शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव पुलाचा कठडा तोडून भरधाव कंटेनरला अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 17:55 IST

रमेश पंडित यादव (47 रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे  मृत्यूच्या दाढेतून बचावलेल्या कंटेनर चालकाचं नाव आहे. 

भिवंडी- पुलाचा कठडा तोडून भरधाव वेगाने जाणारा आयशर कंटेनर चालकासह खाडीत बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी - ठाणे महामार्गावर असणाऱ्या खारेगांव पुलावर सोमवारी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली आहे.  खळबळजनक बाब म्हणजे  खाडीच्या पाण्यात पडलेला  कंटेनर चालकासह कशेळी पुलापर्यंत खाडीला आलेल्या भरतीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. मात्र सुदैवाने कंटेनर चालकाला स्थानी मच्छिमारांनी वाहत्या कंटेनर व पाण्यातून बाहेर काढले असल्याने त्याचा जीव वाचला आहे.  रमेश पंडित यादव (47 रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे  मृत्यूच्या दाढेतून बचावलेल्या कंटेनर चालकाचं नाव आहे. 

कंटेनर चालक रमेश हा इंदौर येथून मुंबईच्या दिशेने कंटेनर (एमएच- 04-एचवाय 8691) हा कंटेनर भिवंडीहून न्हावाशेवा बंदर येथे परदेशातून आलेला माल घेऊन येण्यासाठी आज सकाळच्या सुमाराला जात होता. त्यावेळी त्याला अचानक झोप लागल्याने भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरवरून चालकाचा  खारेगांव पुलावर अचानक ताबा सुटला आणि पुलाचा कठडा तोडून चालक रमेश हा कंटेनरसह खाडीत  पडला. कंटेनर थेट खारेगाव टोलनाक्याजवळ  असणाऱ्या खाडीत पडल्याने अपघात झाल्याचे पाहताच कंटेनर चालक रमेशला कशेळी पुलालगत मच्छीमारी करीत असलेल्या मच्छीमार व पुलाखाली  काही ट्रक चालक विश्रांतीसाठी बसले होते. त्यांनी पाण्यात उड्या घेत त्याला  वाचविले आहे. अपघातात जखमी झालेल्या चालक रमेशला ठाणे, राबोडी  येथील परम  हॉस्पिटलमध्ये  उपचारासाठी दाखल करण्यात आले असून  त्याची प्रकृती स्थिर  असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान  या  घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस  आणि ठाणे व भिवंडीच्या अग्निशमन दलाचे  जवान घटनास्थळी दाखल होऊन खाडीच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या कंटेनरला स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे.