शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात ३५ ग्राम पंचायतींसाठी ८० टक्के मतदानाचा आंदाज, मंगळवारी मतमोजणी

By सुरेश लोखंडे | Updated: December 18, 2022 19:28 IST

जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी तालुक्यांतील ३५ ग्राम पंचायतींसाठी आज तब्बल ७५ ते ८० टक्के मतदान ५.३० वाजेपर्यंत झाल्याचा आंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी तालुक्यांतील ३५ ग्राम पंचायतींसाठी आज तब्बल ७५ ते ८० टक्के मतदान ५.३० वाजेपर्यंत झाल्याचा आंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.या मतदानाची मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे.

 जिल्ह्यातील या मतदानादरम्यान कल्याणच्या वासुंद्री ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांमध्ये शाब्दीक बाचाबाची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील ४२ पैकी सात ग्राम पंचायतीं आधीच बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उर्वरित ३५ ग्राम पंचायतींसाठी १३७ केंद्रांवर आज मतदान झाले. यासाठी ६५ हजार ५०७ मतदारांपैकी शेवटच्या क्षणापर्यंत ७५ ते ८० टक्के जणांनी मतदान केल्याचा आंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेवटच्या टप्यातील मतदानाची माहिती उपलब्ध होण्यास विलंब होणार असल्यामुळे दुपारनंतर केंद्रावरील मतदार संख्या लक्षात घेता संध्याकाळपर्यंत ७५ ते ८० टक्के मतदान झाल्याचा आंदाज तहसीलदार राजाराम तवटे यांनी व्यक्त केला.

 ग्राम पंचायतींच्या या मतदानासाठी सकाळपासून केंद्रांवर ग्रामस्थानी रांगेत उभे राहून मतदान केले. त्यामुळे जिल्हह्यात कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचे सांगितले जात आहे. या मतदानाच्या कालावधीपैकी सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६५ हजार ५०७ मतदानापैकी १५.२० टक्के, तर सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३७०३५ टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत ५६.६४ टक्के आणि ३.३० वाजेपर्यंत ७१.२४ टक्के म्हणजे ४७ हजार ३७९ जणांनी मतदान केल्याचा अहवाल आहे.

यामध्ये २४ हजार ७३५ पुरूषांसह २२ हजार ६४३ महिला आणि इतर एक आदींनी मतदान केलेले आहे. या निवडणुकीसाठी ७२७ उमेवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी ३५ सरपंच पदासाठी ११४ जणांसह २१९ सदस्य पदांसाठी ६१३ जणांसाठी आज तब्बल ८० टक्के मतदानाचा ५.३०वाजेपर्यंतचा आंदाज व्यक्त करण्यात आला. मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. यासाठी पोलिस अधिकारी, पोलिसांसह ९९० जणांचे मनुष्यबळ तैनात होते.

टॅग्स :thaneठाणे