शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना गती येणार, विभागीय आयुक्तांवर जबाबदारी; सहा वर्षांत ५३० कामांना मंजुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 10:42 IST

मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गांची सद्य:स्थिती आणि प्रकल्पांत येणाऱ्या अडथळ्यांबाबत चर्चा झाली होती.

नारायण जाधवठाणे : भूसंपादनासह वनखात्याच्या अडथळ्यांमुळे राज्यातून जाणाऱ्या अनेक महामार्गांचे काम रखडत चालले आहे. याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना गती देण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गांची सद्य:स्थिती आणि प्रकल्पांत येणाऱ्या अडथळ्यांबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर नितीन गडकरी यांनी एप्रिल महिन्यात पुन्हा देशातील सर्व राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून महामार्गांच्या कामांना गती देण्यासाठी उपसमिती स्थापन करण्याची सूचना केली होती. 

त्यानुसार, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या उपसमित्या गठीत केल्या आहेत. यात नॅशनल हायवेचे मुख्य अभियंता, महाव्यवस्थापक, विभागीय वनाधिकारी, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, महावितरण, जीवन प्राधिकरण यांचे सर्व विभागीय मुख्य अभियंता अशा १० जणांचा समावेश आहे. उपसमित्यांचे काम आपल्या विभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची सद्य:स्थिती, त्यासाठी लागणारी एकूण शेतजमीन, अभयारण्यांसह वनजमिनीचे अडथळे, द्यावा लागणारा मोबदला, उच्च व लघुदाब वीजवाहिन्यांचे स्थलांतर, त्यासाठीच्या खर्चासह आपापल्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गातील अडचणी व त्यावरील उपाय शोधून ते सर्व सदस्यांनी उपसमितीसमोर सादर करायचे आहेत. महाराष्ट्रातून जाणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्गठाण्यासह पालघर जिल्ह्यातून जाणारा दिल्ली-बडोदरा-मुंबई महामार्ग, सुरत-सोलापूर, सोलापूर-कर्नुल, नागपूर-विजयवाडा या प्रमुख महामार्गांसह इतर मार्गांचा समावेश आहे. नितीन गडकरींनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी ५७०० किमी होती. ती आॅगस्ट २०२० अखेर १७,७४० किमी इतकी झाली आहे. सहा वर्षांत ५३० नवी कामे मंजूर केली असून यात १.२८ कोटींच्या ११०० किमी काँक्रिट रस्त्यांचा समावेश आहे.

टॅग्स :commissionerआयुक्तhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा