शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

प्रशासन-शिवसेनेत समेट

By admin | Updated: May 12, 2017 01:42 IST

काही दिवसांपासून सत्ताधारी आणि पालिका प्रशासन यांच्यात सुरू असलेल्या वादावर अखेर गुरुवारी पडदा पडला. जिल्ह्याचे

लोकमत न्यूज नेटवर्क - ठाणे : काही दिवसांपासून सत्ताधारी आणि पालिका प्रशासन यांच्यात सुरू असलेल्या वादावर अखेर गुरुवारी पडदा पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा समेट घडवून आणला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टाई करून शिवसेनेचे पालिकेतील पदाधिकारी आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यात महापौरांच्या दालनात हा समेट घडवून आणला. या वेळी शहर विकासासाठी एकत्र येण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याने सेना आणि प्रशासनामध्ये सुरू असलेल्या वादाला यानिमित्ताने पूर्णविराम मिळाला आहे. परंतु, यानंतर आता स्वीकृत आणि वृक्ष प्राधिकरण समितीचे मार्ग मोकळे होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे पालिका आयुक्त व शिवसेनेमध्ये समेट झाल्याने प्रशासनाच्या विरोधात दोन हात करण्यासाठी एकत्र आलेली राष्ट्रवादी आता एकाकी पडणार आहे. मागील काही महिन्यांपासून आयुक्त आणि महापौर यांच्यात काही प्रकरणांवरून वितुष्ट निर्माण झाले होते. मनोरमानगर भागातील रस्ता रुंदीकरण रोखण्यावरून आयुक्त आणि महापौरांत वाद रंगला होता. त्यानंतर, प्रशासनाने वृक्ष प्राधिकरण सदस्यांच्या निवड रोखून स्वीकृत नगरसेवक निवडीतही खोडा घातला होता. त्यानंतर, वेगवेगळ्या मागण्या आणि माहितीची पत्रे सादर करून महापौरांकडून लेटरबॉम्ब फोडले जात होते. तर, आयुक्तांकडूनही सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाचे कामकाज थांबवण्यासारखे प्रकार घडले. सर्वसाधारण सभेचे ठराव प्राप्त झाल्याखेरीज कोणत्याही कामासाठी आर्थिक तरतूद करू नये, असे पत्र महापौरांनी पाठवल्यानंतर विकासकामांनाच ब्रेक लागतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपलेला हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत होती.दरम्यान, पालकमंत्री शिंदे यांनी मध्यस्थी करून हा वाद गुरुवारी मिटवला. महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या दालनात आयुक्त संजीव जयस्वाल, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के आदी सेनेच्या पदाधिकऱ्यांची एक संयुक्त बैठक झाली. एकमेकांच्या कार्यपद्धतीबद्दल असलेल्या हरकती आणि आक्षेप दोन्ही बाजूंकडून मांडण्यात आले. त्यानंतर, अनेक ठिकाणी गैरसमजुतीमधून प्रकार वाढत गेल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. परंतु, शहराचा विकास करायचा असेल, तर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचा सूरही या वेळी आळवण्यात आला. ठाणेकरांनी आपल्याला शहराच्या विकासासाठी निवडून दिले आहे. आयुक्त जयस्वाल यांच्यासारख्या अधिकाऱ्याला बळ देऊन आपण हा विकास घडवायला हवा, असे शिंदे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. त्यानंतर, एकमेकांवरचे रागलोभ विसरून एकदिलाने काम करण्याचा निर्णय या वेळी सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात समेट झाल्याने स्वीकृत सदस्य आणि वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा होणार का, हे पाहणेदेखील आता महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे प्रशासनाविरोधात दोन हात करताना शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांसोबत होते.