शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

उल्हासनगर महापालिकेतील ६५ कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ वादात

By सदानंद नाईक | Updated: February 26, 2024 17:34 IST

 उल्हासनगर महापालिका कारभाराबाबत एकेक प्रकार उघड होत आहेत. अतिरिक्त शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महापालिकेने ६५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना एका पेक्षा जास्त अतिरिक्त वेतनवाढ देण्यात आली आली आहे.

उल्हासनगर : महापालिकेने ६५ कर्मचाऱ्यांना दिलेली अतिरिक्त वेतनवाढ वादात सापडली असून शासनाकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले. दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त वेतनातून अतिरिक्त वेतनवाढीची कपात महापालिकेने सुरू केली असून यविरोधात कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे साकडे घातले आहे.

 उल्हासनगर महापालिका कारभाराबाबत एकेक प्रकार उघड होत आहेत. अतिरिक्त शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महापालिकेने तब्बल ६५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना एका पेक्षा जास्त अतिरिक्त वेतनवाढ देण्यात आली आली आहे. याबाबत महापालिकेने चौकशी केली असता, अटी-शर्तीचे भंग करून अतिरिक्त वेतनवाढ दिल्याचे उघड झाले. यादरम्यान सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक तानाजी पतंगराव यांचे ३ वेतन वाढीचे दरमहा २४०० रुपये तर उमेश ठाकूर यांचे ४ वेतन वाढीचे दरमहा ३२०० रुपये गेल्या ४५ महिन्यांपासून कपात होत आहे. अशी माहिती उमेश ठाकूर यांनी दिली. त्यांनी वेतनवाढ कपात करू नये, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबधीताकडे साकडे घातले आहे.

 महापालिकेने कामकाजासंबंधी विविध प्रशिक्षण पूर्ण करून अतिरीक्त वेतनवाढ दिलेल्या ६५ कर्मचाऱ्या पैकी फक्त सेवानिवृत्त झालेल्या तानाजी पतंगराव व उमेश ठाकूर या दोन कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना, सुनावणी न देता निवृत्ती वेतनातून गेल्या ४५ महिन्या पासून बेकायदेशीररीत्या ४-४ वेतनवाढ कपात केल्या जात आहे. अशी माहिती या दोन कर्मचाऱ्यांना दिली. मात्र दुसरीकडे कार्यरत ६३ अधिकारी, कर्मचारी यांना या अतिरिक्त वेतनवाढीचे लाभ दिले जात आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांना एक न्याय व निवृत्त कर्मचाऱ्यांना दुसरा न्याय कसा? असा प्रश्न सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह महापालिका अधिकारी यांच्याकडे साकडे घालून न्याय देण्याची मागणी केली.

 शासनाकडे मागितला अभिप्राय - उपायुक्त अशोक नाईकवाडे 

महापालिकेने कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अतिरिक्त शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या तब्बल ६५ कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अतिरिक्त वेतनवाढ दिली. मात्र वेतनवाढ देतांना अटी व शर्तीचा भंग झाल्याचे उघड झाल्यावर, याबाबत महापालिकेने शासनाकडे अभिप्राय मागविला आहे. शासनाने दिलेला अभिप्राय सकारात्मक आल्यास, अतिरिक्त वेतनवाढ सुरू राहणार आहे. तर यादरम्यान सेवानिवृत्त झालेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त वेतनातून लेखा विभागाने दिलेल्या निदर्शनास नुसार अतिरिक्त वेतनवाढीची कपात सुरू आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर