शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

चालकाला डुलकी लागली, कंटेनरचा अपघात झाला; मुंबई नाशिक महामार्ग चार तास जाम

By अजित मांडके | Updated: May 29, 2024 18:33 IST

मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका भागात बुधवारी सकाळी कंटेनर चालकाला डुलकी लागल्याने कंटेनर थेट दुसऱ्या मार्गावरून जाणाऱ्या डम्परवर धडकला.

ठाणे : घोडबंदर भागात गायमुख चढणीवर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने वाहन चालकांना वाहतुक कोंडीची सामना करावा लागत असतांनाच बुधवारी मुंबई नाशिक महामार्गावर मुंबई आणि नाशिकच्या दिशेने तब्बल चार तासाहून अधिक काळ वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका भागात बुधवारी सकाळी कंटेनर चालकाला डुलकी लागल्याने कंटेनर थेट दुसऱ्या मार्गावरून जाणाºया डम्परवर धडकला. त्यामुळे महामार्गावर दोनही बाजूस वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. दुपारी दोन नंतर वाहतुक सेवा पुर्वपदावर आल्याचे दिसून आले.  

मुंबई नाशिक महामार्गावरून नाशिक येथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणारा कंटेनर सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास खारेगाव टोलनाका परिसरात आला. कंटेनर चालकाला डुलकी लागली आणि तो कंटेनर दुसऱ्या मार्गावरील एका डम्परवर जाऊन धडकला. या अपघातामुळे मोठी वाहतुक कोंडी झाली. दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या.वाहतुक कोंडीमुळे सकाळी कामावर जाणाºया चाकरमान्यांना त्याचा नाहक फटका सहन करावा लागला. दरम्यान कंटेनर हलवितांना देखील वाहतुक पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागल्याचे दिसून आले. अपघात झाल्यानंतर कंटेनरचे ब्रेक जाम झाले होते. स्टेअरींग देखील अडकले होते. शिवाय गिअर देखील काम करीत नव्हते. त्यामुळे कंटेनर हटविण्यासाठी अधिकचा काळ खर्ची झाल्याचे दिसून आले.

त्यात कंटेनरमध्ये सुमारे २५ ते ३० टन वजनाचे सामान होते. दुपारी एक वाजता हायड्रा आणि क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजुला करण्यात आला. त्यानंतरही वाहतुक कोंडी कायम होती. खारेगाव टोलनाका ते नितीन कंपनी आणि खारेगाव टोलनाका ते माणकोली पर्यंत कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे वाहन चालकांचे हाल झाले. ठाणे शहरातील माजिवडा, कापूरबावडी भागातही वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे या मार्गावरुन ठाणे रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणाºया वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागला.

अपघात झाल्याने या भागात वाहतुक कोंडी झाली होती. परंतु दुपारी १ वाजताच्या सुमारास कंटेनर बाजूला करण्यात आला. त्यानंतर हळूहळू वाहतुक पूर्वपदावर आली. दुपारी दोन नंतर वाहतुक सुरळीत झाली होती.

(डॉ. विनय कुमार राठोड - पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा)