शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

'सैन्यदलात नऊ हजार कॅप्टन, मेजर पदे रिक्त, इच्छाशक्तीअभावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 04:55 IST

अच्युत देव : नऊ हजार कॅप्टन, मेजर पदे रिक्त

डोंबिवली : सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि देशप्रेमाची आवश्यकता असते. शारीरिकदृष्ट्या थोडी कमतरता असल्यास त्याची तयारी करता येते. आपल्याकडे सैन्यदलात भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात; मात्र देशप्रेम आणि इच्छाशक्तीचा अभाव असल्याने अनेक जण अपयशी ठरतात. त्यामुळेच सैन्यदलात कॅप्टन आणि मेजर यांच्या नऊ हजार जागा रिक्त आहेत, अशी खंत निवृत्त मेजर अच्युत देव यांनी व्यक्त केली.

सैन्यदलात जाण्यासाठी प्रेरित करण्यासाठी देव यांनी स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गणेश मंदिर संस्थान, नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीतर्फे शुक्रवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद शाळेची राणाप्रताप शाखा आणि गुरुकुल द डे स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्याशी संवाद साधताना व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाघमारे, कार्यवाह दीपक कुलकर्णी उपस्थित होते. देव यांनी १९६५ च्या लढाईतील अब्दुल हमीद यांची शौर्यगाथा सांगितली. ते म्हणाले की, सैनिकांची शौर्यगाथा महत्त्वाची असून जाज्ज्वल्य देशभक्ती महत्त्वाची असते. या देशभक्तीमुळेच पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर द्यायला सैन्यदल सक्षमपणे उभे आहे. सैन्यदलात नि:स्वार्थपणे देशभक्तीची मानसिकता असलेले तरुण हवे आहेत. त्यासाठी राष्ट्रप्रेम, प्रबळ इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ज्यांना पैसा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी सैन्यदल नाही.

सरकार तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व्यवस्थित होईल, याची काळजी घेते. मला विद्यार्थ्यांना निराश करायचे नसून वास्तव सांगत आहे. एकदा सैन्यदलात करिअर निवडल्यानंतर मागे वळता येत नाही. वाघासारखे असला तरच सैन्यदलात जा. सैन्यदलात हुशारी, समन्वय, आणि मानसिकतेची गरज असते. एनडीए ही संरक्षण दलाला पूरक अशी संस्था आहे. या संस्थेत सैन्य दलासह इतरही शिक्षण पूर्ण करता येते, असे देव यांनी सांगितले.गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले, उपाध्यक्ष अलका मुतालिक, विश्वस्त मंदार हळबे, अच्युत कºहाडकर, गौरी खुंटे, संयोजन समितीचे सहसंयोजक भूषण धर्माधिकारी, चिन्मय कुलकर्णी, अनिकेत घमंडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुनील पांचाळ यांनी केले.त्यापेक्षा जास्त जीव रस्ता अपघातांत जातात!काही पालक मुलांना सैन्यदलात जाण्यापासून रोखतात. त्यांना समुपदेशनाची गरज आहे. कारगील युद्धात ५२५ जवान मारले गेले. त्यापेक्षा अधिक लोक ठाणे आणि डोंबिवलीमध्ये रस्ता अपघातांत मरतात. सैनिकाला निदान शत्रू तरी माहीत असतो; रस्ता अपघातांत मात्र आपण पूर्णपणे बेसावध असतो. देशाला तुमची गरज असून सैन्यदलात भरती व्हायला हवे, असेही देव यांनी सांगितले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीIndian Armyभारतीय जवान