शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठी मोर्चा; एकनाथ शिंदे यांचा पलटवार

By अजित मांडके | Updated: June 30, 2023 18:38 IST

'कोवीड मृतदेहाच्या बॅगमध्ये पैसे खाण्याचे मोठे पाप त्यांनी केले.'

मोर्चा कोणी कोणावर काढायचा, हा प्रश्न आहे, गेली २० ते २५ वर्षे मुंबईत सत्ता कोणाची होती हे सर्वांनाच माहित आहे, त्यांनी केवळ आपली घरे भरली, मुंबईकारांना मात्र सुविधांसाठी वंचित ठेवले, कोवीडमध्ये माणसे मरत असतांना ते कोवीडच्या नावाखाली लुट करीत होते. कोवीड मृतदेहाच्या बॅगमध्ये पैसे खाण्याचे मोठे पाप त्यांनी केले. भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठला आणि मड्याच्या टाळू खाण्याचे काम त्यांनी केले.  

दरोडा घालायचा आणि चोरी केली म्हणून बोलायचे अशा प्रकारच्या वृत्तीला मुंबईकर चोख उत्तर देतील. मुंबईकराच्या डोळ्यात धुळ फेकता येणार नाही, तुम्ही जे काही केड्रीट घेतले त्याचे सत्य बाहेर येईल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांचे नाव न घेता टिका केली. हा मोर्चा स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठीच काढला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेना, भाजप युती सरकारची वर्षपुर्ती झाल्याच्या निमित्ताने ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थितीत जनतेशी संवाद साधला, तसेच यावेळी लहान मुले, सफाई कामगार, पोलीस यांच्या समवेत केक कापून वर्षपुर्तीचा आनंद साजरा केला.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही टिका केली. २०१९ शिवसेना, युती घोषीत त्यानंतर सत्तेत युतीचे सरकार येणे अपेक्षित होते. परंतु दुर्देवाने महाविकास आघाडीचे सरकार आले. कोवीडच्या नावाखाली फडणवीसांच्या योजना बंद केल्या, प्रकल्प थांबविले गेले. मुख्यमंत्री आपला असतांनाही सरकार कोण चालवित होते, शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले होते. म्हणून शिवसेना वाचविण्यासाठी, शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी भलतच धाडस करावे लागले, ते सोपे नव्हते. परंतु महाराष्टÑाच्या जनतेत, शिवसेनेच्या आमदारांमध्ये जे काही घडत होते, उद्रेक होता,त्याला वाचा फोडण्याचे काम शिंदे यांनी केले. त्यातून हे सरकार स्थापन झाल्याचेही त्यांनी सांगितले.  

 शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की पहाटेच्या शप्पथविधी ची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू असून शरद पवार म्हणाले मी गुगली टाकली आणि देवेंद्र फडणवीस याना  क्लीन बोल्ड केले पण खरी विकेट अजित पवारांचीच गेली असल्याचा टोला  मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला. तर विरोधीपक्ष नेते अजित पवार हे मनातून बोलत नाहीत तर त्यांना बोलावे लागत असल्याचे  शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे