शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ठाण्यातील तरुणाचे खंडणीकरिता थायलंडमध्ये अपहरण, परदेशात नोकरीचे दाखवले आमिष

By जितेंद्र कालेकर | Updated: October 18, 2022 20:09 IST

अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्याची केली जाते सक्ती

ठाणे: ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील आशिष दुबे या उच्चशिक्षित तरुणाचे थायलंडमध्ये तीन हजार डॉलरच्या खंडणीसाठी अपहरण केले आहे. त्याची थायलंडच्या दूतावासाशी बोलून सुटका करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आशिषच्या पालकांनी केली. दरम्यान, ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल झाला असून ठाणे खंडणी विरोधी पथकाने दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

आशिषचा भाऊ अविनाश दुबे याने दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये हा प्रकार घडला. आशिष हा २० सप्टेंबरला एका मित्राच्या ओळखीतून थायलंडमध्ये डिजिटल मार्केटिंग या फिल्डमध्ये नोकरीसाठी गेला होता. तिथे चांगल्या पगाराची नोकरी असल्याचे त्याला सांगण्यात आले होते. आशिषने सर्व प्रक्रिया पूर्ण करून थायलंडमधील संबंधित कंपनीमध्ये नोकरी मिळवली. तिथे गेल्यानंतर मात्र त्याला वेगळाच प्रकार अनुभवायला मिळाला. त्याला जंगलातून नदी ओलांडून एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यासारख्याच भारतातील १३ तरुणांना ठेवण्यात आले होते.

सुरुवातीला क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात ट्रेनिंग दिल्यानंतर बनावट ई-मेल आयडी तेही मुलींच्या नावाने तयार करुन अमेरिकन नागरिकांना क्रिप्टो करन्सी विकण्याच्या बहाण्याने त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेऊन त्यांची फसवणूक करण्याचे काम आशिषला देण्यात आले होते. त्याच्यासह अन्य काही मुलांनी या कामाला नकार दिला. तेव्हा त्याला धमकावण्यात आले. आशिषसह अन्य काही तरुणांनी राजीनामा दिल्यानंतर ५० थायबाथ तिकीट खर्च आणि तीन हजार डॉलर अन्य शुल्काच्या नावाखाली साडेचार लाखांच्या खंडणीची मागणी या कंपनीचा मिसम हुसेन या एचआर प्रतिनिधीने केली. ती दिली तरच आशिषला सोडण्यात येईल, असे त्याने धमकावले.

दिवसातून एकदाच शिळे जेवण, १८ तासांचे काम असून चायनीज लोकांच्या सुरक्षिततेमध्ये त्यांना ठेवण्यात येते, अशा सर्व त्रासाची माहिती दुबे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री शिंदे तसेच पंतप्रधान मोदी यांना ईमेलद्वारे दिली. भारतीय आणि थायलंडच्या दूतावासाकडून दुबे कुटुंबीयांना प्रतिसाद मिळालेला नाही. या संपूर्ण रॅकेटमध्ये भारतातीलही काही लोकांचा समावेश असल्याचे आशिषने फोनद्वारे आपल्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आणल्याचे अविनाशने सांगितले.

त्याच्यासोबतच्या अन्य एका मुलाने पाच लाखांची रक्कम थायलंडच्या या टोळीला दिली. तरीही त्याला न सोडल्याने आशिष पूर्णपणे हादरला आहे. या संपूर्ण प्रकरणात राज्य आणि केंद्र सरकारने लक्ष देऊन आशिषसह त्याच्या साथीदारांची थायलंडच्या दूतावासाच्या मदतीने सुटका करावी, अशी मागणी दुबे कुटुंबीयांनी केली. दरम्यान, १२ आॅक्टोबर रोजी फसवणुकीसह खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून १७ आॅक्टोबर रोजी हे प्रकरण ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे तपासासाठी आले असून दोघांची चौकशी केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी