शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

साडेतीन महिने महासभा न झाल्याने विकास खुंटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:22 IST

भाजपची महापौरांवर टीका : पत्राद्वारे केली सभा घेण्याची मागणी

ठाणे : राज्यात सत्तासोपानावरून शिवसेना-भाजपात जुंपली असताना इकडे ठाणे महापालिकेतही युतीत वाद रंगला आहे. यात भाजपाने शिवसेनेला लक्ष केले असून गेल्या साडेतीन महिन्यापासून महासभा न घेणाऱ्या महापौरांवर टीकास्त्र सोडले आहे. साडेतीन महिने महासभा न झाल्याने विकासकामांचे अनेक प्रस्ताव रखडल्याने त्याचा परिणाम शहराच्या विकासावर झाला असून हा ठाणेकरांवर अन्याय असल्याचा आरोप केला आहे.

विधानसभा निवडणुकीची प्रक्रि या संपुष्टात आल्यानंतरही, ठाणे महापालिकेच्या महासभेची तारीख जाहीर न करणे हे न उलगडणारे कोडे आहे, अशा शब्दांत ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर शरसंधान केले आहे. महापौरांना महासभा बोलाविण्याचा अधिकार असूनही, या दिरंगाईमुळे सामान्य ठाणेकरांचे हित साधणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यांनी मंगळवारी एका पत्राद्वारे महापौरांकडे महासभा घेण्याची मागणी केली. या पत्रात गेल्या साडेतीन महिन्यांपासून महासभा घेण्यात न आल्याकडे लक्ष वेधले आहे त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये विशेष महासभा घेण्याच्या भाजपाच्या मागणीचाही उल्लेख केला आहे.

महापालिकेची शेवटची महासभा २० आॅगस्ट रोजी झाली होती. तत्पूर्वी १९ जुलै रोजीची महासभा तहकूब करण्यात आली. महासभा रखडल्यामुळे भाजपाने सप्टेंबर महिन्यात विशेष महासभा घेण्याबाबत पत्र देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत काहीही निर्णय घेण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या साडेतीन महिन्यांत महासभा घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट होते. आचारसंहितेचा काळ वगळता महासभा का घेतली नाही, हे माझ्यासह भाजपा नगरसेवकांना एक न उलगडणारे कोडे आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.२०१९-२० च्या अर्थसंकल्पातील निधीतून घेण्यात येणारी कामे अद्यापी सुरू करण्यात आलेली नाहीत. यंदाच्या आर्थिक वर्षातील सात महिन्यांचा कालावधी संपुष्टात आला असून, संपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी दिरंगाई होण्याची शक्यता आहे. ठाणेकरांच्या दृष्टीकोनातून अनेक प्रश्न रखडले असून, सभेच्या पटलावर अनेक विषय प्रलंबित आहेत. या विषयांवर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अशा दिरंगाईमुळे सामान्य ठाणेकरांचे हित साधणारे नाही, अशा शब्दांत त्यांनी महापौरांना टोला लगावला.आचारसंहिता नसतानाही दिरंगाई : पवारविधानसभेच्या निवडणुकांची प्रक्रि या संपुष्टात आली असून, राज्यभरात आचारसंहिता उठविण्यात आली. गेल्या महिनाभराहून अधिक काळ आचारसंहितेमुळे प्रशासनावरील बंधने संपली. त्यामुळे महापालिकेचा कारभार गतिमान होण्यासाठी तातडीने महासभा घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यानंतरही ती जाहीर करण्याबाबत दिरंगाई का केली जाते, असा सवाल महापालिकेतील नारायण पवार यांनी केला.

टॅग्स :thaneठाणे