शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लोकप्रतिनिधींच्या फैऱ्यांवर प्रशासन झाले गप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:26 IST

भाईंदर पालिका : मनमानी कारभाराचे काढले वाभाडे

मीरा रोड : विनानिविदा दिलेले लाखो रुपयांचे कंत्राट, हॉलचालकांना पाठीशी घालण्यासह अनेक मनमानी व गैरप्रकारांच्या फैरी शिवसेना खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांसह प्रशासनावर झाडल्या. परंतु, या फैऱ्यांवर प्रशासन मात्र ठोस उत्तरच देऊ शकले नाही.

बुधवारी विचारे व सरनाईकांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यासह पालिका अधिकाºयांची झाडाझडती घेतली होती. या वेळी फेरीवाले हटवण्यासाठी विनानिविदा एस.डी. सर्व्हिसला महिना तब्बल २० लाखप्रमाणे आयुक्त ांसह प्रशासनाने काम दिले. मार्च व एप्रिलचे ३५ लाख रुपये दिले असून मे ते जुलैचे ५० लाख रुपये पालिका देणार आहे. शहरातील फेरीवाले कायम असताना नागरिकांचे लाखो रुपये नियमबाह्य काम करून कुणाच्या घशात घातले जात आहेत, असा सवाल केला. पालिकेने चक्क अत्यावश्यक बाबींसाठी असणाºया कलमाचा संदर्भ विनानिविदा काम देताना लावल्याचे अधिकाºयांनी सांगताच विचारे-सरनाईकांनी चांगलेच धारेवर धरले.नागरिकांच्या सोयीसाठी बनवलेले मीनाताई ठाकरे हॉल व प्रमोद महाजन हॉलही कंत्राटदारांच्या घशात घालून मनमानी लूट चालवली असताना आयुक्त व प्रशासनाने कंत्राटदारास न्यायालयात जाऊ देण्याची संधी दिल्याचा संताप व्यक्त केला. त्यावर आयुक्तांनी न्यायालयात सुनावणी असून चांगले वकील पाठवून स्थगिती हटवू व दोन्ही हॉल पालिका चालवेल, असे आश्वासन दिले.बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या कामाची निविदा स्थायी समितीने मंजूर केली नाही, तर ४५ दिवसांत प्रशासनाने मंजूर करून कार्यादेश देणे आवश्यक असताना प्रशासनाने ते दबावाखाली केले नव्हते. आता ते काम मार्गी लावा, असे सांगितल्यावर आयुक्तांनी ते तपासून कार्यादेश देतो, असे आश्वस्त केले. चेणे येथील रस्त्यासाठी सरकारी निधीतून पाच कोटी मंजूर असून त्याचे कामही पालिका सुरू करेल, असे आयुक्त म्हणाले.

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाच्या आड पालिकेच्या जागी बांधलेल्या मार्केटमध्ये बाहेरचे फेरीवाले आणून बसवले असून शहरातील फेरीवाल्यांना जागा दिली जात नसल्याचे सांगतानाच या कंत्राटाच्या आड भाजपचे मधुसूदन पुरोहित ५० ते ६० लाखांचा मलिदा लाटत असल्याचा गौप्यस्फोट सरनाईकांनी केला. मार्केट पालिकेने ताब्यात घेऊन चालवावे व शहरातील फेरीवाल्यांचे त्यात पुनर्वसन करावे, असे ते म्हणाले....तर तुम्हाला सोडणार नाहीउत्तन येथे कोंत्या व डिसोझा कुटुंबांची पूर्वीपासूनच्या दोन घरांमधील भिंत मागे झालेल्या बेकायदा बांधकामाच्या रस्त्यासाठी बळजबरीने तोडल्याचा संताप या वेळी व्यक्त झाला. रखडलेल्या बीएसयूपी योजनेचे काम लवकर सुरू करण्याचे सांगतानाच त्यात कोणी स्वत:चे हितसंबंध चालवत असेल, तर ते बंद करा, अन्यथा बेघर झालेल्या लोकांसाठी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा दिला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliticsराजकारण