शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

आरक्षणानुसार उमेदवार नसल्यास सरपंचाऐवजी प्रशासकीय राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 01:06 IST

सरपंचपदाचे आरक्षण : ‘पेसा’ गावात उमेदवाराची शक्यता कमी

ठाणे : जिल्ह्यातील तब्बल ४१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. त्यातून नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या १५१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड जिल्ह्यात ८ व १० फेब्रुवारी या दोन दिवसांत होणार आहे. आरक्षणानुसार होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडीसाठी संबंधित उमेदवार न मिळाल्यास सरपंचपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीवर सरकार प्रशासकाची निवड करून कामकाज पाहणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.जिल्ह्यातील मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी या निवडणुका झाल्या आहेत. १५८ पैकी १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी मतदान झाले आहे. यासाठी दोन हजार ४१३ उमेदवारांनी नशीब आजमावले आहे. आठ ग्रामपंचायतींच्या ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड आधीच झाली होती. उर्वरित पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर  बहिष्कार टाकल्यामुळे तेथे निवडणुका झाल्या नाही. या गावांमध्ये पेचजिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी ४१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण काढले आहे. त्यापैकी आता १५१ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड आहे. निवडून आलेल्या एक हजार ४१२ सदस्यांपैकी ७८६ महिला आहेत; पण आरक्षणानुसार सरपंच असल्यामुळे बहुतांश ठिकाणी पेसा असलेल्या गावांमध्ये आरक्षणानुसार उमेदवार मिळण्याची शक्यता कमी आहे.पुढे काय करणार या ग्रामपंचायतींच्या निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सरपंचपदाच्या आरक्षणास अनुसरून उमेदवार नसल्यास ग्रामपंचायत अस्तित्वात येणार नाही. त्यामुळे पुढील निवडणुकीपर्यंत ग्रामपंचायतींवर प्रशासक राज अस्तित्वात राहणार असल्याचे आतापर्यंतच्या अनुभवावरून राजकीय वतुर्ळात ऐकायला मिळत आहे.बहुमत नसताना लॉटरी जिल्ह्यात सर्वाधिक ७८६ महिला निवडून आलेल्या आहेत, तर ६२५ पुरुष विजयी झाले आहेत. पण, सरपंचपदाच्या आरक्षणानुसार जास्त सदस्य संख्या असलेल्या विरोधी गटात उमेदवार नसल्यास प्रतिस्पर्धी गटातील मागासवर्गीय उमेदवाराला सरपंचपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. बहुतांश सदस्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे.