शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'सैन्यदलात नऊ हजार कॅप्टन, मेजर पदे रिक्त, इच्छाशक्तीअभावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 04:55 IST

अच्युत देव : नऊ हजार कॅप्टन, मेजर पदे रिक्त

डोंबिवली : सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि देशप्रेमाची आवश्यकता असते. शारीरिकदृष्ट्या थोडी कमतरता असल्यास त्याची तयारी करता येते. आपल्याकडे सैन्यदलात भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात; मात्र देशप्रेम आणि इच्छाशक्तीचा अभाव असल्याने अनेक जण अपयशी ठरतात. त्यामुळेच सैन्यदलात कॅप्टन आणि मेजर यांच्या नऊ हजार जागा रिक्त आहेत, अशी खंत निवृत्त मेजर अच्युत देव यांनी व्यक्त केली.

सैन्यदलात जाण्यासाठी प्रेरित करण्यासाठी देव यांनी स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गणेश मंदिर संस्थान, नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीतर्फे शुक्रवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद शाळेची राणाप्रताप शाखा आणि गुरुकुल द डे स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्याशी संवाद साधताना व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाघमारे, कार्यवाह दीपक कुलकर्णी उपस्थित होते. देव यांनी १९६५ च्या लढाईतील अब्दुल हमीद यांची शौर्यगाथा सांगितली. ते म्हणाले की, सैनिकांची शौर्यगाथा महत्त्वाची असून जाज्ज्वल्य देशभक्ती महत्त्वाची असते. या देशभक्तीमुळेच पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर द्यायला सैन्यदल सक्षमपणे उभे आहे. सैन्यदलात नि:स्वार्थपणे देशभक्तीची मानसिकता असलेले तरुण हवे आहेत. त्यासाठी राष्ट्रप्रेम, प्रबळ इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ज्यांना पैसा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी सैन्यदल नाही.

सरकार तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व्यवस्थित होईल, याची काळजी घेते. मला विद्यार्थ्यांना निराश करायचे नसून वास्तव सांगत आहे. एकदा सैन्यदलात करिअर निवडल्यानंतर मागे वळता येत नाही. वाघासारखे असला तरच सैन्यदलात जा. सैन्यदलात हुशारी, समन्वय, आणि मानसिकतेची गरज असते. एनडीए ही संरक्षण दलाला पूरक अशी संस्था आहे. या संस्थेत सैन्य दलासह इतरही शिक्षण पूर्ण करता येते, असे देव यांनी सांगितले.गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले, उपाध्यक्ष अलका मुतालिक, विश्वस्त मंदार हळबे, अच्युत कºहाडकर, गौरी खुंटे, संयोजन समितीचे सहसंयोजक भूषण धर्माधिकारी, चिन्मय कुलकर्णी, अनिकेत घमंडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुनील पांचाळ यांनी केले.त्यापेक्षा जास्त जीव रस्ता अपघातांत जातात!काही पालक मुलांना सैन्यदलात जाण्यापासून रोखतात. त्यांना समुपदेशनाची गरज आहे. कारगील युद्धात ५२५ जवान मारले गेले. त्यापेक्षा अधिक लोक ठाणे आणि डोंबिवलीमध्ये रस्ता अपघातांत मरतात. सैनिकाला निदान शत्रू तरी माहीत असतो; रस्ता अपघातांत मात्र आपण पूर्णपणे बेसावध असतो. देशाला तुमची गरज असून सैन्यदलात भरती व्हायला हवे, असेही देव यांनी सांगितले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीIndian Armyभारतीय जवान