शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारासाठी लवकरच होणार ‘मैदान ए जंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:33 IST

अंतिम टप्प्यात धुरळा; मैदाने आरक्षणासाठी लागणार चढाओढ

कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. सध्या उमेदवारी देण्यावरून खलबते सुरू असतानाच राजकीय पक्ष मेळावे आणि बैठकांनाही प्राधान्य देत आहेत. उमेदवार आणि रणनीती ठरल्यानंतर प्रचारसभांसाठी मैदाने मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.लोकसभेच्या कल्याण आणि भिवंडी मतदारसंघांत कल्याण-डोंबिवली महापालिकेचा परिसर येतो. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा, पूर्वेतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल तर कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान, मॅक्सी ग्राउंड (यशवंतराव चव्हाण क्रीडांगण), फडके मैदान तसेच पूर्वेकडे दादासाहेब गायकवाड क्रीडांगण अशी मोठी मैदाने प्रचारासाठी आहेत. यातील सुभाष मैदान आणि मॅक्सी ग्राउंड ही मैदाने विशिष्ठ ठरावान्वये फक्त खेळासाठीच राखीव आहेत. अपवाद म्हणून राष्ट्रीय व्यक्तींच्या सभांसाठी ही मैदाने देण्याबाबत केडीएमसी निर्णय घेणार आहे.कल्याण आणि भिवंडी मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मोठ्या सभा घेण्याकडे राजकीय पक्षांचा कल राहणार आहे. २ एप्रिलनंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी करणे, माघार घेणे, उमेदवारांची यादी जाहीर करणे ही प्रक्रिया पार पडेल.साधारण मार्चच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मैदान आरक्षित करण्यासाठी लगबग सुरू होण्याची शक्यता आहे. कल्याण मतदारसंघाचा भाग असलेल्या अंबरनाथमधील नेताजी मार्केट ग्राउंड, गावदेवी मैदान तर उल्हासनगरमधील गोल मैदान, व्हिटीसी ग्राउंड आणि दसरा मैदान ही मैदानेही प्रचार सभांसाठी सज्ज आहेत. परंतु, ती आरक्षित करण्यासंदर्भातही एकही अर्ज अद्यापपर्यंत आलेला नाही. कल्याण-डोंबिवलीतील मैदानांसंदर्भात केडीएमसीचे मालमत्ता व्यवस्थापक प्रकाश ढोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मैदान राखीव करण्यासंदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाचा अर्ज आलेला नसल्याची माहिती दिली.प्राधान्यक्रम ठरवणारमैदाने आरक्षित करण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ पाहायला मिळेल. परंतु, मैदानासाठी ज्याचा अर्ज पहिला येईल त्यालाच प्राधान्य दिले जाणार आहे. रोस्टर पद्धतीने मैदाने प्रचार सभांसाठी उपलब्ध होणार आहेत.मेळावे, बैठकांवर भरसध्या मेळावे आणि बैठका घेण्यावर राजकीय पक्षांचा भर आहे. राष्ट्रवादीतर्फे बुधवारी कल्याण पूर्वेत मेळावा होत आहे. अशा मेळाव्यांसाठी प्रामुख्याने मोठी सभागृहे घेतली जातात.कल्याण-डोंबिवलीत साधारण १० ते १२ मोठी सभागृहे आहेत. त्यामुळे सध्या ही सभागृहे आरक्षित करण्याकडे राजकीय पक्षांचा कल राहील.मार्च, एप्रिल हा लग्न सराईचा कालावधी पाहता सभागृहांची उपलब्धता हा देखील कळीचा मुद्दा राहणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक