शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणावर विस्तव ठेवून केलेला विकास तात्कालिक ठरणार; १३०० वृक्ष पाडणाऱ्या बिल्डरला रोखणार?

By संदीप प्रधान | Updated: April 21, 2025 06:52 IST

बिल्डरांना झाडे तोडण्यापासून अनेक परवानग्या चुटकीसरशी मिळतात. बिल्डरने झाडे तोडण्यामुळे हळहळ व्यक्त करणारे, बिल्डरने नाल्यांचे मार्ग बदलल्याने चिडचिड व्यक्त करणारे, हे सारे अतिसूक्ष्म आवाज आहेत

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

ठाण्यातील एका नामांकित विकासकाने १३०० वृक्ष तोडण्याकरिता वृक्ष प्राधिकरणाकडे अर्ज केला आहे. यामधील किमान शंभरेक वृक्ष हे जुनेपुराणे आहेत. मात्र बिल्डरने मोठ्या खुबीने त्यांचे वय कमी दाखवले. वन विभागाने ही मखलाशी उघड केली. कल्याणमध्ये रेल्वे यार्ड प्रकल्पाकरिता ४११ झाडे तोडण्याचा प्रस्ताव रेल्वेने दिला होता. तोडलेल्या १५० झाडांचे पुनर्रोपण केले. मात्र, पाणी न दिल्याने अनेक झाडे सुकली. काही दिवसांपूर्वी उत्तन येथील मेट्रो कारशेडकरिता अशीच १२०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे. मुंबई व ठाणे येथे सिमेंटचे जंगल उभे राहिले आहे. जी काही थोडीफार वनसंपदा शिल्लक आहे ती मेट्रो, रस्ते, पूल वगैरेंसाठी आणि बड्या बिल्डरांच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी नष्ट केली जात आहे. विकास ही निश्चितच गरज आहे. परंतु पर्यावरणावर विस्तव ठेवून केलेला विकास तात्कालिक ठरणार आहे. 

ठाणे, डोंबिवली, कल्याण ही शहरे मुंबईसारखीच अहोरात्र सुरू असतात. अनेक नामांकित बिल्डर ठाण्यात इमारती उभ्या करत आहेत. शेकडो इमारतींचा समावेश असलेली शहरे आकाराला येत आहेत. याकरिता एकेकाळी जंगल असलेल्या भागातील वृक्ष सर्रास छाटले जात आहेत. घोडबंदर रोडवरून मीरारोडच्या दिशेने निघाल्यावर ठाण्यातील किती मोठ्या जंगलाची तोड करून टॉवर उभे केलेत, याची जाणीव होते. लोकांची घराची गरज वाढत आहे. मुंबईत नोकरीला जाणाऱ्यांसाठी ठाणे हे सोयीचे आहे. त्यामुळे ठाण्यात विकास सुरू आहे आणि वृक्षतोडही.

एक झाड तोडले तर त्या बदल्यात पाच झाडे लावायची, झाडाच्या वयोमानानुसार बिल्डरांनी पैसे भरायचे वगैरे नियम, अटी कागदावर असतात. वास्तव असे आहे की, बिल्डरांना लागणाऱ्या वेगवेगळ्या ३० ते ३५ ना-हरकती मिळवण्यासाठी जेव्हा फाईल वेगवेगळ्या टेबलवर फिरते तेव्हा काही वरिष्ठ अधिकारी हे प्रतिष्ठित गृहनिर्माण प्रकल्पात स्वत:साठी फ्लॅट पदरात पाडून घेतात. काही चौरस फुटांच्या दराने पैसे घेतात. स्थानिक लोकप्रतिनिधींची तर त्यांच्या मतदारसंघातील बड्या गृहनिर्माण प्रकल्पात पार्टनरशिप असते. त्यामुळे बिल्डरांना झाडे तोडण्यापासून अनेक परवानग्या चुटकीसरशी मिळतात. बिल्डरने झाडे तोडण्यामुळे हळहळ व्यक्त करणारे, बिल्डरने नाल्यांचे मार्ग बदलल्याने चिडचिड व्यक्त करणारे, हे सारे अतिसूक्ष्म आवाज आहेत.

बिल्डरांच्या वृक्षतोडीला मंजुरी मिळते; पण आदिवासी पाड्यांना वीज देण्यासाठी विजेचे खांब उभे करायचे किंवा पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाइपलाइन टाकायची तर हेच वनखाते वर्षानुवर्षे फाईलवर बसून राहते. घोडबंदर रोडवरील तहानलेल्या आदिवासी पाड्यांची व्यथा अलीकडेच ‘लोकमत’ने मांडली. ठाण्यातील १३०० झाडे तोडण्याची परवानगी मागणाऱ्या बिल्डरला गुपचूप परवानगी मिळेल. त्याची मखलाशी उघड करणारे वन विभागाचे तसेच महापालिकेचे अधिकारी तृप्तीचा ढेकर देतील.