शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आठ सरपंचांसह ९० सदस्य बिनविरोध; १८८ जण निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:34 IST

जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शुक्रवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आठ ग्रामपंचायतींचे सरपंच, तर ९० सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे आता केवळ सरपंच व सदस्यपदांसाठी १८८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शुक्रवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आठ ग्रामपंचायतींचे सरपंच, तर ९० सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे आता केवळ सरपंच व सदस्यपदांसाठी १८८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीत १९ सार्वत्रिक तर ७१ जागांवर पोटनिवडणुका आहेत. यात १०९ जागांवर उमेदवारी अर्जच आलेले नाहीत. याठिकाणी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४४३ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्यातील १९ सरपंचांसाठी ८४ अर्ज आहेत. तर, सदस्यपदांसाठी ३५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी सदस्यपदांचे ३४९ अर्ज वैध ठरले असून केवळ १० अवैध ठरवण्यात आले, तर ६५ सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. आता केवळ १५४ उमेदवार सदस्यपदाच्या निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. तर, सरपंचपदांचा एकही अर्ज अवैध नसून ८४ वैध ठरले. मात्र, निवडणूक रिंगणात आता केवळ १३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ३४ उमेदवार नशीब आजमावत आहेत. उर्वरित सहा सरपंच बिनविरोध विजयी झाले आहेत.याप्रमाणेच जिल्ह्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका हाती घेतल्या आहेत. त्यात चार ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह १६० सदस्यांसाठी ही पोटनिवडणूक आहे. मात्र, त्यातील शहापूरचे बाभळे ग्रा.पं. व कल्याणची वेहळे या दोन ग्रा.पं.चे दोन सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित शहापूरची लवले व नांदवळ या दोन ग्रा.पं.च्या सरपंच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जच दाखल झालेले नाहीत. एवढेच नव्हे तर १६० सदस्यांच्या पोटनिवडणुकीपैकी २५ सदस्य बिनविरोध निवडून आले. तर, २६ सदस्य निवडणूक रिंगणात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे १०९ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्जच दाखल झाले नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.असे आहे चित्रआता प्रत्यक्षात मुरबाड तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. यात चार, तर भिवंडीमधील एक ग्रामपंचायतही बिनविरोध निवडून आली आहे. याशिवाय, मुरबाडच्या १८ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार नाही. तर, भिवंडीच्या १९ पोटनिवडणुकांपैकी पाच ग्रामपंचायतींमध्ये, अंबरनाथमध्ये दोनपैकी एका ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक आहे. कल्याणच्या आठही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका नाही. तर, शहापूरच्या २३ पैकी केवळ पाच पोटनिवडणुका होणार आहेत. जिल्हाभरात केवळ ११ ग्रामपंचायतींत पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे.- बिनविरोध सरपंचांच्या ग्रामपंचायती : भिवंडीतील गोवे ग्रामपंचायत. मुरबाडमधील जडई, सोनावळे, पेंढरी, संगम आणि सोनगाव. कल्याणमधील वेहळे, शहापूर तालुक्यातील बाभळे.

टॅग्स :thaneठाणे