शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उल्हासनगरातील बांधकामे नियमित करण्यासाठी १८ वर्षात ४ जीआर, तरीही नागरिक लाभापासून वंचित

By सदानंद नाईक | Updated: March 16, 2024 16:43 IST

निवडणुकीपूर्वीचा जीआर म्हणजे जुमला...मनसेची टिका.

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील बांधकामे नियमित करण्यासाठी शासनाने काढलेल्या जीआर हा चौथा असून निवडणुकीपूर्वीचा जुमला असल्याची टिका मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू देशमुख व शहराध्यक्ष संजय घुगे यांनीं केला. येरे माझ्या मागल्या प्रमाणे हाही जीआर कुचकामी ठरण्याची टिका देशमुख यांनीं केली आहे.

 उल्हासनगर म्हणजे अवैध बांधकामाचे शहर अशी ओळख आहे. ८५५ इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर शासनाने सन-२००६ साली बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश काढला. मात्र यामध्ये अनेक त्रुटी असल्याने, आध्यादेशाचा फायदा नागरिकांना झाला नाही. त्यानंतर ९ सप्टेंबर २०१९, १७ फेब्रुवारी २०२३ असे सुधारित अध्यादेश शासनाने काढले. तर १४ मार्च २०२४ रोजी शिंदे शासनाने चौथा अध्यादेश जीआर काढला आहे. रेडिरेकनेरच्या १० टक्के शुल्क भरून बांधकामे नियमित होणार असल्याची शक्यता सत्ताधारी पक्षातील महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेऊन सांगत सुटले आहेत. 

निर्वासिताचे शहर म्हणजे उल्हासनगर. त्यातील नागरिक पुन्हा विस्थापित होऊ नये म्हणून गेल्या १८ वर्षात ४ जीआर काढले आहेत. मात्र बांधकाम नियमित प्रक्रियेत हाताच्या बोटावर मोजता येथील नागरिकांचे बांधकामे नियमित झाले आहे. शासनाने काढलेले चारही बांधकाम नियमित करण्याचे जीआर कुचकामी असून शासनाने नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला. याबाबत मनसेच्या नागरिकांत जनजागृती करणार असल्याची माहिती बंडू देशमुख यांनी दिलीं आहे. नागरिकांनीही याबाबत चौकस विचार करावा. असे आवाहनही देशमुख व संजय घुगे यांनी केले।आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMNSमनसे