शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

जलजीवन, स्वच्छ भारत, घरकुलच्या कामांकडील दुर्लक्ष भाेवणार; अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांना नोटीस 

By सुरेश लोखंडे | Updated: April 7, 2023 17:33 IST

ठाणे जिल्ह्यातील जलजीवन, स्वच्छ भारत, घरकुलच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 

ठाणे : जिल्ह्यात गावखेड्यांसाठी उपयुक्त असलेले जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्रधान मंत्री आवास योजना, जनसुविधा, नागरी सुविधा, कर वसुली, पंधरावा वित्त आयोग, घरकुलांची रखडलेली कामे १५ मेपर्यंत पूर्ण करा, अन्यथा नाेकस नाेटीस देऊन धडक कारवाई करण्याचा बडगा उगारण्यात येईल, असे खडे बाेल ग्राम सेवकांसह संबंधीत अधिकार्यांना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी सुनावले.

येथील जिल्हा परिषदेने शहापूर पंचायत समितीच्या शेतकरी भवनमध्ये सीईओ यांनी विविध कामांची आढावा बैठक गुरूवारी घेऊन अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.  यावेळी त्यांनी विविध कामांची प्रत्यक्षपणे पाहाणी केली. या दौऱ्यासह आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख खाते प्रमुख, जिल्हा प्रकल्प संचालक छाया सिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता अर्जु न गाेळे, शहापूर गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे आदींसह विभाग प्रमुख, शाखा अभियंता. विस्तार अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थित होते. १५ मे पर्यंत घरकुल योजनाची रखडलेली सर्व कामे पुर्ण करणे. स्वच्छ भारत मिशन टप्पा २ च्या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली एक हजार ५०० लोकसंख्या असलेल्या गांवाची कामे १५ दिवसात पूर्ण करण्याची तंबी सीईओ यांनी या बैठकीत दिली. अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शहरातील जीव घेण्या प्लॅस्टीकचा वापर लक्षात घेऊन गांवखेड्यात यास वेळीच आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेने प्लास्टिक व्यवस्थापनसाठी पुढाकार घेतला. या कामास सुरुवात केली असून भिवंडी, अंबरनाथ, शहापूर येथे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.प्लॅस्टिक पुणर्वापर औद्योगिक क्षेत्रात महत्त्वचे योगदान ठरत आहे. औद्योगिक क्षेत्रात इंधनाच्या स्वरूपात प्लॅस्टिक वापरले जाणारे आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत प्लास्टिक पासून रस्ता तयार करण्यात येणार आहे. भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी एक मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोटेक कंपनी पुढाकार घेतल्याचे उघड झाले आहे. 

  

टॅग्स :thaneठाणे