शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

'सैन्यदलात नऊ हजार कॅप्टन, मेजर पदे रिक्त, इच्छाशक्तीअभावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 04:55 IST

अच्युत देव : नऊ हजार कॅप्टन, मेजर पदे रिक्त

डोंबिवली : सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि देशप्रेमाची आवश्यकता असते. शारीरिकदृष्ट्या थोडी कमतरता असल्यास त्याची तयारी करता येते. आपल्याकडे सैन्यदलात भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात; मात्र देशप्रेम आणि इच्छाशक्तीचा अभाव असल्याने अनेक जण अपयशी ठरतात. त्यामुळेच सैन्यदलात कॅप्टन आणि मेजर यांच्या नऊ हजार जागा रिक्त आहेत, अशी खंत निवृत्त मेजर अच्युत देव यांनी व्यक्त केली.

सैन्यदलात जाण्यासाठी प्रेरित करण्यासाठी देव यांनी स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गणेश मंदिर संस्थान, नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीतर्फे शुक्रवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद शाळेची राणाप्रताप शाखा आणि गुरुकुल द डे स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्याशी संवाद साधताना व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाघमारे, कार्यवाह दीपक कुलकर्णी उपस्थित होते. देव यांनी १९६५ च्या लढाईतील अब्दुल हमीद यांची शौर्यगाथा सांगितली. ते म्हणाले की, सैनिकांची शौर्यगाथा महत्त्वाची असून जाज्ज्वल्य देशभक्ती महत्त्वाची असते. या देशभक्तीमुळेच पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर द्यायला सैन्यदल सक्षमपणे उभे आहे. सैन्यदलात नि:स्वार्थपणे देशभक्तीची मानसिकता असलेले तरुण हवे आहेत. त्यासाठी राष्ट्रप्रेम, प्रबळ इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ज्यांना पैसा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी सैन्यदल नाही.

सरकार तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व्यवस्थित होईल, याची काळजी घेते. मला विद्यार्थ्यांना निराश करायचे नसून वास्तव सांगत आहे. एकदा सैन्यदलात करिअर निवडल्यानंतर मागे वळता येत नाही. वाघासारखे असला तरच सैन्यदलात जा. सैन्यदलात हुशारी, समन्वय, आणि मानसिकतेची गरज असते. एनडीए ही संरक्षण दलाला पूरक अशी संस्था आहे. या संस्थेत सैन्य दलासह इतरही शिक्षण पूर्ण करता येते, असे देव यांनी सांगितले.गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले, उपाध्यक्ष अलका मुतालिक, विश्वस्त मंदार हळबे, अच्युत कºहाडकर, गौरी खुंटे, संयोजन समितीचे सहसंयोजक भूषण धर्माधिकारी, चिन्मय कुलकर्णी, अनिकेत घमंडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुनील पांचाळ यांनी केले.त्यापेक्षा जास्त जीव रस्ता अपघातांत जातात!काही पालक मुलांना सैन्यदलात जाण्यापासून रोखतात. त्यांना समुपदेशनाची गरज आहे. कारगील युद्धात ५२५ जवान मारले गेले. त्यापेक्षा अधिक लोक ठाणे आणि डोंबिवलीमध्ये रस्ता अपघातांत मरतात. सैनिकाला निदान शत्रू तरी माहीत असतो; रस्ता अपघातांत मात्र आपण पूर्णपणे बेसावध असतो. देशाला तुमची गरज असून सैन्यदलात भरती व्हायला हवे, असेही देव यांनी सांगितले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीIndian Armyभारतीय जवान