शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कावेसरच्या आदिवासींनी दाखल केली ठाण्याच्या जिल्हाधिका-यांविरुद्ध अवमान याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 21:54 IST

राज्य शासनाच्या जागेत निवा-यासाठी अतिक्रमित केलेल्या जागांचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असतांनाही त्याचे पालन झालेले नाही.

ठाणे - राज्य शासनाच्या जागेत निवा-यासाठी अतिक्रमित केलेल्या जागांचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असतांनाही त्याचे पालन झालेले नाही. त्यासाठी ठाण्याच्या जिल्हाधिकाºयांविरुद्ध कोलशेत, कावेसर येथील हजारो रहिवाशांनी एकत्र येत अवमान याचिका दाखल केल्याची माहिती आदीवासी पुनर्वसन आदोलन आणि गावकरी समन्वय समितीचे अ‍ॅड. किशोर दिवेकर यांनी दिली आहे.गेल्या ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोलशेत, कावेसर येथील राज्य शासनाच्या सरकारी जागेत निवाºयासाठी अतिक्रमित केलेल्या मागासवर्गीय तसेच अन्य रहिवाशांनी जागा आपल्या नावे मंजूर होण्यासाठी महसूल प्रशासनाकडे कब्जे हक्काची रक्कम, अकृषिक अकारणी आणि दंड भरण्यास तयार असल्याचा पत्रव्यवहार जिल्हा प्रशासनाकडे केला आहे. मोर्चे आंदोलने करुनही या मुळ रहिवाशांचा मागणी अर्ज निकाली न काढल्याने नाईलाजाने येथील गावकºयांनी एकत्र येत आदीवासी पुनर्वसन आंदोलन आणि गाावकरी समन्वय समिती यांच्या संयुक्त माध्यमातून २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ५ आॅक्टोबर २०१६ रोजी उच्च न्यायालयाने ही याचिका मंजूर करुन या संबंधिचा अर्ज शीघ्र गतीने निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी २२ नोव्हेंबर २०१६ रोजी गावकरी समितीच्या पदाधिकाºयांना आपल्या दालनात बोलवून या याचिकेची तातडीने अंमलबजावणी करुन सर्व अर्जदारांचे अर्ज निकाली काढून योग्य तो न्याय देण्यात येईल, असे त्यावेळी संबोधित केले. मात्र, त्यानंतरही सहा महिने पाठपुरावा करुनही त्यावर काहीच हालचाली झाल्या नाहीत.निवारा मुलभूत हक्कसाठी कोणतीही कायदेशीर कार्यवाही करुन संबंधितांनाही न्याय देण्याचा महसूल प्रशासनाचा कल दिसून आला नाही. त्यामुळे न्यायालयाच्याच आदेशाची अंमलबजावणी न केल्याने जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्यासह सह जणांविरुद्ध अवमान याचिका दाखल केल्याचे अ‍ॅड. दिवेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय