शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
3
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
4
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
5
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
6
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
7
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
8
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
9
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
10
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
11
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
12
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
13
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
14
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
15
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
16
ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...
17
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
18
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
19
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
20
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव

बेकायदेशीर जमाव जमवत चिथावणी, सरकारी अधिकाऱ्यास धक्का, टाळे तोडत नैसर्गिक तलावात मूर्ति विसर्जन करणाऱ्या २६ ते ३१ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 23:02 IST

पालिका तलावाचे टाळे तोडून नैसर्गिक तलावात गणेश मुर्त्यांचे विसर्जन केल्या प्रकरणी शनिवार दि. ३० ऑगस्ट रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात २६ ते ३१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिरारोड - मुंबई उच्च न्यायालय आदेश नुसार मीरा भाईंदर महापालिकेने कृत्रिम तलाव गणेश विसर्जन साठी उभारले आहेत. मात्र न्यायालयाचे आदेश आणि उपस्थित पोलीस - पालिका अधिकाऱ्यांना न जुमानता भाईंदर पश्चिमेच्या राई गावातील काहींनी लोकांना चिथावणी देत बेकायदा जमाव जमवला. पालिका तलावाचे टाळे तोडून नैसर्गिक तलावात गणेश मुर्त्यांचे विसर्जन केल्या प्रकरणी शनिवार दि. ३० ऑगस्ट रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात २६ ते ३१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नैसर्गिक जलस्रोत मधील घातक प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने पीओपी मुर्त्यांच्या विसर्जनास बंदी आणली. मुंबई उच्च न्यायालयाने देखील नुकताच ६ फूट पर्यंतच्या पीओपी व अन्य मुर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शासन परिपत्रक अनुषंगाने मीरा भाईंदर महापालिकेने शहरात ३५ कृत्रिम तलाव केले. नैसर्गिक तलाव बंद करत प्रवेशद्वारास टाळी मारली. 

मात्र दिड दिवसांच्या विसर्जन वेळी राई गावातील ओम राऊत, मनीषा राऊत, मंगेश पाटील, प्रशांत म्हात्रे, हेमद्र भोईर, मनोज राऊत व अन्य यांनी गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणार नाही, नैसर्गिक तलावताच करणार असे सांगून लोकांना चिथावणी देऊन बेकायदा जमाव जमवला. पोलिस आणि पालिकेचे अधिकारी यांनी त्यांना न्यायालयाच्या आदेशाची माहिती देत त्याचे पालन करा, शांतता राखा असे समजावून सांगून देखील ते कोणी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. 

त्यामुळे राई गावात विसर्जन ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू लागली. त्यावेळी काही लोकांनी मोरवा गावात गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक तलावात करू दिले जात असल्याची व्हिडीओ क्लिप दाखवली. त्यावरून पालिका अधिकाऱ्यांनी मोरवा गावात नैसर्गिक तलावात विसर्जनाची परवानगी दिली तर आम्हाला का नाही ? अशी विचारणा केली जाऊ लागली. 

पालिका तलावाच्या प्रवेशद्वारास असलेले टाळे तोडण्याचा प्रयत्न सुरु झाला. पोलिसांनी त्यांना रोखले असता ते आणखी आक्रमक झाले. पालिकेचे सहायक आयुक्त योगेश गुणीजन यांना मनीषा राऊत यांनी धक्का मारून बाजूला ढकलले असता पोलिसांनी गुणीजन यांना संरक्षण दिले. त्या वादावादी दरम्यान ओम राऊत व अन्य एकाने दगड घेऊन पालिका तलावाचे टाळे तोडून बळजबरीने आत  घुसले व अनेक पीओपी व अन्य मुर्त्यांचे तलावात विसर्जन केले. 

या घटनेने विसर्जनास गालबोट लागून तणावाचे वातावरण झाले. शनिवारी ३० ऑगस्ट रोजी गुणीजन यांच्या फिर्यादी वरून चिथावणी देत बेकायदा जमाव जमवून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून सरकारी कामात अडथळा आणला. सरकारी कर्मचाऱ्यास धक्का मारून ढकलले आणि पालिका तलाव प्रवेशद्वाराचे टाळे तोडून नैसर्गिक तलावात मूर्ती विसर्जन केले म्हणून भाईंदर पोलिसांनी २६ ते ३१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

राई गावातील ओम राऊत, मनीषा राऊत, मंगेश पाटील, प्रशांत म्हात्रे, हेमद्र भोईर, मनोज राऊत व अन्य २० ते २५ जण हे आरोपी असून पोलीस तपास करत आहेत.