शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

मीरा भाईंदर मधील १४ अतिधोकादायक तर १९ धोकादायक इमारती रिक्त करण्याचे पालिकेसमोर आव्हान 

By धीरज परब | Updated: May 3, 2023 19:48 IST

मीरा भाईंदर महापालिकेने पावसाळ्या आधी तोडणे आवश्यक असलेल्या अतिधोकादायक अशा १४ इमारतींची यादी जाहीर केली आहे.

मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेने पावसाळ्या आधी तोडणे आवश्यक असलेल्या अतिधोकादायक अशा १४ इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्या शिवाय इमारत रिकामी करून दुरुस्ती करणे आवश्यक असलेल्या इमारतींची संख्या १९ आहे. अतिधोकादायक इमारती पावसाळ्या आधी रिकाम्या करण्याचे आव्हान पालिके समोर असून अन्य धोकादायक इमारतींना बाबत पालिकेच्या भूमिके कडे लक्ष लागले आहे. 

मीरा भाईंदर मध्ये ग्रामपंचायत  व नगर परिषद काळा पासून असलेल्या जुन्या इमारतींची संख्या मोठी आहे. पावसाळ्यात धोकादायक व जुन्या इमारतींच्या दुर्घटना घडत असून काही प्रकरणात लोकांचे बळी गेले आहेत. यंदाच्या पावसाळ्या आधी महापालिकेने शाहजरातील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास सांगितले होते. त्याच्या अहवाला नुसार पालिकेने शहरातील एकूण ४२९ इमारतींची यादी विविध श्रेणी नुसार तयार केली आहे. 

अतिधोकादायक स्वरूपातील १४ इमारतीची यादी पालिकेने जाहीर केली आहे. प्रभाग समिती १ व ४ मध्ये प्रत्येकी १ इमारत, प्रभाग समिती २ व ६ मध्ये प्रत्येकी ४ इमारत तर प्रभाग समिती ३ मध्ये ५ अशा एकूण १४ अतिधोकादायक इमारती पालिकेने जाहीर केल्या आहेत. त्यापैकी २ इमारती तोडल्या असून ३ इमारती तोडण्याचे काम सुरु आहे. रिकामी केलेली १ इमारत असून रहिवासी व्याप्त पण रिक्त करण्याचे काम सुरु असलेल्या ५ इमारती आहेत. तर ४ अतिधोकादायक इमारतींना न्यायालय कडून स्थगिती आदेश मिळाला आहे.  

या शिवाय इमारत रिकामी करून दुरुस्ती करण्या योग्य १९ इमारती आहेत. इमारत रिकामी न करता दुरुस्ती होणाऱ्या इमारतींची संख्या ३८३ असून किरकोळ दुरुस्ती आवश्यक असलेल्या इमारतींची संख्या १३ आहे. पावसाळा सुरु होण्याआधी अतिधोकादायक इमारती पाडून घेणे आवश्यक आहेच. पण ज्या १९ धोकादायक इमारती रिकाम्या करून दुरुस्ती करण्यायोग्य आहेत त्या बाबत पालिकेचे भूमिका अजून जाहीर झालेली नाही. रहिवास व्याप्त धोकादायक इमारती ह्या चिंतेचा विषय असून त्या रिकाम्या करणे अवघड ठरते. पालिका धोकादायक इमारत रिकामी न केल्यास पोलीस बंदोबस्तात ती खाली करण्याचे नोटीस द्वारे बजावत असतात.  

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर