शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठी मोर्चा; एकनाथ शिंदे यांचा पलटवार

By अजित मांडके | Updated: June 30, 2023 18:38 IST

'कोवीड मृतदेहाच्या बॅगमध्ये पैसे खाण्याचे मोठे पाप त्यांनी केले.'

मोर्चा कोणी कोणावर काढायचा, हा प्रश्न आहे, गेली २० ते २५ वर्षे मुंबईत सत्ता कोणाची होती हे सर्वांनाच माहित आहे, त्यांनी केवळ आपली घरे भरली, मुंबईकारांना मात्र सुविधांसाठी वंचित ठेवले, कोवीडमध्ये माणसे मरत असतांना ते कोवीडच्या नावाखाली लुट करीत होते. कोवीड मृतदेहाच्या बॅगमध्ये पैसे खाण्याचे मोठे पाप त्यांनी केले. भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठला आणि मड्याच्या टाळू खाण्याचे काम त्यांनी केले.  

दरोडा घालायचा आणि चोरी केली म्हणून बोलायचे अशा प्रकारच्या वृत्तीला मुंबईकर चोख उत्तर देतील. मुंबईकराच्या डोळ्यात धुळ फेकता येणार नाही, तुम्ही जे काही केड्रीट घेतले त्याचे सत्य बाहेर येईल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांचे नाव न घेता टिका केली. हा मोर्चा स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठीच काढला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेना, भाजप युती सरकारची वर्षपुर्ती झाल्याच्या निमित्ताने ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थितीत जनतेशी संवाद साधला, तसेच यावेळी लहान मुले, सफाई कामगार, पोलीस यांच्या समवेत केक कापून वर्षपुर्तीचा आनंद साजरा केला.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही टिका केली. २०१९ शिवसेना, युती घोषीत त्यानंतर सत्तेत युतीचे सरकार येणे अपेक्षित होते. परंतु दुर्देवाने महाविकास आघाडीचे सरकार आले. कोवीडच्या नावाखाली फडणवीसांच्या योजना बंद केल्या, प्रकल्प थांबविले गेले. मुख्यमंत्री आपला असतांनाही सरकार कोण चालवित होते, शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले होते. म्हणून शिवसेना वाचविण्यासाठी, शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी भलतच धाडस करावे लागले, ते सोपे नव्हते. परंतु महाराष्टÑाच्या जनतेत, शिवसेनेच्या आमदारांमध्ये जे काही घडत होते, उद्रेक होता,त्याला वाचा फोडण्याचे काम शिंदे यांनी केले. त्यातून हे सरकार स्थापन झाल्याचेही त्यांनी सांगितले.  

 शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की पहाटेच्या शप्पथविधी ची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू असून शरद पवार म्हणाले मी गुगली टाकली आणि देवेंद्र फडणवीस याना  क्लीन बोल्ड केले पण खरी विकेट अजित पवारांचीच गेली असल्याचा टोला  मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला. तर विरोधीपक्ष नेते अजित पवार हे मनातून बोलत नाहीत तर त्यांना बोलावे लागत असल्याचे  शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे