शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

२८ अतिधोकादायक इमारतींवर कारवाई, रहिवाशांसमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 00:44 IST

उल्हासनगर पालिका : रहिवाशांसमोर पेच

उल्हासनगर : शहरातील अतिधोकादायक इमारती कोसळून आर्थिक व जीवितहानी होऊ नये यासाठी महापालिकेने २३ अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला असून इमारतींची यादी जाहीर केली आहे. या इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात राहण्यासाठी आम्ही कुठे जायचे, असा प्रश्न येथील रहिवाशांनी विचारला आहे. दरम्यान, चार इमारतींवर याआधीच पालिकेने कारवाई सुरू केली असून, एक इमारत जमीनदोस्त केल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिली.

महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या २३ पैकी पेनुसुल्ला इमारतीत १०० पेक्षा जास्त दुकाने व कार्यालये आहेत. मिनिस्टर कॉम्प्लेक्समध्ये ६० पेक्षा जास्त दुकाने, घरे आहेत. इतर काही इमारतींमध्येही नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. पर्यायी घरे व जागा नसल्याने जाणार कुठे, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. ज्या इमारतींमध्ये दुकाने, कारखाने व रहिवासी आहेत, त्यांनाही घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली असून अशा इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिंपी यांनी दिली.भिवंडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कारवाईभिवंडीत धोकादायक इमारत कोसळून ४१ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचा धसका सर्वच महानगरपालिकांनी घेतला असून, या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.भिवंडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेनेही शहरातील अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्या तातडीने जमीनदोस्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBuilding Collapseइमारत दुर्घटना