शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

भूसंपादनाअभावी अडले पुलाचे घोडे

By admin | Updated: July 3, 2016 03:10 IST

डोंबिवली-भिवंडी व ठाणेदरम्यानचे अंतर कमी व्हावे, यासाठी मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीवर प्रस्तावित असलेला पूल भूसंपादनाअभावी रखडला आहे. भिवंडी तहसीलदार

- मुरलीधर भवार,  कल्याण

डोंबिवली-भिवंडी व ठाणेदरम्यानचे अंतर कमी व्हावे, यासाठी मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीवर प्रस्तावित असलेला पूल भूसंपादनाअभावी रखडला आहे. भिवंडी तहसीलदार व केडीएमसीने भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडल्यास पुलाचे काम सुरू होऊ शकते. अन्यथा, ते दीर्घकाळ रखडण्याची दाट शक्यता आहे.डोंबिवलीहून ठाण्याला जाण्यासाठी शीळ-मुंब्रा मार्गाने अथवा कल्याण-भिवंडी बायपासमार्गे जावे लागते. त्यामुळे वेळ व इंधनाचा अपव्यय होतो. ते टाळण्यासाठी मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलास राज्य सरकारने मंजुरी दिली. या पुलासाठी २२६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. एमएमआरडीएनेही या कामासाठी निविदा काढून कंत्राटदार नेमला आहे. मात्र, पुलाचे काम सुरू झालेले नाही. खाडीवर ३३० मीटरचा पूल बांधण्यात येणार आहे. खाडीच्या पलीकडे अडीच किलोमीटरचा रस्ता, तर मोठागाव ठाकुर्लीच्या बाजूने ५६ मीटरचा पोहोच रस्ता पुलापर्यंत करण्यात येणार आहे. खाडीपलीकडे भिवंडी तहसील हद्दीत येणाऱ्या सुरई गावातील ग्रामस्थांनी खाडीपुलासाठी जमीन संपादनास विरोध दर्शवला आहे.एमएमआरडीए व तहसील कार्यालयाचे अधिकारी सर्वेक्षणासाठी गेले असता ग्रामस्थांनी त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे भूसंपादनाच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. भिवंडी तहसील भागातील बाधितांच्या जागेचा बाजारभाव साडेतीन कोटी रुपये प्रतिएकरच्या घरात आहे. एमएमआरडीए त्यांना प्रतिहेक्टरला दोन कोटी देणार आहे. तो भावत्यांना मान्य नाही. तोटा सहन करून बाधित त्यांच्या जमिनी देण्यास तयार नाहीत.डोंबिवली, मोठागाव परिसरातील जागाही संपादित करावी लागणार आहे. ती सीआरझेडमध्ये येत असून त्यातील प्रकल्पबाधितांना टीडीआर देता येत नाही. त्यांना टीडीआर द्यावा, असा ठराव महापालिकेने मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवला आहे. सीआरझेडच्या जागेतील टीडीआर देण्यासाठी परवानगी मिळावी, अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. या सगळ्या प्रकारात एमएमआरडीए काही करू शकत नाही. जागा संपादित होत नाही, तोपर्यंत पुलाचे बांधकाम सुरू होऊ शकत नाही. एमएमआरडीए आयुक्तांना साकडेजमीन संपादन प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार व एमएमआरडीएने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे व दीपेश म्हात्रे यांनी केली आहे. जागा संपादनासाठी एमएमआरडीएने केडीएमसी व भिवंडी तहसीलदारांकडे तगादा लावला पाहिजे. तेव्हाच, भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळून पुलाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी याविषयी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.