शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अभिनय कट्टयावर मी मोबाईल आणि फॅमिलीचे सादरीकरण,मोबाईलचा अतिवापर आणि त्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 16:45 IST

अभिनय कट्टयावर मी मोबाईल आणि फॅमिली या सादरीकरणातून मोबाईलचा अतिवापर आणि त्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर भाष्य करण्यात आले. 

ठळक मुद्देअभिनय कट्टयावर मी मोबाईल आणि फॅमिलीचे सादरीकरणमोबाईलचा अतिवापर आणि त्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर भाष्यएकमेकांशी भेटून संवाद साधण्यातच आपलेपणा आहे : किरण नाकती

ठाणे : तंत्रज्ञानाचा वाढलेला अतिवापर मानवी जीवनाचा कशा पद्धतीने ऱ्हास करू शकतो यावर आधारित "मी मोबाईल आणि फॅमिली" हे नाटक अभिनय कट्टयावर सादर करण्यात आले.यात मोबाईल एक व्यसन झाले असून त्याला वेळीच आवर घातला पाहिजे हे प्रबोधनाच्या माध्यमातून सांगण्यात आले.यंदाचा हा ४०३ क्रं चा अभिनय कट्टा होता.

     मोबाईलचा जन्म कसा झाला व पुढे त्याचा लोक जीवनावश्यक वस्तू म्हणून उपयोग करू लागले.तसेच या तंत्रज्ञानाने माणसाचा शंभर टक्के भाग व्यापून टाकला असून मोबाईल वेड हे व्यसनात परिवर्तित होत आहे.शरीराचा एक भाग म्हणून मोबाईलचा वापर करताना लोक अगदी झोपताना,दात घासताना आणि बाथरूम मध्ये देखील मोबाईल वापरतात.  पूर्वी केवळ संवाद साधायचे माध्यम म्हणून मोबाईल वापरला जात होता.मात्र गेल्या काही वर्षात फेसबुक,व्हाटसअप या गोष्टींचा भडिमार मोठयाप्रमाणात होत असून मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येताना दिसत आहे.अगदी लहानमुलापासून ते वयोवृद्ध देखील दिवसातून दर दोन मिनिटांनी सतत आपला मोबाईल चेक करत असतात.  या नाटकाच्या माध्यमातून मोबाईलचा  सदुपयोग व दुरुपयोग दाखवण्यात आला आहे.यात रुपाली वीरकर,अर्णव राजे,हर्षदा दाते,ऋतुजा भडसावळे,जयेश राजे इत्यादी कलाकारांनी यात काम केले.याचे संगीत सिद्धेश दळवी याने केले होते.लेखन आणि दिग्दर्शन जसुराज यांनी केले होते.  यावेळी कट्ट्याचे निवेदन कल्पेश डुकरे याने केले व दीपप्रज्वलन माधव धामणकर यांनी केले. यावेळी अभिनय कट्ट्याच्या कालाकारांनी "अशा है" या गाण्यावर नृत्य सादर करत उपास्थित प्रेक्षकांची मने जिंकली. कुणाल पगारे याने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले होते.  मोबाईल जीवनावश्यक वस्तू जरूर आहे पण आपण तंत्रज्ञान बनविले आहे.तंत्रज्ञानाने अपल्याला बनवले नसून गरजेपुरताच त्याचा वापर करावा. मोबाईल वर बोलण्यापेक्षा एकमेकांशी भेटून संवाद साधण्यातच आपलेपणा आहे,असे अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक