शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पुढील दशकाची पायाभरणी, अभिजित फडणीस यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 23:53 IST

Budget 2021 : कोविडमुळे आलेली मरगळ दूर करणे एवढेच नाही तर पुढील दशकाची पायाभरणी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. सर्वात लक्षवेधी म्हणजे स्वास्थ्य हा मानवी जीवनाचा पाया आहे आणि त्यासाठी सर्वंकष विचार या अर्थसंकल्पात झालेला दिसतो

ठाणे : कोविडमुळे आलेली मरगळ दूर करणे एवढेच नाही तर पुढील दशकाची पायाभरणी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. सर्वात लक्षवेधी म्हणजे स्वास्थ्य हा मानवी जीवनाचा पाया आहे आणि त्यासाठी सर्वंकष विचार या अर्थसंकल्पात झालेला दिसतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. अभिजित फडणीस यांनी केले.स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठानतर्फे मराठी ग्रंथ संग्रहालय येथे केंद्रीय अर्थसंकल्प २०२१- २२ या विषयावर फडणीस यांचे नुकतेच व्याख्यान झाले. यावेळी समाजसेवक डॉ. राजेश मढवी, उद्योजक अशोक जोशी, संस्थेचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर आदी उपस्थित होते.फडणीस म्हणाले की, ‘भारताने कोविडबद्दल अतिशय सावध पवित्रा घेतला आणि त्या संकटाचे निवारण शिस्तबद्ध प्रकारे सरकारने केले. सुरुवातीच्या काळात खर्चावर नियंत्रण ठेवले आणि कोविड आटोक्यात आलेला दिसल्यावर सप्टेंबरनंतर अतिशय वेगाने खर्चात वाढ केली. रिझर्व्ह बँकेनेही आपली वित्तीय नीती सढळ ठेऊन बाजार अडचणीत येणार नाही, याची काळजी घेतली. परिणामी चार महिन्यांतील जीएसटीचा भरणा अर्थव्यवस्था मार्गावर आल्याचे दर्शवतो आहे. नुकत्याच घोषित झालेल्या अर्थसंकल्पात करविषयक कुठलेच महत्त्वाचे बदल न करता आपले पूर्ण लक्ष खर्चाच्या गुणवत्तेवर आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्वच पैलूंवर केंद्रित केलेले दिसते.’ ‘भांडवली खर्चावर भर देऊन शेतकी व्यवस्था, महामार्ग, रेल्वे, वीज वितरण, सार्वजनिक वाहतूक, मेट्रो अशा सर्वच पायाभूत साधनांवरील खर्चात घसघशीत वाढ अर्थमंत्र्यांनी केली आहे. रेल्वेच्या बाबतीत पुढील दशकात गुणात्मक बदल घडवण्याचा हेतू सरकारने स्पष्ट केला आहे. मेक इन इंडिया प्रत्यक्षात यावे आणि जगाच्या बाजारपेठेसाठी भारतात निर्मिती व्हावी म्हणून ‘परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेन्टिव्ह’साठी भरीव प्रावधान अर्थसंकल्पात केले आहे तसेच सात टेक्सटाईल पार्क निर्माण केले जाणार आहेत.’१५ हजार गुणवान शाळांना मॉडेल या स्वरूपात विकसित करणे, १०० सैनिक शाळांची निर्मिती, ७५० एकलव्य विद्यालये, डिजिटल पेमेंट वाढावीत म्हणून अनुदान, डिजिटल सेन्सस, वीज वितरण क्षेत्रात ग्राहकांना पर्यायी सेवा पुरवठादार असावा,  अशी रचना तसेच बंदरांसाठी खासगी व्यवस्थापन, गॅस वितरणाची व्याप्ती वाढवणे, किमान मूल्याने शेतमाल खरेदी करण्यात प्रचंड वाढ अशा काही अर्थसंकल्पातील उल्लेखनीय गोष्टी आहेत, असे ते म्हणाले. 

पैसे उभारण्यासाठी मालमत्तांची विक्रीकॉर्पोरेट कर कमी केलेले असल्याने इतर मार्गाने वेगाने पैसे उभे करण्याची जबाबदारी सरकारने पेलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी दोन बँक, एक विमा कंपनी यांचे खासगीकरण, जीवन बीमा निगमच्या शेअर्सची विक्री, गॅस पाइपलाइन, विमानतळ, गोदामे, हायवे तसेच सार्वजनिक उद्योगांची किंवा सरकारी मालकीची वापरात नसलेली मालमत्ता यांची विक्री, यातून पैसे उभारणी करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

टॅग्स :budget 2021बजेट 2021Economyअर्थव्यवस्था