शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

ठाणे जिल्ह्यातील पाणी समस्या मिटली; भातसासह बारवी धरणात ९० टक्के पाणी साठा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 19:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गांवखेड्यातही पाऊस पडला नाही. मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गांवखेड्यातही पाऊस पडला नाही. मात्र आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस उत्तमरीत्या बरसल्याने धरणांचा पाणी साठा वाढला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ९०.११ टक्के व बारवी धरणात ८९.९६ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. यामुळे वर्षे भराची पाणी समस्या आता मिटली आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत या दोन्ही धरणात काही अंशी पाणी साठा कमी झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व महानगरांना व एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या ‌वर्षी ९०.२० टक्के साठा होता. पण यंदा हा साठा ८९.९६ टक्के आहे. बारवी धरणात अवघा १८६९ मिमी पाऊस पडला आहे. यापेक्षा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस पडला आहे. यामध्ये खानिवरे या पाणलोटात आजपर्यंत २६२३ मिमी पाऊस पडला आहे. कान्होळला २००१मिमी, पाटगांवला १९२२मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २२२७ मिमी. सरासरी पाऊस पडलेला आहे. यामुळे धरणांतील पाणी साठा ८९.९६ टक्के झाला आहे.

या बारवी धरणाची आजची पाणी पातळी १७.५४ मीटर नोंदली आहे. या धरणात आज रोजी ३३८.८४० पैकी ३०४.८१ दश लक्षघनमीटर पाणी साठा तयार झाला आहे. या धरणाप्रमाणे भातसा धरणातही गेल्या वर्षापेक्षा आज रोजी कमी साठा आहे. गेल्यावर्षी भातसात ९५.३७ टक्के साठा होता. यंदा तो ९०.१३ टक्के आहे.या भातसा व बारवी धरणाच्या तुलनेत आंध्रा धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत आजरोजी जास्त पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी ६२.६६ टक्के असलेला पाणी साठा यंदा ६८.५६ टक्के तयार झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेDamधरण