शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

११ वीच्या वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींचे ५० वर्षानंतर अनोखे स्नेहसंमेलन!

By सुरेश लोखंडे | Updated: February 19, 2024 18:19 IST

विद्यार्थ्यांचे हे ५० वर्षानंतरचे स्नेह संमेलन म्हणजेच एक प्रकारे हा सुवर्ण महोत्सवच होता.

ठाणे : ध. ना. चौधरी बहुउद्देशीय विद्यालयात १९७३-७४च्या बॅचला ११ वीच्या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन अलिकडेच शास्त्री हॉल डोंबिवली पूर्व येथे पार पडले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळा सोडून पन्नास वर्षे पूर्ण झाली असतानाही या प्रदीर्घकालावधीनंतर त्यांनी एकमेकांचा कसाोशीन शोध घेऊन या ४५ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी तब्बल ५० वर्षानंतर स्नेहसंमेलनाच आनंद मनमुराध घेतला, असे यातील जेष्ठ नागरीक उज्वल जोशी यांनी 'लोकमत'ला सांगितले.

विद्यार्थ्यांचे हे ५० वर्षानंतरचे स्नेह संमेलन म्हणजेच एक प्रकारे हा सुवर्ण महोत्सवच होता. या कार्यक्रमाला साधारण ४५ विद्यार्थी, विद्यार्थिनी लगबगीने शाळेत हजर होत या साेहळ्याचा आनंद धेतला. आमच्याकडे फोन मोबाईल ईमेल फेसबुक अशी कम्युनिकेशनची साधने उपलब्ध नसल्याने मित्र, मैत्रिणी शोधायला खूपच वेळ लागला. शोधाशोध हे कठीण काम असतानाही आम्ही एकमेकांच्या सहाय्याने सर्वांचा शोध घेऊन पार पडलेल्या स्नेह संमेलनात आठवणी जागवल्या. संमेलनात आलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींची नोंद, आपल्या शेजारी बसलेल्यांची ओळख करून देणे, पन्नास वर्षात आलेले सामाजिक आणि नोकरीमध्ये आलेले चांगले अनुभव याची देवाणघेवाण, संगीत खुर्ची रिंग टाकणे, हौझी गाणी दरवाजा पुढील रांगोळी असे कार्यक्रम खेळ यावेळी उत्साहात पार पडले. अपरिहार्य कारणामुळे काही मित्र मैत्रिणी या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांची अनुपस्थिती हजर असलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींना खूपच जाणवली.या वर्षी भेटवस्तू म्हणून शाळेचे नाव, बॅच चे सन व ५० - सुवर्ण वर्षाचा लोगो असलेली सौर समई भेट देण्यात आली.

या अनोख्या स्नेह संमेलासाठी उज्वल जोशी यांनी सांगितले की, शालेय वर्षांमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तू, तसेच त्यावेळी ज्या वस्तूंमुळे कदाचित शिक्षा भोगावी लागली अशा चणे दाणे , गोट्या, सागर गोटे, चिंच, बोरे लिमलेटची गोळी विविध प्राणी आणि इंग्रजी अक्षरे असलेली बिस्किट्स हा सारा खजिना गोळा करून तो यावेळी भेट देण्याचा एक अनोखा विचार आम्ही केला. त्याला सगळ्यांनीच भक्कम साथ दिली. त्यामुळे सगळ्यांनाच पुन्हा एकदा शालेय जीवनात गेल्याची आठवण झाली. कुठलेही स्नेहसंमेलन किंवा कार्यक्रम हे एक टीमवर्क असते. त्यामुळे सगळ्यांनीच हा कार्यक्रम यशस्वी व्हायला खारीचा वाटा उचलला. काही ठळक नावे घ्यायची तर दिलीप कर्वे, अनुप आगटे, श्रीकांत दंडगे, डॉ. स्मिता फणसे, अलका फाटक, सुमन देशपांडे आणि उज्वल जोशी यांनी किंचित जास्त मेहेनत घेतल्याचे आढळून आले.

टॅग्स :thaneठाणे