शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अतिक्रमण विभागाची कारवाई ‘अर्थ’पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 01:04 IST

सध्या २७ गावांचा परिसर आणि अन्य प्रभागांमध्ये आरक्षित जागांवरील बांधकामांवर तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिक्रमण विभाग नियंत्रण अधिकारी सुनील जोशी यांनी कंबर कसली आहे;

डोंबिवली : सध्या २७ गावांचा परिसर आणि अन्य प्रभागांमध्ये आरक्षित जागांवरील बांधकामांवर तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिक्रमण विभाग नियंत्रण अधिकारी सुनील जोशी यांनी कंबर कसली आहे; पण त्यामध्ये त्यांचे आर्थिक हितसंबंध दडले आहेत का, असा गंभीर सवाल कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला. अनधिकृत बांधकामांवर कारवाई निश्चित झाली पाहिजे; पण अनधिकृत बांधकामे उभी होत असताना महापालिकेचे अधिकारी झोपेचे सोंग घेत होते का? ज्यांच्या आशीर्वादाने ही बांधकामे उभी राहीली, त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई का केली जात नाही, असे सवालही आ. गायकवाड यांनी केले.महापालिकेच्या कारवाईसंदर्भात गायकवाड यांनी ‘लोकमत’जवळ संतप्त भावना व्यक्त केली. अनधिकृत कामे रातोरात होत नाहीत. प्रभाग अधिकाºयांसह अन्य वरिष्ठ अधिकाºयांच्या वरदहस्त असल्याशिवाय टोलेजंग इमारतींची बांधकामे पूर्ण होवू शकत नाहीत. त्यामुळे यासाठी ते अधिकारीदेखील तेवढेच जबाबदार आहेत. अनधिकृत बांधकामे जिथे झाली आहेत, तेथील संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना तात्काळ बडतर्फ करुन त्यांची उच्चस्तरीय चौकशी करणे गरजेचे आहे. बांधकामे झाल्यावर कारवाईची वेळ आली की अधिकारी सर्वसामान्यांच्या जीवाची घालमेल बघत आनंद लुटतात. तिथे रहायला आलेल्या सर्वसामान्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी पणाला लावलेली असते. काटकसर करून ते घर घेतात. अनधिकृत घरे घेताना त्यांचीही चूक असली, काहीसे स्वस्तात घर मिळत असल्याने फसव्या जाहिरातींच्या भुलभुलैय्यात ते अडकतात. वास्तविक अधिकाºयांच्या कामचुकारपणाचा, अर्थपूर्ण स्वार्थाचा फटका त्या सर्वसामान्य नागरिकांना बसतो.गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने पाठवलेल्या कारवाईच्या नोटीसांमुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून ते तणावाखाली आहेत. आपण बेघर होणार की काय, या भावनेने ते भयभीत झाले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी इमारती बांधल्या, विकल्या आणि आता ते हात वर करतील हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे ज्यांची घरे आहेत त्यांना कुणी वाली नाही. ज्यांनी पैसे गुंतवले ते बेघर होणार आहेत.आगामी काळात अशी बांधकामे होणार नाहीत, यासाठीही ठोस कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. जोशी हे नोटीस बजावत असल्याने सर्वसामान्य नागरिक दडपणाखाली असून, सर्वसामान्यांच्या जीवावर मस्तवाल झालेले बांधकाम व्यावसायिक व अधिकाºयांना अभय का, असा सवाल त्यांनी केला. केवळ कारवाईच्या नोटीशीद्वारे दडपण तयार करून बांधकाम व्यावसायिक तडजोडीसाठी येतील याची जोशींना अपेक्षा आहे का, असा आरोपही गायकवाड यांनी केला.>अतिक्रमण झालेल्या ठिकाणी आयुक्त गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. आरक्षित जागांवर तसेच रस्त्याच्या नियोजनात बाधा येत असल्यास संबंधित बांधकामांवर कारवाई अटळ आहे. जेथे आता अनधिकृतपणे बांधकाम होत आहे, अशा बहुतांश ठिकाणी कारवाई होणारच. अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी कारवाई सुरू आहे. त्यात अर्थपूर्ण उद्देश असण्याचा प्रश्नच नाही. जी अनधिकृत बांधकामे झाली किंवा होत असतील, त्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचा मला अधिकार नाही. - सुनील जोशी, केडीएमसी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका