शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

'सैन्यदलात नऊ हजार कॅप्टन, मेजर पदे रिक्त, इच्छाशक्तीअभावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 04:55 IST

अच्युत देव : नऊ हजार कॅप्टन, मेजर पदे रिक्त

डोंबिवली : सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि देशप्रेमाची आवश्यकता असते. शारीरिकदृष्ट्या थोडी कमतरता असल्यास त्याची तयारी करता येते. आपल्याकडे सैन्यदलात भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात; मात्र देशप्रेम आणि इच्छाशक्तीचा अभाव असल्याने अनेक जण अपयशी ठरतात. त्यामुळेच सैन्यदलात कॅप्टन आणि मेजर यांच्या नऊ हजार जागा रिक्त आहेत, अशी खंत निवृत्त मेजर अच्युत देव यांनी व्यक्त केली.

सैन्यदलात जाण्यासाठी प्रेरित करण्यासाठी देव यांनी स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गणेश मंदिर संस्थान, नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीतर्फे शुक्रवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद शाळेची राणाप्रताप शाखा आणि गुरुकुल द डे स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्याशी संवाद साधताना व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाघमारे, कार्यवाह दीपक कुलकर्णी उपस्थित होते. देव यांनी १९६५ च्या लढाईतील अब्दुल हमीद यांची शौर्यगाथा सांगितली. ते म्हणाले की, सैनिकांची शौर्यगाथा महत्त्वाची असून जाज्ज्वल्य देशभक्ती महत्त्वाची असते. या देशभक्तीमुळेच पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर द्यायला सैन्यदल सक्षमपणे उभे आहे. सैन्यदलात नि:स्वार्थपणे देशभक्तीची मानसिकता असलेले तरुण हवे आहेत. त्यासाठी राष्ट्रप्रेम, प्रबळ इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ज्यांना पैसा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी सैन्यदल नाही.

सरकार तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व्यवस्थित होईल, याची काळजी घेते. मला विद्यार्थ्यांना निराश करायचे नसून वास्तव सांगत आहे. एकदा सैन्यदलात करिअर निवडल्यानंतर मागे वळता येत नाही. वाघासारखे असला तरच सैन्यदलात जा. सैन्यदलात हुशारी, समन्वय, आणि मानसिकतेची गरज असते. एनडीए ही संरक्षण दलाला पूरक अशी संस्था आहे. या संस्थेत सैन्य दलासह इतरही शिक्षण पूर्ण करता येते, असे देव यांनी सांगितले.गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले, उपाध्यक्ष अलका मुतालिक, विश्वस्त मंदार हळबे, अच्युत कºहाडकर, गौरी खुंटे, संयोजन समितीचे सहसंयोजक भूषण धर्माधिकारी, चिन्मय कुलकर्णी, अनिकेत घमंडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुनील पांचाळ यांनी केले.त्यापेक्षा जास्त जीव रस्ता अपघातांत जातात!काही पालक मुलांना सैन्यदलात जाण्यापासून रोखतात. त्यांना समुपदेशनाची गरज आहे. कारगील युद्धात ५२५ जवान मारले गेले. त्यापेक्षा अधिक लोक ठाणे आणि डोंबिवलीमध्ये रस्ता अपघातांत मरतात. सैनिकाला निदान शत्रू तरी माहीत असतो; रस्ता अपघातांत मात्र आपण पूर्णपणे बेसावध असतो. देशाला तुमची गरज असून सैन्यदलात भरती व्हायला हवे, असेही देव यांनी सांगितले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीIndian Armyभारतीय जवान