शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पूररेषा नसल्याने इमारतींना सरसकट परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:08 IST

नियोजनाचा अभाव : २००५ च्या पुरानंतरही प्रशासनाने घेतला नाही धडा, पालिकेची चूक नागरिकांना भोवली

बदलापूर : बदलापूरमधून वाहणारी उल्हास नदी पावसाळ्यात किती विस्तीर्ण होते, याचा अनुभव बदलापूरकरांनी दोन वेळा घेतला आहे. नदीपात्रात नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीही पाण्याखाली गेल्याने शहराचे नियोजन चुकल्याचे निश्चित झाले. मात्र, ही चूक दुरुस्त करण्यासाठी कुणीच पुढाकार घेताना दिसत नाहीत. २००५ च्या पुरातून कोणताही बोध न घेणाऱ्या बदलापूरने जी चूक केली. ती २०१९ च्या पुरात उघड झाली. आता पुन्हा ती चूक होणार नाही, यासाठी पूररेषा निश्चित करण्यासाठी पालिकेने पाठपुरावा करण्याची गरज आहे.२००५ च्या महापुराच्या वेळेस बदलापूरमध्ये इमारतींची संख्या कमी होती. या पुरात संपूर्ण बदलापूर पाण्याखाली आले होते. त्यामुळे या पुरानंतर बदलापूरचा विकास करताना पुराचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, २००५ च्या पुरातून बदलापूर काहीएक शिकले नाही, हे उघड झाले. या पुरानंतरही उल्हास नदीच्या किनाºयावर असलेल्या इमारतींना बांधकाम परवानगी देताना कोणतीच दक्षता घेतली नाही. आलेले प्रस्ताव आहे त्या परिस्थितीत मंजूर करण्यात आले. नदीच्या पुराच्या पाण्यात इमारत येणार, हे माहीत असतानाही इमारतींना मंजुरी दिली. पालिकेची हीच चूक अनेकांच्या जीवावर बेतली. अर्थात, पालिकेने इमारतींना मंजुरी देताना उल्हास नदीची पूररेषा लक्षात घेऊन परवानगी देणे गरजेचे होते. मात्र, लघुपाटबंधारे विभागाने पूररेषाच निश्चित न केल्याने पालिकेनेही कोणताही पाठपुरावा न करता थेट परवानगी देत गेले.नदीपात्राजवळ असतानाही इमारतीच्या तळ मजल्यावर फलॅटची परवानगी दिली. आज या परवानगीमुळे सर्वाधिक फटका बदलापूरला बसला. उल्हास नदीचा प्रवाह भिवपुरी येथून सुरू झाल्यावर बदलापूरमध्ये येतो. तो पुढे कल्याणमार्गे कल्याण खाडीला मिळतो. त्यामुळे बदलापूर शहरातून जाणाºया या मुख्य नदीची पूररेषा निश्चित करण्याची जबाबदारी कुणीच घेतली नाही. ही रेषा निश्चित झाल्यास अनेक बांधकाम व्यावसायिकांना त्याचा फटका सहन करण्याची वेळ येणार, हे निश्चित झाले होते. त्यामुळे बिल्डरवजा राजकारण्यांनीही त्यासाठी प्रयत्न केले नाही. आज याच राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे बदलापूरला सर्वाधिक फटका सहन करावा लागला आहे.पूररेषेबाबतची सर्व जबाबदारी ही लघुपाटबंधारे विभागाची आहे. मात्र, कर्जतपासून कल्याण ग्रामीणपर्यंत पूररेषा अजूनही निश्चित झालेली नाही. आता पूररेषेवर अवलंबून न राहता बदलापूरमध्ये यापुढे उल्हास नदीच्या परिसरातील भागात इमारतींना परवानगी देताना तळ मजल्यावर फ्लॅटला मंजुरी न देण्याचा ठराव करून सरकारकडे पाठवला जाईल.- प्रकाश बोरसे, मुख्याधिकारी

टॅग्स :floodपूर