शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आरक्षणानुसार उमेदवार नसल्यास सरपंचाऐवजी प्रशासकीय राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 01:06 IST

सरपंचपदाचे आरक्षण : ‘पेसा’ गावात उमेदवाराची शक्यता कमी

ठाणे : जिल्ह्यातील तब्बल ४१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. त्यातून नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या १५१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड जिल्ह्यात ८ व १० फेब्रुवारी या दोन दिवसांत होणार आहे. आरक्षणानुसार होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडीसाठी संबंधित उमेदवार न मिळाल्यास सरपंचपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीवर सरकार प्रशासकाची निवड करून कामकाज पाहणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.जिल्ह्यातील मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी या निवडणुका झाल्या आहेत. १५८ पैकी १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी मतदान झाले आहे. यासाठी दोन हजार ४१३ उमेदवारांनी नशीब आजमावले आहे. आठ ग्रामपंचायतींच्या ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड आधीच झाली होती. उर्वरित पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर  बहिष्कार टाकल्यामुळे तेथे निवडणुका झाल्या नाही. या गावांमध्ये पेचजिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी ४१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण काढले आहे. त्यापैकी आता १५१ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड आहे. निवडून आलेल्या एक हजार ४१२ सदस्यांपैकी ७८६ महिला आहेत; पण आरक्षणानुसार सरपंच असल्यामुळे बहुतांश ठिकाणी पेसा असलेल्या गावांमध्ये आरक्षणानुसार उमेदवार मिळण्याची शक्यता कमी आहे.पुढे काय करणार या ग्रामपंचायतींच्या निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सरपंचपदाच्या आरक्षणास अनुसरून उमेदवार नसल्यास ग्रामपंचायत अस्तित्वात येणार नाही. त्यामुळे पुढील निवडणुकीपर्यंत ग्रामपंचायतींवर प्रशासक राज अस्तित्वात राहणार असल्याचे आतापर्यंतच्या अनुभवावरून राजकीय वतुर्ळात ऐकायला मिळत आहे.बहुमत नसताना लॉटरी जिल्ह्यात सर्वाधिक ७८६ महिला निवडून आलेल्या आहेत, तर ६२५ पुरुष विजयी झाले आहेत. पण, सरपंचपदाच्या आरक्षणानुसार जास्त सदस्य संख्या असलेल्या विरोधी गटात उमेदवार नसल्यास प्रतिस्पर्धी गटातील मागासवर्गीय उमेदवाराला सरपंचपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. बहुतांश सदस्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे.