शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बॉस-शेठच्या मनोमिलनाने कार्यकर्ते झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 01:32 IST

बॅनरबाजी, निवडणुकीत भिडल्याने वितुष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील राजकीय वर्तुळात ‘बॉस’ अशी ओळख असलेले गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि ‘शेठ’ म्हणून परिचित असलेले आ. प्रताप सरनाईक यांना वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या प्रकल्पाने झटपट जवळ आणले. १२ वर्षांचा दुरावा हे दोघे झटपट विसरले. मात्र बॅनरबाजी, निवडणूक प्रचारावरून परस्परांना अक्षरश: भिडलेले, शिवीगाळ केलेले उभयतांचे कार्यकर्ते अवाक् झाले आहेत. कालपर्यंत ज्यांना पाण्यात पाहिले त्यांच्या गळ्यात गळे कसे घालायचे, असा सवाल खासगीत कार्यकर्ते करीत आहेत.

राजकीय पक्ष असो की नेते अनेकदा किरकोळ मुद्द्यावरून, निवडणूक प्रचारावरून अथवा पोस्टर-बॅनर लावण्यावरून त्यांच्यात तीव्र मतभेद होतात. अशावेळी पक्ष किंवा नेत्यासोबत आपली निष्ठा घट्ट असल्याचे दाखविण्याकरिता ‘कार्यकर्ता’ एकमेकांना भिडतो. मात्र राजकारणात सत्तेकरिता अनेकदा स्वार्थी युती-आघाड्या होतात. पण, ठाण्यात बॉस-शेठ जसे एक तपाचे राजकीय वैर विसरून चुटकीसरशी एकत्र येतात तेव्हा खरी गोची होते ती कार्यकर्त्याची.

आम्ही आजही ते दिवस विसरलो नसल्याचे दोघांचे कार्यकर्ते सांगत आहेत. १२ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ पूर्वी ठाण्यातील राजकारणात आव्हाड आणि सरनाईक ‘दो हंसो का जोडा’ म्हणून ओळखले जायचे. २००८ साली सरनाईक यांनी ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या वादावरून राष्ट्रवादीतून बाहेर पडून शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश केला. त्या वेळी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. आव्हाडांकडे त्या मानाने तुलनेत कार्यकर्त्यांची फळी कमी होती. काही वेळेस या दोघांचे खंदे समर्थक आपसात भिडतानाही दिसून आले. ठाण्यात या दोघांमधील बॅनरवॉर चांगलेच चर्चेचा विषय ठरले होते. एकाच्या बॅनरवर दुसऱ्याने बॅनर लावणे, समोरासमोर बॅनर लावणे यावरून या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये वितुष्ट आले होते. एकेकाळी जे आमचे मित्र होते, ज्यांच्यासोबत आम्ही एकत्र खात-पीत होतो त्यांनाच अनेकदा शिवीगाळ केली. काही भागात त्यांचे कार्यकर्ते राहतात म्हणून तेथे गेलो नाही. पोलिसांची गुन्हे दाखल करण्याची दमदाटी सहन केली. आता आम्ही द्विधा मन:स्थितीत आहोत, असे कार्यकर्ते म्हणाले.मनाची तयारी नाहीआव्हाड-सरनाईक एकत्र आले तेव्हा कट्टर समर्थकांनी तेथे येण्याचे टाळले, असे कबूल केले. आजही आमच्या मनाची तयारी झालेली नाही. आव्हाड मंत्री आहेत. सरनाईकांनाही मंत्रिपदी पाहायचे आहे. दोघे मंत्री असताना एकत्र आले असते तर त्याचा जास्त आनंद झाला असता, असे सरनाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हे दोघे १२ वर्षे एकत्र असते तर आज ठामपामध्ये राष्ट्रवादीची सत्ता असती, असा दावा आव्हाड यांच्या पदाधिकाºयांनी केला. दोघांमधील वितुष्टाने त्यांचे व आमचे राजकीय नुकसान झाले. अशी दोन्हीकडील कार्यकर्त्यांची भावना आहे.

टॅग्स :Jitendraजितेंद्रpratap sarnaikप्रताप सरनाईक