शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

सत्ताधाऱ्यांकडून केवळ स्वतःची तिजोरी भरण्याचे काम; विजय वडट्टीवार यांचा आरोप

By अजित मांडके | Updated: August 17, 2023 12:57 IST

राज्यात सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे.

ठाणे : राज्यात सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे. जे मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले 40 आणि आत्ता जे गेले आहेत ते 40 हे सर्व आपापल्या समर्थकांची तिजोरी भरण्याचे काम करत आहेत. ज्यांना मंत्रीपद मिळाले त्यांची तिजोरी भरली जात आहे. मात्र ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही ते नाराज असल्याचे दिसत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यात ज्यांना मंत्रीपद मिळालेले नाही त्यांना यापुढेही मिळणार नसून त्यांनी केवळ बोंबलत राहावे अशीच परिस्थिती असल्याचे ही ते म्हणाले. 

कळवा रुग्णालयात झालेल्या 18 मृत्यू प्रकरणाच्या घटनेनंतर गुरुवारी वडेट्टीवार यांनी कळवा रुग्णालयाची पाहणी केली यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

घराणेशाही बाबत त्यांना विचारले असता, जेव्हा सगळे पर्याय संपतात त्यावेळेस भाजपला  गांधी परिवार दिसतो. गांधी परिवाराकडे मग बोट दाखवले जाते, दहा वर्षांच्या उपलब्धी दाखवली असती, जनतेच्या भरवशावर मते मागितली असती तर राष्ट्रवादी सारख्या पुरोगामी पक्षाची गरजच भाजपला वाटली नसती असा गंभीर आरोप त्यांनी केला. तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी, हिंदुत्वाचे मसीहा समजता, विदेशात जाऊन गोडवे गाता मात्र देशातील जनतेला तुम्ही काहीच दिले नाही, दहा वर्षे सत्तेत असताना आता भाजपला परिवार म्हणण्याचा अधिकार कुठे उरतो, केवळ त्यांना गांधी या नावाची भीती असल्यानेच आता घराणेशाही किंबहुना परिवारवाद हा एकच पर्याय पुढे केला असल्याचेही ते म्हणाले.

2024 मध्ये ते जनतेच्या भरवशावर नाही तर ईव्हीएमच्या भरोशावर ते झेंडा फडकवणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील सरकारमध्ये सध्या सगळेच अलबेला सुरू आहे,  एकाने घोडा लाथ मारतो म्हणून गाढवापुढे उभे राहावे तर दुसऱ्याने गाढव लाथ मारतो म्हणून घोड्याला दोष देत बसावे अशीच काहीशी परिस्थिती राज्यातील सरकारची आहे. ही केवळ राज्यात सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे. जे मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले 40 आणि आत्ता जे गेले आहेत ते 40 हे सर्व आपापल्या समर्थकांची तिजोरी भरण्याचे काम करत आहेत.

ज्यांना मंत्रीपद मिळाले त्यांची तिजोरी भरली जात आहे. मात्र ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही ते नाराज असल्याचे दिसत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यात ज्यांना मंत्रीपद मिळालेले नाही त्यांना यापुढेही मिळणार नसून त्यांनी केवळ बोंबलत राहावे अशीच परिस्थिती आहे.