शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

२०४७ सालचे मीरा भाईंदर शहर कसे असावे ह्यावर महापालिकेची दोन दिवसीय परिषद

By धीरज परब | Updated: February 7, 2024 20:39 IST

येणाऱ्या २०४७ साला पर्यंत मीरा भाईंदर शहर कसे असावे ह्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेकडून मीराभाईंदर@२०४७ परिषदेचे आयोजन ९ आणि १० फेब्रुवारी रोजी करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी बुधवारी दिली . 

मीरारोड - येणाऱ्या २०४७ साला पर्यंत मीरा भाईंदर शहर कसे असावे ह्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेकडून मीराभाईंदर@२०४७ परिषदेचे आयोजन ९ आणि १० फेब्रुवारी रोजी करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी बुधवारी दिली . 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत @२०४७ अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेची भविष्यातील वाटचाल - ओळख आदी उद्देशाने ह्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . काशीमीरा येथील भारतरत्न गानसमाज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात हि दोन दिवसीय परिषद होणार आहे . ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. परिषदेचे उदघाटन होईल . कोकण विभागीय अतिरिक्त आयुक्त विकास पानसरे,  एमएमआरडीए आयुक्त सतिशकुमार खडके, वसई विरारचे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार , मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर आदी उपस्थित राहणार आहेत . 

पहिल्या सत्रात महिला सबलीकरण या विषयावर लेखक - दिग्दर्शक अरविंद जगताप हे परुषांच्या नजरेतून महिला सक्षमीकरण या विषयावर संवाद साधतील.  व्हीआयएन मॅनेजमेंट कन्सल्टंट च्या अध्यक्ष डॉ. विजया शेट्टी महिलांसाठी डिजिटल सबलीकरण तर ग्लोबल ब्रँड बिल्डिंग कन्सलटंट आणि बूकवाला  एनजीओच्या सदस्य प्रीथी मारोली या नेतृत्व करणाऱ्या महिलांची भूमिका या विषयांवर बोलणार आहेत . दुसऱ्या सत्रात टेडएक्सचे तरूनसिंग चौहान  हे शाश्वत शहर ब्रँडिंग  या विषयावर मार्गदर्शन करतील  निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदन हे सुरक्षित शहर यावर  बोलणार आहेत . 

१० फेब्रुवारीला पहिल्या सत्रात भारत सरकारचे माजी सचिव आणि राजदूत असलेले डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे पर्यावरण आणि युवक या विषयावर विचार मांडतील . दुपारच्या सत्रात शिक्षणतज्ञ फ्रान्सिस जोसेफ हे शैक्षणिक धोरण आणि सुधारणा व शिक्षणावरील तंत्रज्ञानाचा प्रभाव या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत .  एमजीएम विद्यापीठाचे आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा शिक्षणतज्ञ सुधीर गव्हाणे हे तंत्रज्ञानाचा शिक्षणावरील प्रभाव या विषयावर मार्गदर्शन करतील. 

 तिसऱ्या सत्रात नवजात बालरोग तज्ञ, लेखक, वक्ते डॉ. अमोल अन्नदाते हे शाळेवर आधारित आरोग्य शिक्षण कार्यक्रमाची परिणामकारकता या विषयावर मार्गदर्शन करतील. सायंकाळी समारोप प्रसंगी नगरविकासचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंद राज,   मीरा भाईंदर - वसई विरार अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत पाठक आदू उपस्थित राहणार असल्याचे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आयुक्त काटकर यांनी दिली .