनेक जण संबंधित त्यात्या महाविद्यालयांच्या गेल्या वर्षीच्या कटआॅफ लिस्टची शोधाशोध करत आहे.ठाण्यातील नामांकित महाविद्यालयांबरोबरच इतर कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये शहराबाहेरील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असते. विद्यार्थ्यांच्या वाढत्या गुणवत्तेबरोबरच दरवर्षी प्रत्येक महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांच्या कट आॅफ लिस्टमधील टक्केवारीतही वाढच होते आहे.यंदाचा जिल्हयाचा निकाल पाहता कट आॅफ कमी होऊन आपल्याला लवकर प्रवेशाची संधी मिळणार की यंदाही कट आॅफमध्ये वाढच होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्यावर्षी अपवाद वगळता बहुतांशी महाविद्यालयांची अंतिम कट आॅफ लिस्ट ही ६० हून अधिक टक्के होती. कला शाखेत के. जी. जोशी महाविद्यालयाची शेवटची कट आॅफ लिस्ट ८५.८ तर ज्ञानसाधनाची ४४.४ टक्के इतकी होती. विज्ञान शाखेत बांदोडकर कॉलेजची कट आॅफ ९१ टक्के होती. वाणिज्य शाखेसाठी बेडेकर महाविद्यालयाची ८५.८, तर त्या खालोखाल एनकेटी महाविद्यालयाची शेवटची कट आॅफ ६७.७ टक्के होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष यंदाच्या पहिल्या कट आॅफ लिस्टकडे लागले आहे. दहावी विशेष /५यंदा दहावीच्या निकालाचा टक्का वाढला. शंभर ते ९५ टक्क्यांदरम्यानच्या विद्यार्थ्यांची संख्याही कमालीची वाढली. त्यामुळे सर्वच फॅकल्टींच्या कट आॅफ लिस्टमध्ये तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ९० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचेही प्रवेशाच्या पहिल्या यादीत चांगल्या कॉलेजमध्ये नाव येईल, याची शाश्वती देता येणार नाही. - चंद्रशेखर मराठे, ज्ञानसाधना कॉलेज.