शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाची टोलवाटोलवी

By admin | Updated: October 27, 2016 03:48 IST

शहरातील अनेक मॉल आणि हॉटेलच्या पोटमाळ्यांमध्ये हॉटेल सुरू असून त्यावर कारवाईची मागणी मागील स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी केली होती.

ठाणे : शहरातील अनेक मॉल आणि हॉटेलच्या पोटमाळ्यांमध्ये हॉटेल सुरू असून त्यावर कारवाईची मागणी मागील स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी केली होती. त्यानुसार, सर्व्हे करून अहवाल सादर केल्यानंतर ती केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अतिक्रमण विभागाने परवाना विभाग, परवाना विभागाने आरोग्य विभाग, आरोग्य विभागाने अग्निशमन विभाग, अग्निशमन विभागाने अन्न औषध प्रशासन अशी जबाबदारी ढकलून पळ काढला. त्यामुळे कारवाई कोण करणार, असा सवाल करून सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मागील बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई यांनी शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या, पोटमाळ्यांमधील हॉटेलच्या मुद्याला हात घालून यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार, पुढील बैठकीत यासंदर्भातील अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यानुसार, बुधवारी झालेल्या बैठकीत देसाई यांनी पुन्हा या मुद्याला हात घालून अग्निशमन विभागाने काय कारवाई केली, असा सवाल केला. यावर, अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी शशिकांत काळे यांनी कारवाईचे अधिकार हे अन्न औषध प्रशासनाचे असल्याचे सांगितले. त्यानंतर, अतिक्रमण विभागाने यावर का कारवाई केली नाही, असा सवाल त्यांनी केला. परंतु, हे अधिकार परवाना विभागाचे असल्याचे सांगून अतिक्रमण विभागानेही यातून काढता पाय घेतला. दुसरीकडे आरोग्य विभागानेदेखील दुसऱ्या विभागाकडे बोट दाखवले. त्यामुळे आता या पोटमाळ्यांमधील हॉटेलवर कारवाई कोण करणार, असा सवाल करून सदस्यांनी प्रशासनाला अडचणीत आणले. अग्निशमन विभागाने यासंदर्भात माहिती देताना एखाद्या ठिकाणी आगीने दुर्घटना होण्याची शक्यता असेल अथवा जीवितहानी होत असेल, तर त्याची माहिती सहायक आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना द्यायची असते, तसेच सहायक आयुक्तांनी दर दोन वर्षांनी अशा आस्थापनांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल आयुक्तांना देऊन कारवाई करायची अथवा नाही, याचा निर्णय घ्यायचा असतो. (प्रतिनिधी)चेंडू अतिक्रमणकडेअग्निशमन विभागाने दिलेल्या उत्तरामुळे अतिक्रमण विभागाकडे पुन्हा हा चेंडू वळला आणि त्यांनी त्यानुसार अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर, येत्या १५ दिवसांत यासंदर्भातील अहवाल सादर करावा, असे आदेश स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांनी दिले.