शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

अंबरनाथमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:52 IST

अंबरनाथच्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांची दादागिरी दिवसागणिक वाढत आहे.

अंबरनाथ : अंबरनाथच्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांची दादागिरी दिवसागणिक वाढत आहे. या दादागिरीला लगाम लावण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर उशिरा का होईना शुक्रवारी पालिकेने पोलीस बंदोबस्तात फेरीवाल्यांवर कारवाई करत शिवाजी चौक मोकळा केला. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असले तरी अशा प्रकारची कारवाई सातत्याने करावी अशी मागणी पालिकेकडे करण्यात येत आहे.शिवाजी चौकातील फेरीवाल्यांमुळे नागरिकांना आणि वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. अनेक फेरीवाले रस्त्याच्याबाजूला राहून व्यवसाय करत असल्याने इतर वाहनांसाठी जागा शिल्लक राहत नव्हती. या फेरीवाल्यांची मुजोरी वाढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशालाही बगल देत काही फेरीवाले हे स्टेशन परिसरापासून १०० मीटरच्या अंतरावरच बसत होते. १०० मीटरपर्यंत एकाही फेरीवाल्यांना बसण्याची परवानगी नसतांनाही अनेक फेरीवाले हे स्टेशन परिसरातच बसतात. त्यांच्यावर कारवाई करत पालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्टेशन चौकातील सर्व हातगाड्या जेसीबीच्या मदतीने तोडण्यात आल्या. या हातगाडींवर अनेकवेळा दंड आकारूनही त्या गाड्या पुन्हा आहे त्याच ठिकाणी उभ्या राहत असल्याने त्यांच्यावर कायमची कारवाई करण्यात आल्याचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी स्पष्ट केले. या कारवाईनंतर काही फेरीवाल्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टेशन परिसरात १०० मीटरपर्यंत कुणालाच बसण्याचा अधिकार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :hawkersफेरीवालेambernathअंबरनाथ