शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅडमिशनचे टेन्शन!

By admin | Updated: June 14, 2017 02:58 IST

यंदाचा दहावीचा निकाल चांगला लागल्याने आणि ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्याची संख्याही घसघशीत वाढल्याने अकरावीच्या अ‍ॅडमिशनसाठी प्रचंड चुरस वाढण्याची

- स्रेहा पावसकर/सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : यंदाचा दहावीचा निकाल चांगला लागल्याने आणि ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्याची संख्याही घसघशीत वाढल्याने अकरावीच्या अ‍ॅडमिशनसाठी प्रचंड चुरस वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वच फॅकल्टींची (शाखांची) कट आॅफ लिस्ट तीन ते चार टक्क्यांनी वाढण्याची चिन्हे आहेत. अकरावीची अ‍ॅडमिशन जरी आॅनलाइन असली, तरी मेरीटमधील विद्यार्थ्यांनाही आपल्या पसंतीचे कॉलेज पहिल्याच फेरीत मिळण्याची शक्यता नसल्याचे प्रमुख कॉलेजमधील प्राचार्यांचे म्हणणे आहे. यंदाचा सीबीएसईचा निकाल चांगला लागला. त्या पाठोपाठ एसएशसी बोर्डाचा निकालही घसघशीत लागला. त्यामुळे प्रवेशासाठीची चुरस प्रचंड वाढली आहे. ठाणे, डोंबिवलीतील अनेक विद्यार्थी मुंबईच्या कॉलेजला पसंती देतात. पण तेथील कट आॅफ लिस्टही साधारण चार टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज सीबीएसईच्या निकालापासून वर्तवला जात आहे. त्यात आता दहावीचा निकाल चांगला लागल्याने ठाणे जिल्ह्यातील कॉलेजमधील चुरसही कमालीची वाढली आहे. आपल्या पसंतीचे कॉलेज मिळवण्यासाठीचे टेन्शन शेवटपर्यंत कायम राहणार आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांनी निकालापूर्वीच आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरु वात केली असली, तरी मंगळवारी निकाल लागल्यावर अनेकांनी प्रमुख महाविद्यालयांच्या गेल्यावर्षीच्या कट आॅफ लिस्टची शोधाशोध सुरु केली आहे. पसंतीनुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे क्र मांक द्यावे लागतात. मात्र आपल्या मार्कानुसार पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही? अशी धाकधुक त्यांच्या मनात आहे. पहिल्या नाही, दुसऱ्या नाही तर तिसऱ्या लिस्टमध्ये तरी आपल्याला संधी मिळेल का हे पडताळण्यासाठी अनेक जण संबंधित त्यात्या महाविद्यालयांच्या गेल्या वर्षीच्या कटआॅफ लिस्टची शोधाशोध करत आहे.ठाण्यातील नामांकित महाविद्यालयांबरोबरच इतर कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये शहराबाहेरील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असते. विद्यार्थ्यांच्या वाढत्या गुणवत्तेबरोबरच दरवर्षी प्रत्येक महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांच्या कट आॅफ लिस्टमधील टक्केवारीतही वाढच होते आहे.यंदाचा जिल्हयाचा निकाल पाहता कट आॅफ कमी होऊन आपल्याला लवकर प्रवेशाची संधी मिळणार की यंदाही कट आॅफमध्ये वाढच होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्यावर्षी अपवाद वगळता बहुतांशी महाविद्यालयांची अंतिम कट आॅफ लिस्ट ही ६० हून अधिक टक्के होती. कला शाखेत के. जी. जोशी महाविद्यालयाची शेवटची कट आॅफ लिस्ट ८५.८ तर ज्ञानसाधनाची ४४.४ टक्के इतकी होती. विज्ञान शाखेत बांदोडकर कॉलेजची कट आॅफ ९१ टक्के होती. वाणिज्य शाखेसाठी बेडेकर महाविद्यालयाची ८५.८, तर त्या खालोखाल एनकेटी महाविद्यालयाची शेवटची कट आॅफ ६७.७ टक्के होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष यंदाच्या पहिल्या कट आॅफ लिस्टकडे लागले आहे. दहावी विशेष /५यंदा दहावीच्या निकालाचा टक्का वाढला. शंभर ते ९५ टक्क्यांदरम्यानच्या विद्यार्थ्यांची संख्याही कमालीची वाढली. त्यामुळे सर्वच फॅकल्टींच्या कट आॅफ लिस्टमध्ये तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ९० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचेही प्रवेशाच्या पहिल्या यादीत चांगल्या कॉलेजमध्ये नाव येईल, याची शाश्वती देता येणार नाही. - चंद्रशेखर मराठे, ज्ञानसाधना कॉलेज.