शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१०वी उत्तीर्ण झालेल्या ९ विद्यार्थ्यांना लॅपटॉप तर ३०० विद्यार्थ्यांना भेटवस्तू मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 20:04 IST

पालिका शाळेतील ८ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख देऊन त्यांचे कौतुक करण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने घेतला आहे.

मीरारोड - मीरा-भाईंदर शहरात राहणा-या तसेच शहरातील शाळेत शिकणाराया उच्च गुणांनी उत्तीर्ण १० वीच्या ९ विद्यार्थ्यांना लॅपटॉप , ३०० विद्यार्थ्यांना भेटवस्तू तर पालिका शाळेतील ८ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख देऊन त्यांचे कौतुक करण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने घेतला आहे. लॅपटॉप, भेटवस्तूसह एकूणच कार्यक्रमाचा मिळून सुमारे ९ लाखांचा खर्च होणार आहे.महिला बालकल्याण समितीची नुकतीच बैठक झाली. सदर बैठकीत शहरातून १० वीच्या परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवणा-या महाराष्ट्र राज्य बोर्ड, आयसीईएस व सीबीएससी बोर्डातील प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्तावानुसार एका लॅपटॉपची किंमत ४० हजार रुपयांच्या घरात असल्याचे नमूद आहे.या शिवाय ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या ३०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी बाराशे रुपये किमतीची बॅग वा भेटवस्तू दिली जाणार आहे. समितीच्या वतीने केवळ १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला जायचा. पण यंदापासून महापालिका शाळांमधून ८ वी उत्तीर्ण होऊन दुस-या शाळेत ९ वी मध्ये प्रवेश घेणा-या ३ विद्यार्थ्यांना अनुक्रमे १५ हजार, १३ हजार व ११ हजार रुपयांची रक्कम देऊन त्यांचे देखील कौतुक करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. सदर विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक दिले जणार आहे.समिती सभापती दीपिका अरोरा, उपसभापती वंदना भावसार, प्रभाग समिती सभापती विणा भोईर, अर्चना कदम, हेतल परमार, गीता परदेशी, कुसुम गुप्ता आदी समिती सदस्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. या आधी विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते. समितीच्या वतीने दिल्या जाणा-या लॅपटॉप, भेट वस्तू लवकरच कार्यक्रमाचे आयोजन करून दिल्या जाणार आहेत. नाव नोंदवण्यासाठी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणा-या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी प्रभागातील स्थानिक नगरसेवक किंवा महापालिका मुख्यालयातील महिला बाल कल्याण समिती कार्यालयाशी संपर्क साधावा असे पालिकेकडून सांगण्यात आले.