शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

साडेतीन महिने महासभा न झाल्याने विकास खुंटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:22 IST

भाजपची महापौरांवर टीका : पत्राद्वारे केली सभा घेण्याची मागणी

ठाणे : राज्यात सत्तासोपानावरून शिवसेना-भाजपात जुंपली असताना इकडे ठाणे महापालिकेतही युतीत वाद रंगला आहे. यात भाजपाने शिवसेनेला लक्ष केले असून गेल्या साडेतीन महिन्यापासून महासभा न घेणाऱ्या महापौरांवर टीकास्त्र सोडले आहे. साडेतीन महिने महासभा न झाल्याने विकासकामांचे अनेक प्रस्ताव रखडल्याने त्याचा परिणाम शहराच्या विकासावर झाला असून हा ठाणेकरांवर अन्याय असल्याचा आरोप केला आहे.

विधानसभा निवडणुकीची प्रक्रि या संपुष्टात आल्यानंतरही, ठाणे महापालिकेच्या महासभेची तारीख जाहीर न करणे हे न उलगडणारे कोडे आहे, अशा शब्दांत ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर शरसंधान केले आहे. महापौरांना महासभा बोलाविण्याचा अधिकार असूनही, या दिरंगाईमुळे सामान्य ठाणेकरांचे हित साधणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यांनी मंगळवारी एका पत्राद्वारे महापौरांकडे महासभा घेण्याची मागणी केली. या पत्रात गेल्या साडेतीन महिन्यांपासून महासभा घेण्यात न आल्याकडे लक्ष वेधले आहे त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये विशेष महासभा घेण्याच्या भाजपाच्या मागणीचाही उल्लेख केला आहे.

महापालिकेची शेवटची महासभा २० आॅगस्ट रोजी झाली होती. तत्पूर्वी १९ जुलै रोजीची महासभा तहकूब करण्यात आली. महासभा रखडल्यामुळे भाजपाने सप्टेंबर महिन्यात विशेष महासभा घेण्याबाबत पत्र देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत काहीही निर्णय घेण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या साडेतीन महिन्यांत महासभा घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट होते. आचारसंहितेचा काळ वगळता महासभा का घेतली नाही, हे माझ्यासह भाजपा नगरसेवकांना एक न उलगडणारे कोडे आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.२०१९-२० च्या अर्थसंकल्पातील निधीतून घेण्यात येणारी कामे अद्यापी सुरू करण्यात आलेली नाहीत. यंदाच्या आर्थिक वर्षातील सात महिन्यांचा कालावधी संपुष्टात आला असून, संपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी दिरंगाई होण्याची शक्यता आहे. ठाणेकरांच्या दृष्टीकोनातून अनेक प्रश्न रखडले असून, सभेच्या पटलावर अनेक विषय प्रलंबित आहेत. या विषयांवर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अशा दिरंगाईमुळे सामान्य ठाणेकरांचे हित साधणारे नाही, अशा शब्दांत त्यांनी महापौरांना टोला लगावला.आचारसंहिता नसतानाही दिरंगाई : पवारविधानसभेच्या निवडणुकांची प्रक्रि या संपुष्टात आली असून, राज्यभरात आचारसंहिता उठविण्यात आली. गेल्या महिनाभराहून अधिक काळ आचारसंहितेमुळे प्रशासनावरील बंधने संपली. त्यामुळे महापालिकेचा कारभार गतिमान होण्यासाठी तातडीने महासभा घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यानंतरही ती जाहीर करण्याबाबत दिरंगाई का केली जाते, असा सवाल महापालिकेतील नारायण पवार यांनी केला.

टॅग्स :thaneठाणे