शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

२०४७ सालचे मीरा भाईंदर शहर कसे असावे ह्यावर महापालिकेची दोन दिवसीय परिषद

By धीरज परब | Updated: February 7, 2024 20:39 IST

येणाऱ्या २०४७ साला पर्यंत मीरा भाईंदर शहर कसे असावे ह्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेकडून मीराभाईंदर@२०४७ परिषदेचे आयोजन ९ आणि १० फेब्रुवारी रोजी करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी बुधवारी दिली . 

मीरारोड - येणाऱ्या २०४७ साला पर्यंत मीरा भाईंदर शहर कसे असावे ह्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेकडून मीराभाईंदर@२०४७ परिषदेचे आयोजन ९ आणि १० फेब्रुवारी रोजी करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी बुधवारी दिली . 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत @२०४७ अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेची भविष्यातील वाटचाल - ओळख आदी उद्देशाने ह्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . काशीमीरा येथील भारतरत्न गानसमाज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात हि दोन दिवसीय परिषद होणार आहे . ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. परिषदेचे उदघाटन होईल . कोकण विभागीय अतिरिक्त आयुक्त विकास पानसरे,  एमएमआरडीए आयुक्त सतिशकुमार खडके, वसई विरारचे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार , मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर आदी उपस्थित राहणार आहेत . 

पहिल्या सत्रात महिला सबलीकरण या विषयावर लेखक - दिग्दर्शक अरविंद जगताप हे परुषांच्या नजरेतून महिला सक्षमीकरण या विषयावर संवाद साधतील.  व्हीआयएन मॅनेजमेंट कन्सल्टंट च्या अध्यक्ष डॉ. विजया शेट्टी महिलांसाठी डिजिटल सबलीकरण तर ग्लोबल ब्रँड बिल्डिंग कन्सलटंट आणि बूकवाला  एनजीओच्या सदस्य प्रीथी मारोली या नेतृत्व करणाऱ्या महिलांची भूमिका या विषयांवर बोलणार आहेत . दुसऱ्या सत्रात टेडएक्सचे तरूनसिंग चौहान  हे शाश्वत शहर ब्रँडिंग  या विषयावर मार्गदर्शन करतील  निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदन हे सुरक्षित शहर यावर  बोलणार आहेत . 

१० फेब्रुवारीला पहिल्या सत्रात भारत सरकारचे माजी सचिव आणि राजदूत असलेले डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे पर्यावरण आणि युवक या विषयावर विचार मांडतील . दुपारच्या सत्रात शिक्षणतज्ञ फ्रान्सिस जोसेफ हे शैक्षणिक धोरण आणि सुधारणा व शिक्षणावरील तंत्रज्ञानाचा प्रभाव या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत .  एमजीएम विद्यापीठाचे आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा शिक्षणतज्ञ सुधीर गव्हाणे हे तंत्रज्ञानाचा शिक्षणावरील प्रभाव या विषयावर मार्गदर्शन करतील. 

 तिसऱ्या सत्रात नवजात बालरोग तज्ञ, लेखक, वक्ते डॉ. अमोल अन्नदाते हे शाळेवर आधारित आरोग्य शिक्षण कार्यक्रमाची परिणामकारकता या विषयावर मार्गदर्शन करतील. सायंकाळी समारोप प्रसंगी नगरविकासचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंद राज,   मीरा भाईंदर - वसई विरार अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत पाठक आदू उपस्थित राहणार असल्याचे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आयुक्त काटकर यांनी दिली .