शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांकडून केवळ स्वतःची तिजोरी भरण्याचे काम; विजय वडट्टीवार यांचा आरोप

By अजित मांडके | Updated: August 17, 2023 12:57 IST

राज्यात सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे.

ठाणे : राज्यात सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे. जे मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले 40 आणि आत्ता जे गेले आहेत ते 40 हे सर्व आपापल्या समर्थकांची तिजोरी भरण्याचे काम करत आहेत. ज्यांना मंत्रीपद मिळाले त्यांची तिजोरी भरली जात आहे. मात्र ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही ते नाराज असल्याचे दिसत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यात ज्यांना मंत्रीपद मिळालेले नाही त्यांना यापुढेही मिळणार नसून त्यांनी केवळ बोंबलत राहावे अशीच परिस्थिती असल्याचे ही ते म्हणाले. 

कळवा रुग्णालयात झालेल्या 18 मृत्यू प्रकरणाच्या घटनेनंतर गुरुवारी वडेट्टीवार यांनी कळवा रुग्णालयाची पाहणी केली यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

घराणेशाही बाबत त्यांना विचारले असता, जेव्हा सगळे पर्याय संपतात त्यावेळेस भाजपला  गांधी परिवार दिसतो. गांधी परिवाराकडे मग बोट दाखवले जाते, दहा वर्षांच्या उपलब्धी दाखवली असती, जनतेच्या भरवशावर मते मागितली असती तर राष्ट्रवादी सारख्या पुरोगामी पक्षाची गरजच भाजपला वाटली नसती असा गंभीर आरोप त्यांनी केला. तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी, हिंदुत्वाचे मसीहा समजता, विदेशात जाऊन गोडवे गाता मात्र देशातील जनतेला तुम्ही काहीच दिले नाही, दहा वर्षे सत्तेत असताना आता भाजपला परिवार म्हणण्याचा अधिकार कुठे उरतो, केवळ त्यांना गांधी या नावाची भीती असल्यानेच आता घराणेशाही किंबहुना परिवारवाद हा एकच पर्याय पुढे केला असल्याचेही ते म्हणाले.

2024 मध्ये ते जनतेच्या भरवशावर नाही तर ईव्हीएमच्या भरोशावर ते झेंडा फडकवणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील सरकारमध्ये सध्या सगळेच अलबेला सुरू आहे,  एकाने घोडा लाथ मारतो म्हणून गाढवापुढे उभे राहावे तर दुसऱ्याने गाढव लाथ मारतो म्हणून घोड्याला दोष देत बसावे अशीच काहीशी परिस्थिती राज्यातील सरकारची आहे. ही केवळ राज्यात सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे. जे मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले 40 आणि आत्ता जे गेले आहेत ते 40 हे सर्व आपापल्या समर्थकांची तिजोरी भरण्याचे काम करत आहेत.

ज्यांना मंत्रीपद मिळाले त्यांची तिजोरी भरली जात आहे. मात्र ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही ते नाराज असल्याचे दिसत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यात ज्यांना मंत्रीपद मिळालेले नाही त्यांना यापुढेही मिळणार नसून त्यांनी केवळ बोंबलत राहावे अशीच परिस्थिती आहे.