शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

थीम पार्क घोटाळ्यातील दोषींना अभय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:38 IST

१६ कोटींच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या प्रशासनाच्या समितीने थीम पार्क प्रकरणी आपला अहवाल समोर ठेवल्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यात गेले की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

ठाणे : थीम पार्कच्या १६ कोटींच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या प्रशासनाच्या समितीने थीम पार्क प्रकरणी आपला अहवाल समोर ठेवल्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यात गेले की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. कारण या प्रकरणी कोणावर कारवाई केली, कोणती कारवाई झाली याची माहिती मात्र अद्याप प्रशासनाने दिलेली नाही. यामुळे दोषींना अभय दिल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून याप्रकरणी प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.ठाणे महापालिकेत थीमपार्क आणि बॉलीवूड पार्क ही दोन प्रकरणे लोकसभा निवडणुकीच्या आधी चांगलीच चर्चेत आली होती. या प्रकरणी भाजप, राष्टÑवादी यांनी आक्रमक भूमिका घेऊन थीमपार्कमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच या संदर्भात लोकप्रतिनिधींची चौकशी समितीही नेमण्यात आली होती. यामध्ये विविध पक्षांचे गटनेते, सभागृह नेते, महापौर यांच्यासह ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते, अशांचा या चौकशी समितीत समावेश होता. दुसरीकडे लोकप्रतिनिधींची समिती नेमली जात असतांना प्रशासनाने सुद्धा अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून थीपपार्कमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले होते. तसेच या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासनही दिले होते. परंतु, त्याचे पुढे काय झाले कोणावर दोषारोप ठेवण्यात आले, कोणावर झाली, याची काहीच माहिती प्रशासनाकडून अद्याप पुढे ठेवण्यात आलेली नाही.लोकप्रतिनिधींच्या समितीला चौकशीसाठी निवृत्त अधिकारीच मिळत नाहीत. प्रशासनाकडूनसुद्धा योग्य ते सहाकार्य लाभत नसल्याचे बोलले जाते. मध्येच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि या सर्वच प्रकरणावर पडदा पडला. आता निवडणूक आचारसंहिता संपल्याने लोकप्रतिनिधी या संदर्भात बैठक घेऊन कारवाईची मागणी करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.>दोषी अधिकारी मोकाट : थीमपार्क घोटाळ्याप्र्रकरणी आतापर्यंत ठेकेदाराची बँक गॅरंटी व अनामत रक्कम जप्त करून दोषी अधिकाऱ्यांची विभागिय चौकशीच्या घोषणेशिवाय काहीच हालचाल झालेली नाही. खरे तर ठेकेदारासह संबधित अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक संस्थाकडून होत आहे. मात्र, महापालिकेतील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने त्यांना अभय दिल्याने ते मोकाट आहेत.