शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

१०वी उत्तीर्ण झालेल्या ९ विद्यार्थ्यांना लॅपटॉप तर ३०० विद्यार्थ्यांना भेटवस्तू मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 8:04 PM

पालिका शाळेतील ८ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख देऊन त्यांचे कौतुक करण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने घेतला आहे.

मीरारोड - मीरा-भाईंदर शहरात राहणा-या तसेच शहरातील शाळेत शिकणाराया उच्च गुणांनी उत्तीर्ण १० वीच्या ९ विद्यार्थ्यांना लॅपटॉप , ३०० विद्यार्थ्यांना भेटवस्तू तर पालिका शाळेतील ८ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख देऊन त्यांचे कौतुक करण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने घेतला आहे. लॅपटॉप, भेटवस्तूसह एकूणच कार्यक्रमाचा मिळून सुमारे ९ लाखांचा खर्च होणार आहे.महिला बालकल्याण समितीची नुकतीच बैठक झाली. सदर बैठकीत शहरातून १० वीच्या परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवणा-या महाराष्ट्र राज्य बोर्ड, आयसीईएस व सीबीएससी बोर्डातील प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्तावानुसार एका लॅपटॉपची किंमत ४० हजार रुपयांच्या घरात असल्याचे नमूद आहे.या शिवाय ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या ३०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी बाराशे रुपये किमतीची बॅग वा भेटवस्तू दिली जाणार आहे. समितीच्या वतीने केवळ १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला जायचा. पण यंदापासून महापालिका शाळांमधून ८ वी उत्तीर्ण होऊन दुस-या शाळेत ९ वी मध्ये प्रवेश घेणा-या ३ विद्यार्थ्यांना अनुक्रमे १५ हजार, १३ हजार व ११ हजार रुपयांची रक्कम देऊन त्यांचे देखील कौतुक करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. सदर विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक दिले जणार आहे.समिती सभापती दीपिका अरोरा, उपसभापती वंदना भावसार, प्रभाग समिती सभापती विणा भोईर, अर्चना कदम, हेतल परमार, गीता परदेशी, कुसुम गुप्ता आदी समिती सदस्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. या आधी विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते. समितीच्या वतीने दिल्या जाणा-या लॅपटॉप, भेट वस्तू लवकरच कार्यक्रमाचे आयोजन करून दिल्या जाणार आहेत. नाव नोंदवण्यासाठी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणा-या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी प्रभागातील स्थानिक नगरसेवक किंवा महापालिका मुख्यालयातील महिला बाल कल्याण समिती कार्यालयाशी संपर्क साधावा असे पालिकेकडून सांगण्यात आले.