शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

बदलापूरला अतिक्रमण कारवाईत पालिका प्रशासनाची मुजोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 05:01 IST

शहरातील रस्ते रूंद व्हावे आणि रस्त्याच्या आड येणाऱ्या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने नगरसेवकच करत होते.

पंकज पाटील, बदलापूर

शहरातील रस्ते रूंद व्हावे आणि रस्त्याच्या आड येणाऱ्या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने नगरसेवकच करत होते. प्रशासन कारवाई करत नाही अशी ओरड सातत्याने केली जात होती. नगरसेवकांचे तोंड बंद करण्यासाठी पालिकेने तीन दिवसांची कारवाई बदलापूरमध्ये केली. आधी ही कारवाई सर्वांनाच रोखठोक वाटत होती. मात्र या रोखठोक कारवाईच्या आड प्रशासनाने अनेक ठिकाणी तडजोडीचे राजकारण केल्याचे समोर आले आहे. ज्या रस्त्यांची रूंदी ६० फूट आहे त्या ठिकाणी थेट ७० फुटापर्यंत कारवाई केली. एवढेच नव्हे तर दुकान आणि घरांवर कारवाई करताना संबंधितांना १५ दिवसांची नोटीस बजावणे गरजेचे होते, मात्र ती नोटीस न बजावताच पालिकेने अनेकांची घरे आणि दुकाने जमीनदोस्त केली. दुकानांच्या वाढीव अतिक्रमणांच्या नावावर पालिकेने आपला वैयक्तिक स्वार्थ साध्य केला आहे. ज्या नागरिकांनी पालिकेला सहकार्य केले त्यांचीच दुकाने तोडून प्रशासनाने आपला मुजोरपणा दाखवला आहे.बदलापूरमधील बेकायदा शेड आणि वाढीव बांधकाम यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली होती. या कारवाई अंतर्गत शहरातील दुकानांसमोर ज्या बेकायदा शेड उभारल्या होत्या त्या दुकानांवर पालिका कारवाई करणार होती. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही होता. शहरात दोन दिवस चाललेल्या कारवाईचे स्वागतही झाले. मात्र कारवाईच्या आड पालिकेने काही ठिकाणी आपला वैयक्तिक स्वार्थही साध्य केला. शहरातील कोणत्याही अतिक्रमणांवर कारवाई करतांना पलिकेने संबंधित बांधकामांना नोटीस बजावणे गरजेचे होते. मात्र केवळ दुकानांच्या शेडवर कारवाई होणार असल्याने नोटीस बंधनकारकही नव्हते. मात्र दुकान आणि घरांवर कारवाई करताना संबंधित दुकानदारांना १५ दिवसांची नोटीस बजावणे बंधनकारक आहे.दुकानदार आणि घरमालकांना आपली बाजू मांडण्याचा आणि कागदपत्रे सादर करण्याचे अधिकार आहेत. मात्र पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्ताचा गैरवापर करून शेडच्या आड अनेक दुकाने आणि घरांवर कारवाई केली. ही कारवाई करतांना दुकानदारांना आपले सामान काढण्याची संधीही दिली नाही. नोटीस बजावल्यावर कारवाईसाठी आलेले पथक कोणालाही संधी देत नाही ही बाब मान्य आहे. मात्र नोटीस नसतांना कारवाईपूर्वी दुकानदारांना त्यांचे सामान काढण्याची संधी देणे गरजेचे असते. मात्र बेकायदा कारवाईला कायदेशीर ठरवत पालिका प्रशासनाने थेट दुकानेच तोडली. प्रशासनाची कारवाई ही सर्वज्ञात होती. मात्र कारवाई करतांना दुकान आणि घरांवर कारवाई होईल याची किंचितही कल्पना देण्यात आली नाही. दोन दिवस जी कारवाई झाली ती ग्राह्य धरली गेली. मात्र शनिवारी झालेली कारवाई ही अन्यायकारक ठरली.स्टेशन ते कात्रप चौकाकडे जाणारा डीपी रोड हा ६० फूट रूंद असतांनाही त्या ठिकाणी थेट ७० फुटांचे रूंदीकरण दाखवत थेट दुकाने तोडण्यात आली. ज्या दुकानांवर तीन वर्षापूर्वीच कारवाई करून त्यांना ६० फुटांचे अंतिम मार्किंग देण्यात आले होते. त्याच दुकानदारांनी नियमाला अधिन राहून आपल्या दुकानांची दुरूस्ती केली होती.मात्र मुख्याधिकारी बदलल्यावर पुन्हा नव्याने कारवाईचा फार्स निर्माण करून पालिकेने ६० फुटांचा रस्ता परस्पर ७० फूट करून दुकानदारांना रस्त्यावर आणण्याचे काम हाती घेतले आहे. त्या कामासाठी राजकीय दबावही वापरला गेल्याचे बोलले जात आहे.जी कारवाई नियमानुसार सुरू होती तीच कारवाई शेवटच्या दिवशी बिथरलेली होती. कात्रप भागातही अशाच प्रकारची कारवाई करत रस्त्याच्या रूंदीपेक्षा जास्तीच्या ठिकाणी कारवाई करत पालिकेने आपली दबंगगिरी दाखवली आहे.बदलापूर नगरपालिकेने बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्याने नागिकांनी स्वागत केले. मात्र पालिकेच्या कारवाईला राजकारणाचा वास आल्याने ती वादात सापडली. नोटिसा न बजावताच दुकाने जमीनदोस्त केल्याने प्रशासनाचा मुजोरपणा यानिमित्ताने उघड झाला. 

टॅग्स :thaneठाणे