शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निकालानंतर प्रशासनाचे खच्चीकरण

By admin | Updated: May 12, 2017 01:47 IST

महापालिका निवडणूक झाल्यापासून प्रशासनाचे सातत्याने खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून पालिका अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महापालिका निवडणूक झाल्यापासून प्रशासनाचे सातत्याने खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून पालिका अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले हे पूर्वनियोजित आहेत. राजकीय आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नसल्याची टीका महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पत्रकारांकडे केली. फेरीवाले, राजकारणी व गुंड यांची साखळी तोडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयस्वाल यांना धमक्या आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतरही महापालिकेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता आली. त्यामुळे जयस्वाल यांच्या टीकेचा रोख शिवसेनेकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे.फेरीवाल्यांना रस्ते अडवून बसवण्यापासून ते त्यांच्याकडून घेतले जाणारे हप्ते आणि त्यांना वाचवणाऱ्या सर्व लोकांची यादीच तयार करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यांनंतर संपूर्ण शहरभर व्यापक कारवाई करण्यात येणार असून सर्व राजकीय पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, असे जयस्वाल म्हणाले. मात्र, कारवाई करताना कितीही राजकीय विरोध झाला, तरी या विरोधाला आता जुमानणार नाही, असा स्पष्ट इशारादेखील जयस्वाल यांनी दिला. माळवी यांच्यावरील हल्ला व्यक्तीवरील हल्ला नसून पालिका प्रशासनावरील हल्ला असल्याचे त्यांनी नमूद केले. आता प्रशासनाविरोधात फेरीवाले असा सरळ संघर्ष सुरू झाला असून यापुढे मी स्वत: रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माळवी यांच्यावर जेव्हा हल्ला झाला, तेव्हा अनेक नागरिक तेथे उपस्थित होते. त्यांनी पुढे यायला हवे होते, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.