शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

ठाणे जिल्ह्यात ३५ ग्राम पंचायतींसाठी ८० टक्के मतदानाचा आंदाज, मंगळवारी मतमोजणी

By सुरेश लोखंडे | Updated: December 18, 2022 19:28 IST

जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी तालुक्यांतील ३५ ग्राम पंचायतींसाठी आज तब्बल ७५ ते ८० टक्के मतदान ५.३० वाजेपर्यंत झाल्याचा आंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी तालुक्यांतील ३५ ग्राम पंचायतींसाठी आज तब्बल ७५ ते ८० टक्के मतदान ५.३० वाजेपर्यंत झाल्याचा आंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.या मतदानाची मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे.

 जिल्ह्यातील या मतदानादरम्यान कल्याणच्या वासुंद्री ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांमध्ये शाब्दीक बाचाबाची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील ४२ पैकी सात ग्राम पंचायतीं आधीच बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उर्वरित ३५ ग्राम पंचायतींसाठी १३७ केंद्रांवर आज मतदान झाले. यासाठी ६५ हजार ५०७ मतदारांपैकी शेवटच्या क्षणापर्यंत ७५ ते ८० टक्के जणांनी मतदान केल्याचा आंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेवटच्या टप्यातील मतदानाची माहिती उपलब्ध होण्यास विलंब होणार असल्यामुळे दुपारनंतर केंद्रावरील मतदार संख्या लक्षात घेता संध्याकाळपर्यंत ७५ ते ८० टक्के मतदान झाल्याचा आंदाज तहसीलदार राजाराम तवटे यांनी व्यक्त केला.

 ग्राम पंचायतींच्या या मतदानासाठी सकाळपासून केंद्रांवर ग्रामस्थानी रांगेत उभे राहून मतदान केले. त्यामुळे जिल्हह्यात कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचे सांगितले जात आहे. या मतदानाच्या कालावधीपैकी सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६५ हजार ५०७ मतदानापैकी १५.२० टक्के, तर सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३७०३५ टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत ५६.६४ टक्के आणि ३.३० वाजेपर्यंत ७१.२४ टक्के म्हणजे ४७ हजार ३७९ जणांनी मतदान केल्याचा अहवाल आहे.

यामध्ये २४ हजार ७३५ पुरूषांसह २२ हजार ६४३ महिला आणि इतर एक आदींनी मतदान केलेले आहे. या निवडणुकीसाठी ७२७ उमेवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी ३५ सरपंच पदासाठी ११४ जणांसह २१९ सदस्य पदांसाठी ६१३ जणांसाठी आज तब्बल ८० टक्के मतदानाचा ५.३०वाजेपर्यंतचा आंदाज व्यक्त करण्यात आला. मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. यासाठी पोलिस अधिकारी, पोलिसांसह ९९० जणांचे मनुष्यबळ तैनात होते.

टॅग्स :thaneठाणे