शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

धोकादायक इमारतींवरील कारवाई नोटिशींपुरतीच मर्यादित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:05 IST

ठोस कारवाई नाही : मालक-भाडेकरू वाद ठरतोय कळीचा मुद्दा

कल्याण: दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. अतिधोकादायक इमारतींवर ठोस कारवाई होणे अपेक्षित असताना, ती केवळ नोटिशीपुरतीच मर्यादित राहत आहे. बहुतांश ठिकाणी असलेले मालक-भाडेकरू वाद या परिस्थितीला कारणीभूत ठरत आहेत. डोंबिवलीत गुरूवारी एका मोडकळीस आलेल्या इमारतीचे सज्जे कोसळल्याची घटना घडल्याने कमकुवत बांधकाम असलेल्या इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कल्याण-डोंबिवलीत यंदा धोकादायक बांधकामे २८२, तर अतिधोकादायक बांधकामे १९१ आहेत. जुलै २०१५ मध्ये ठाकुर्ली परिसरातील मातृकृपा ही धोकादायक इमारत कोसळल्याची घटना घडली होती. ऐन पावसाळ्यात घडलेल्या या घटनेत ९ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेतून केडीएमसीने कोणताही धडा घेतलेला नाही. त्यामुळे धोकादायक बांधकामामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा जीव आजही टांगणीला आहे. महापलिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक बांधकामांचा यंदाचा एकत्रित आकडा ४७३ इतका आहे. मागील वर्षी हा आकडा ४६३ होता. यंदा हा आकडा वाढला आहे. धोकादायक बांधकामांवर कारवाई सुरू असल्याचा दावा महापालिका दरवर्षी करते; मात्र धोकादायक अवस्थेत असलेल्या बांधकामांवर करवाई होत नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे. काही जुन्या आणि जीर्ण अवस्थेतील इमारतींना स्ट्रक्चरल आॅडीटची नोटीस महापालिकेकडून बजावली जाते. पण पुढे खरेच आॅडीट होते का, याकडेही दुर्लक्ष केले जाते. गुरूवारची घटना याचे ताजे उदाहरण आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी त्यामुळे धोकादायक इमारतींच्या मुद्याचे गांभीर्य नक्कीच कमी होत नाही. २0१५ सारख्या आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेला सामोरे जाण्याऐवजी पालिकेने आताच याप्रकरणी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.यंदाच्या धोकादायक बांधकामांची माहिती घेतली असता, सर्वाधिक धोकादायक बांधकाम कल्याणमधील क प्रभागात असल्याचे उघड झाले. इथे अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची एकूण संख्या १५३ आहे. त्याखालोखाल डोंबिवलीतील फ प्रभागात अशा इमारतींची संख्या अधिक आहे. अतिधोकादायक आणि धोकादायक मिळून हा आकडा १५१ आहे. त्यापाठोपाठ ह प्रभागात ही संख्या ५० आहे. ग प्रभागात ४५, जे मध्ये ३५, ब प्रभागात २१, अ प्रभागामध्ये ८, तर ड प्रभागात ७ आणि आय, ई प्रभागात हा आकडा अनुक्रमे २ आणि १ असा आहे.कारवाईत येतात हे अडथळेधोकादायक बांधकामांवर कारवाई करताना अनेक अडथळेही येत असतात. एकीकडे जीव मुठीत घेऊन राहावे लागत असले तरी, दुसरीकडे ही कारवाई रोखण्यात बहुतांश वेळा रहिवाशीच कारणीभूत ठरत असतात. जोपर्यंत पुनर्वसन केले जात नाही, तोपर्यंत घरे खाली न करण्याचा त्यांचा पवित्रा असतो. त्यातच मालक-भाडेकरू वाद हा मुद्दाही कारवाईत अडथळा ठरतो. ज्या ठिकाणी मोठया प्रमाणावर रहिवाशी राहतात तेथे कारवाईला मर्यादा येतात. काही बांधकामाचे वाद हे न्यायप्रविष्ट असल्याने अशांवर कारवाई करता येत नाही. त्यामुळे धोकादायक असो अथवा अतिधोकादायक बांधकामांचा मुद्दा जैसे थेच राहतो. 

टॅग्स :thaneठाणेBuilding Collapseइमारत दुर्घटना