शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

धोकादायक इमारतींवरील कारवाई नोटिशींपुरतीच मर्यादित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:05 IST

ठोस कारवाई नाही : मालक-भाडेकरू वाद ठरतोय कळीचा मुद्दा

कल्याण: दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. अतिधोकादायक इमारतींवर ठोस कारवाई होणे अपेक्षित असताना, ती केवळ नोटिशीपुरतीच मर्यादित राहत आहे. बहुतांश ठिकाणी असलेले मालक-भाडेकरू वाद या परिस्थितीला कारणीभूत ठरत आहेत. डोंबिवलीत गुरूवारी एका मोडकळीस आलेल्या इमारतीचे सज्जे कोसळल्याची घटना घडल्याने कमकुवत बांधकाम असलेल्या इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कल्याण-डोंबिवलीत यंदा धोकादायक बांधकामे २८२, तर अतिधोकादायक बांधकामे १९१ आहेत. जुलै २०१५ मध्ये ठाकुर्ली परिसरातील मातृकृपा ही धोकादायक इमारत कोसळल्याची घटना घडली होती. ऐन पावसाळ्यात घडलेल्या या घटनेत ९ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेतून केडीएमसीने कोणताही धडा घेतलेला नाही. त्यामुळे धोकादायक बांधकामामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा जीव आजही टांगणीला आहे. महापलिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक बांधकामांचा यंदाचा एकत्रित आकडा ४७३ इतका आहे. मागील वर्षी हा आकडा ४६३ होता. यंदा हा आकडा वाढला आहे. धोकादायक बांधकामांवर कारवाई सुरू असल्याचा दावा महापालिका दरवर्षी करते; मात्र धोकादायक अवस्थेत असलेल्या बांधकामांवर करवाई होत नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे. काही जुन्या आणि जीर्ण अवस्थेतील इमारतींना स्ट्रक्चरल आॅडीटची नोटीस महापालिकेकडून बजावली जाते. पण पुढे खरेच आॅडीट होते का, याकडेही दुर्लक्ष केले जाते. गुरूवारची घटना याचे ताजे उदाहरण आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी त्यामुळे धोकादायक इमारतींच्या मुद्याचे गांभीर्य नक्कीच कमी होत नाही. २0१५ सारख्या आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेला सामोरे जाण्याऐवजी पालिकेने आताच याप्रकरणी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.यंदाच्या धोकादायक बांधकामांची माहिती घेतली असता, सर्वाधिक धोकादायक बांधकाम कल्याणमधील क प्रभागात असल्याचे उघड झाले. इथे अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची एकूण संख्या १५३ आहे. त्याखालोखाल डोंबिवलीतील फ प्रभागात अशा इमारतींची संख्या अधिक आहे. अतिधोकादायक आणि धोकादायक मिळून हा आकडा १५१ आहे. त्यापाठोपाठ ह प्रभागात ही संख्या ५० आहे. ग प्रभागात ४५, जे मध्ये ३५, ब प्रभागात २१, अ प्रभागामध्ये ८, तर ड प्रभागात ७ आणि आय, ई प्रभागात हा आकडा अनुक्रमे २ आणि १ असा आहे.कारवाईत येतात हे अडथळेधोकादायक बांधकामांवर कारवाई करताना अनेक अडथळेही येत असतात. एकीकडे जीव मुठीत घेऊन राहावे लागत असले तरी, दुसरीकडे ही कारवाई रोखण्यात बहुतांश वेळा रहिवाशीच कारणीभूत ठरत असतात. जोपर्यंत पुनर्वसन केले जात नाही, तोपर्यंत घरे खाली न करण्याचा त्यांचा पवित्रा असतो. त्यातच मालक-भाडेकरू वाद हा मुद्दाही कारवाईत अडथळा ठरतो. ज्या ठिकाणी मोठया प्रमाणावर रहिवाशी राहतात तेथे कारवाईला मर्यादा येतात. काही बांधकामाचे वाद हे न्यायप्रविष्ट असल्याने अशांवर कारवाई करता येत नाही. त्यामुळे धोकादायक असो अथवा अतिधोकादायक बांधकामांचा मुद्दा जैसे थेच राहतो. 

टॅग्स :thaneठाणेBuilding Collapseइमारत दुर्घटना