शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठी मोर्चा; एकनाथ शिंदे यांचा पलटवार

By अजित मांडके | Updated: June 30, 2023 18:38 IST

'कोवीड मृतदेहाच्या बॅगमध्ये पैसे खाण्याचे मोठे पाप त्यांनी केले.'

मोर्चा कोणी कोणावर काढायचा, हा प्रश्न आहे, गेली २० ते २५ वर्षे मुंबईत सत्ता कोणाची होती हे सर्वांनाच माहित आहे, त्यांनी केवळ आपली घरे भरली, मुंबईकारांना मात्र सुविधांसाठी वंचित ठेवले, कोवीडमध्ये माणसे मरत असतांना ते कोवीडच्या नावाखाली लुट करीत होते. कोवीड मृतदेहाच्या बॅगमध्ये पैसे खाण्याचे मोठे पाप त्यांनी केले. भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठला आणि मड्याच्या टाळू खाण्याचे काम त्यांनी केले.  

दरोडा घालायचा आणि चोरी केली म्हणून बोलायचे अशा प्रकारच्या वृत्तीला मुंबईकर चोख उत्तर देतील. मुंबईकराच्या डोळ्यात धुळ फेकता येणार नाही, तुम्ही जे काही केड्रीट घेतले त्याचे सत्य बाहेर येईल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांचे नाव न घेता टिका केली. हा मोर्चा स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठीच काढला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेना, भाजप युती सरकारची वर्षपुर्ती झाल्याच्या निमित्ताने ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थितीत जनतेशी संवाद साधला, तसेच यावेळी लहान मुले, सफाई कामगार, पोलीस यांच्या समवेत केक कापून वर्षपुर्तीचा आनंद साजरा केला.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही टिका केली. २०१९ शिवसेना, युती घोषीत त्यानंतर सत्तेत युतीचे सरकार येणे अपेक्षित होते. परंतु दुर्देवाने महाविकास आघाडीचे सरकार आले. कोवीडच्या नावाखाली फडणवीसांच्या योजना बंद केल्या, प्रकल्प थांबविले गेले. मुख्यमंत्री आपला असतांनाही सरकार कोण चालवित होते, शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले होते. म्हणून शिवसेना वाचविण्यासाठी, शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी भलतच धाडस करावे लागले, ते सोपे नव्हते. परंतु महाराष्टÑाच्या जनतेत, शिवसेनेच्या आमदारांमध्ये जे काही घडत होते, उद्रेक होता,त्याला वाचा फोडण्याचे काम शिंदे यांनी केले. त्यातून हे सरकार स्थापन झाल्याचेही त्यांनी सांगितले.  

 शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की पहाटेच्या शप्पथविधी ची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू असून शरद पवार म्हणाले मी गुगली टाकली आणि देवेंद्र फडणवीस याना  क्लीन बोल्ड केले पण खरी विकेट अजित पवारांचीच गेली असल्याचा टोला  मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला. तर विरोधीपक्ष नेते अजित पवार हे मनातून बोलत नाहीत तर त्यांना बोलावे लागत असल्याचे  शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे