शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अभिनय कट्टयावर मी मोबाईल आणि फॅमिलीचे सादरीकरण,मोबाईलचा अतिवापर आणि त्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 16:45 IST

अभिनय कट्टयावर मी मोबाईल आणि फॅमिली या सादरीकरणातून मोबाईलचा अतिवापर आणि त्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर भाष्य करण्यात आले. 

ठळक मुद्देअभिनय कट्टयावर मी मोबाईल आणि फॅमिलीचे सादरीकरणमोबाईलचा अतिवापर आणि त्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर भाष्यएकमेकांशी भेटून संवाद साधण्यातच आपलेपणा आहे : किरण नाकती

ठाणे : तंत्रज्ञानाचा वाढलेला अतिवापर मानवी जीवनाचा कशा पद्धतीने ऱ्हास करू शकतो यावर आधारित "मी मोबाईल आणि फॅमिली" हे नाटक अभिनय कट्टयावर सादर करण्यात आले.यात मोबाईल एक व्यसन झाले असून त्याला वेळीच आवर घातला पाहिजे हे प्रबोधनाच्या माध्यमातून सांगण्यात आले.यंदाचा हा ४०३ क्रं चा अभिनय कट्टा होता.

     मोबाईलचा जन्म कसा झाला व पुढे त्याचा लोक जीवनावश्यक वस्तू म्हणून उपयोग करू लागले.तसेच या तंत्रज्ञानाने माणसाचा शंभर टक्के भाग व्यापून टाकला असून मोबाईल वेड हे व्यसनात परिवर्तित होत आहे.शरीराचा एक भाग म्हणून मोबाईलचा वापर करताना लोक अगदी झोपताना,दात घासताना आणि बाथरूम मध्ये देखील मोबाईल वापरतात.  पूर्वी केवळ संवाद साधायचे माध्यम म्हणून मोबाईल वापरला जात होता.मात्र गेल्या काही वर्षात फेसबुक,व्हाटसअप या गोष्टींचा भडिमार मोठयाप्रमाणात होत असून मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येताना दिसत आहे.अगदी लहानमुलापासून ते वयोवृद्ध देखील दिवसातून दर दोन मिनिटांनी सतत आपला मोबाईल चेक करत असतात.  या नाटकाच्या माध्यमातून मोबाईलचा  सदुपयोग व दुरुपयोग दाखवण्यात आला आहे.यात रुपाली वीरकर,अर्णव राजे,हर्षदा दाते,ऋतुजा भडसावळे,जयेश राजे इत्यादी कलाकारांनी यात काम केले.याचे संगीत सिद्धेश दळवी याने केले होते.लेखन आणि दिग्दर्शन जसुराज यांनी केले होते.  यावेळी कट्ट्याचे निवेदन कल्पेश डुकरे याने केले व दीपप्रज्वलन माधव धामणकर यांनी केले. यावेळी अभिनय कट्ट्याच्या कालाकारांनी "अशा है" या गाण्यावर नृत्य सादर करत उपास्थित प्रेक्षकांची मने जिंकली. कुणाल पगारे याने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले होते.  मोबाईल जीवनावश्यक वस्तू जरूर आहे पण आपण तंत्रज्ञान बनविले आहे.तंत्रज्ञानाने अपल्याला बनवले नसून गरजेपुरताच त्याचा वापर करावा. मोबाईल वर बोलण्यापेक्षा एकमेकांशी भेटून संवाद साधण्यातच आपलेपणा आहे,असे अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक